Posts

Showing posts with the label youth

मोहित करहानाला संशोधनासाठी मिळणार पावणे दोन कोटीची फेलोशिप! (Mohit karhana)

Image
लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हर नहीं होती| प्रयत्न करत राहणाऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळतेच. याचे ताजे उदाहरण म्हणजे हरयाणाचा मोहित करहाना! २२ वर्षाच्या मोहित करहानाला ( Mohit Karhana) अमेरिकेच्या केंटुकी युनिव्हर्सिटीकडून ( University of Kentucky)   पीएचडी साठी पावणे दोन कोटीची स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. indiatimes.com हरियाणा राज्यातील गुरूग्राम जिल्ह्यातील गुलाखुवास गावापासून मोहितचा प्रवास सुरू झाला. शालेय जीवनापासूनच मोहित अभ्यासात हुशार होता. त्याची आई बबिता करहाना यांनी नेहमीच आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्या स्वतः देखील सरकारी सेवेत कार्यरत आहेत. मोहितची आई बबिता यांना लग्नानंतर उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य झाले नाही. लग्नानंतर काही वर्षानी त्यांच्या पतीचा गंभीर अपघात झाला ज्यामुळे सुमारे दीड वर्षे तरी त्यांना आयसीयूत ठेवावे लागले होते. अशा सर्व खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण अतिशय चांगल्याप्रकारे पूर्ण केले. त्यांची मुलगी अंजली चंडीगड विद्यापीठा...

प्रसाद म्हणूनचेन्नईच्या या मंदिरात दिले जाते ब्राऊनी, सँडविच आणि केक....

Image
“समय सबसे बडा जादुगार हैं,”असं म्हटलं जातं ते खरं आहे. काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या पाहा ना... कधी काळी टीव्ही पाहण्यासाठी शेजारच्या घरी जाऊन बसावं लागायचं आणि आज टीव्ही आपल्या सर्वांच्या हातात आला आहे. (मोबाईलच्या रुपात हो!) अशा किती तरी बदलेल्या गोष्टी तुम्हालाही जाणवत असतील. पूर्वी देवळात गेल्यानंतर शांतपणे देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पुजारी आपल्या हातावर प्रसाद म्हणून साखर, फुटण्याची डाळ, तीर्थ (साधं पाणीच), किंवा लाडू, खोबरं (असं जे काही भाविकांनी देवाला नैवेद्य म्हणून चढवलं असेल तेच) ठेवायचे. पण, आता या प्रथेतही मोठा बदल होऊ पाहतो आहे. jaydurgapeetham.org   चेन्नईतील पेडप्पाई भागातील एका मंदिरात चक्क ब्राऊनी, बर्गर, चेरी टोमॅटो सॅलड आणि सँडविच प्रसाद म्हणून वाटला जात आहे. कहर म्हणजे या प्रसादाच्या पाकीटावर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा शिक्का आणि उत्पादन तिथी, एक्सपायरी डेट देखील छापली आहे.   पेडप्पाई भागातील जय दुर्गा पिठ्म मंदिरातील फक्त प्रसादाचा मेन्यूच बदलेला नाही तर प्रसाद वाटण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाल...

कनिका टेकरीवाल, अवघ्या ३२व्या वर्षी कोट्यावधींची उलाढाल करणारी बिझनेसवूमन! /Kanika Tekariwal

Image
मंजिल उन्ही को मिलती है, जिनके सपनो में जान होती है| सिर्फ पंखो से कुछ नाही होता, हौसलों सें उडान होती है| स्वप्न आकाशाला गवसणी घालणारी असतात तेव्हाच वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करता येते म्हणून तर वयाच्या २१ व्या वर्षी कॅन्सरला हरवून २२ व्या वर्षी स्वतःचा स्टार्टअप सुरु करणारी कनिका टेकरीवाल आज इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. आज जिकडे तिकडे कनिकाचीच चर्चा दिसते आहे. अर्थातच तिची झेपच इतकी उंच आहे की, चर्चा तर होणारच! google image अवघ्या ३२ व्या वर्षी दहा प्रायव्हेट जेट जिच्या नावावर आहेत ती कनिका आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. जगातील १०० श्रीमंत महिलांच्या यादीत तिने आपले स्थान निर्माण केले आहे आणि हे करत असताना वाटेतील प्रत्येक अडथळ्यावर तिने यशस्वी मात केलेली आहे.   एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी आज गाडी, रेल्वे,बस असे कित्येक पर्याय आहेत. त्यातही अति वेगवान पर्याय कुठला तर प्रायव्हेट जेट! पण, हा पर्याय किती लोकांच्या आवाक्यातला आहे? अगदी थोड्या. त्यातही ज्यांना हा पर्याय परवडतो त्यांनाही यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. प्रायव्हेट जेटने प्रवास करण्यासाठी ...

संपूर्ण दिवस आनंदात जावा असे वाटत असेल तर दिवसाची सुरुवात अशी करा.

Image
Image source : Google मनाला ताजेतवाने आणि सशक्त ठेवण्यासाठी रोज सकारात्मक विचारांचे खाद्य देण्याची गरज असते. रोजचा दिवस आनंदी जाणार की उदास हे तुमच्या परिस्थितीपेक्षा जास्त मन:स्थितीवर अवलंबून असते आणि मन:स्थिती तुमच्या विचारांवर अवलंबून असते. विचार आणि भावना यांचा संयोग जुळून आला की ती आपण त्याच भावनेच्या लाटेवर स्वार होतो.   दिवासभराचा आपला मूड कसा राहणार हे ठरवणे आपल्या हातात आहे. त्यासाठी फक्त आपल्याला स्वतःशी होणारा संवाद तपासावा लागेल आणि तो जर चुकीचा होणार असेल तर जाणीवपूर्वक बदलावा लागेल. इथे काही सकारात्मक वाक्यांची यादी देत आहोत, ती वाचा आणि त्यातून तुम्हाला योग्य वाटतील अशा सकारात्मक विधानांची निवड करून ती तुमच्या मोबाईलमध्ये कॉपी करून ठेवू शकता किंवा पाठ करू शकता. १. मी या नव्या दिवसाचे अतिशय आनंदाने, आशावादी होऊन आणि विश्वासाने स्वागत करत आहे. २. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा असणार आहे.   ३. मी माझ्यातील नाकारात्मकता, चिंता, भय बाहेर सोडत आहे आणि या विश्वातील सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये सामावून घेत आहे. ४. मी शांतता, प्रसन्नता आणि...

आजचा विद्यार्थी दिवस कुणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो आणि का?

Image
आज १५ ऑक्टोंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दूल कलाम यांचा जन्मदिन. आजचा दिवस संपूर्ण जगभर विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. २००२ ते २००७ या कालावधीत डॉ. कलाम यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. या कालावधीत ते ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ओळखले जाऊ लागले.   Image source : Google त्यांची मेहनत, त्यांची तळमळ, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि दृढनिश्चय या सगळ्या गोष्टी पाहता डॉ. कलाम हे आधुनिक काळातील विद्यार्थ्यांसाठी एक मृतीमंत आदर्श आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपला ज्ञान दानाचा वसा सोडला नाही. कर्मरत राहणे म्हणजे काय हे त्यांच्या जीवन प्रवासाकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. असे कलाम सर संपूर्ण जगाला आदर्श वाटतात म्हणूनच संयुक्त राष्ट्राने त्यांचा जन्मदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला आहे.   डॉ. कलामांना शिक्षकांप्रती खूपच आदर होता. त्यांच्या मते शिक्षकच समाजाची उत्तम बांधणी करू शकतात. विद्यार्थी आणि राष्ट्र उभारण्याची क्षमता ही फक्त शिक्षकांच्यातच असते.   डॉ. कलाम हे आजच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीही आदर्शच राहतील...

तुम्हालाही कसं तरी होतं? अशावेळी तुम्ही काय करता? काय केलं पाहिजे?

Image
कसं तरी होतं! म्हणजे काय होतं नेमकं हे सांगताही येत नाही पण चांगलंही वाटत नाही एवढं खरं. कसं तरी होण्याचा हा अनुभव तुम्हीही घेतलाच असेल. खरं तर हे असं प्रत्येकालाच वाटत असतं. मलाही अनेकदा वाटतं! हे असं का वाटतं? यामागे काय कारण असेल याचा बराच शोध घेतल्यानंतर जाणवलं की याची मुळे आपल्या विचारात आहेत. दिवसभरात मनात कितीतरी विचार येत असतात. काही चांगले तर काही वाईट. यातील कुठल्या विचारावर आपण जास्त विचार करतो त्यावर आपला मूड अवलंबून राहतो. कधी कधी तर अमका एक विचार आपल्या मनाला स्पर्श करून गेला हेही कळत नाही पण, त्या विचारातून निर्माण झालेल्या भावना मात्र आपल्याला सावलीसारख्या चिकटून राहतात. मग मनाची अशी काही अवस्था होते की ती शब्दात सांगता येत नाही, मग आपण म्हणतो मला कसं तरी होतंय! लहानमुलेही या मानसिक स्थितीला अपवाद नाहीत बरं. त्यांच्याही तोंडी तुम्ही अनेकदा हे वाक्य ऐकले असेल. मी तर बऱ्याचदा ऐकलंय! किंबहुना मीच हे वाक्य माझ्या लहानपणापासून अगणितवेळा उच्चारलं आहे. त्यामुळे अमक्या वयातच असं काही तरी होतं, जाणवतं, असं काही नाही. कुठल्याही वयातील व्यक्ति अशाप्रकारच्या अवस्थेतून जातच असते आणि...

उद्याचा दिवस आयुष्यात कधीच उगवत नाही. आयुष्यात आपल्या हाती असतो तो फक्त ‘आज!’

Image
चीडचीड, राग, नैराश्य, तणाव, निद्रानाश, अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी जेव्हा एकाचवेळी पछाडतात तेव्हा यातून बाहेर कसं पडायचं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. मानसिक स्थिती एकदा का घसरू लागली की ती कधी रसातळाला पोहेचेल हे सांगता येत नाही आणि मग आपण त्याच त्या घटना, त्याच त्या भावना आणि तेच ते परिणाम अनुभवत राहतो. आयुष्य जणू भोवऱ्यासारखं एकाच जागी गरागरा फिरायला लागतं. अशांत मनाला कशातच रस वाटत नाही, त्याला काही चांगलं दिसत नाही आणि काही चांगलं आठवत नाही. मनाचा प्रत्येक कोपरा काळ्याकुट्ट अंधाराने भरून जातो तेव्हा एक दिवा जरी लावला तरी अशा मानसिकतेतून बाहेर पडायला मदत होऊ शकते. अगदी घोर निराशा नसली तरी जेव्हा जेव्हा एकटं आणि उदास वाटेल त्यात्या वेळी हीच एक सवय तुम्हाला तरून नेऊ शकते. कुठली सवय?   कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय!   समजा तुम्ही फक्त फिरायला म्हणून बाहेर पडलाय! मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलंय हे करू का ते करू अशा अनेक विचारात तुम्ही गुरफटून गेलाय. विचार करता करता तुम्ही चालताय आणि चालत चालत तुम्ही एका झाडीत शिरता, थोडं पुढे थोडं पुढे करत जात राहता पण नंतर मात्र तुम्...

बिकट प्रसंगात कृतज्ञ राहणं सोपं आहे का?

Image
आयुष्यात सगळं काही अगदी सुरळीत, मनासारखं चाललेलं असतं, अपेक्षेपेक्षा पदरात जास्तच पडतं, हात लावेल तिथे सोनं अशी परिस्थिती असते तेव्हा तुम्ही मनापासून कृतकृत्य होत असाल. देवाचे किती आभार मानू आणि किती नको असे होत असेल. इतकं भरभरून दिल्याबद्दल तुम्ही त्याचे वारंवार आभारही मानत असाल पण, समजा हेच उलटं असेल तर? खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, रोजचा दिवस अगदी जीवावर उदार होऊन ढकलला जात असेल, मनावर निराशेचे मळभ दाटून आले असेल, कष्ट करूनही हाती फक्त शून्य लागत असेल तर? तर अशा परिस्थितीत कोणी कसे काय कृतज्ञ राहू शकेल. या परिस्थितीत कोणाला कृतकृत्य वाटेल? अशावेळी देवाकडे फक्त तक्रार केली जाते हे माझ्याच वाट्याला का? बरोबर ना?   Image source : Google खरे तर कितीही वाईट, दुर्धर, प्रसंग असला तरी त्यातही काही तरी चांगले दडलेले असते. अशा संकटाच्या काळातही तुमच्यातील आशावाद थोडासा तरी लुकलुकत असतो. मग अशा दिवसात जे काही हाताशी आहे त्याबद्दल नको का आभार मानायला? तुमच्या बिकट आणि खडतर परिस्थितीतही जर तुम्ही सकारात्मक राहायला शिकलात तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. ...

एकटे राहण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Image
तो स्वतः पार्ट्या, मित्रपरिवार, मौजमजा करण्यात व्यस्त असतो पण तिच्यावर संशय घेतो. तिने घरातून बाहेर पाऊल जरी ठेवलं तरी त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. तिने कुठं जायचं, कुणाला भेटायचं, कधी भेटायचं हे सगळं तोच ठरवतो. तिने घरातील कामे वेळेत केली नाहीत की लगेच तिला वेळेचा हिशोब विचारतो.   तो कधी कधी उशिरा घरी येतो. त्याला काही तरी नवं शिकायचं आहे. तिला मात्र त्याचं हे तासानतास बाहेर राहणं आवडत नाही. सतत त्याच्या घरच्यांच्या संपर्कात राहतो म्हणून तिला चीड येते. तिच्या मागण्या पूर्ण नाही केल्या की घर डोक्यावर घेते. सतत हे का? ते कशासाठी विचारत राहते? भुणभुण लावते.   Image source : Google दोन्ही उदाहरणे वेगवेगळी आहेत पण दोन्ही ठिकाणी समस्या एकच आहे, जोडीदार!   प्रत्येक जोडप्यात तशा कुरुबुरी आणि तक्रारी असतातच. शंभर टक्के प्रेम किंवा शंभर टक्के तिरस्कार असा कुठल्याही नात्यात नसतं तरीही काही काही ठिकाणी काही लोक आपल्या हट्टापोटी, असुरक्षितते पोटी इतरांच्या पायात बेड्या अडकवतात. प्रेम करणं म्हणजे सतत दुसऱ्याची काळजी करणं नव्हे हे अशा लोकांना समजतच नाही किंवा सतत दुसऱ्य...

नात्याच्या बाबतीत चोखंदळपणा हवाच!

Image
काही लोक कुठलीही वस्तू घेताना, खरेदी करताना किती पारखत बसतात. त्यांना जशी हवी तशी वस्तू मिळाल्याशिवाय ते खरेदी तर करणार नाहीतच पण, ‘घे रे आता अॅडजस्ट करून,’ असे म्हटले तर ऐकणारही नाहीत. एकदम चोखंदळ. वस्तूच्या बाबतीत ठीक आहे पण काहीजण नात्याच्या बाबितीतही तितकेच चोखंदळ असतात. थोडसं जमवून घ्यावं नमतं घ्यावं आपल्या अपेक्षांना मुरड घालावी यातलं काही म्हणता काही त्यांना जमत नाही. त्यांच्या अटीवर ते ठाम असतात. इतका पण काय तो चोखंदळपणा किमान नात्याच्या बाबतीत तरी बरा नव्हे हं! असा सूर तुम्ही आजूबाजूला अनेकदा ऐकला असेल.   Image Source : Google “काय बाई किती पोरी बघितल्या तरी या सुदेशला एक पोरगी पसंत पडत नाही. कुठली अप्सरा आणणार आहे कुणास ठाऊक?”   “मुलीचं वय काय आणि यांच्या अपेक्षा काय, जरा तरी कुठे तडजोड नको का करायला? कायमची घरात बसली की मग कळेल.”   असे टोमणे आणि चर्चा तुमच्याही   कानावर पडत असतील. केवळ या टोमण्यांपासून तुमची सुटका व्हावी म्हणून जर तुम्ही घाई केलीत तर पुढे जाऊन तुम्हालाच पश्चाताप होणार आहे. नात्यांच्या बाबतीत चोखंदळपणा दाखवलेला अनेकांना आवडत नाह...

काही लोकांना तुमच्यापेक्षा जास्त तुमच्याशी भांडण्यातच इंटरेस्ट असतो!

Image
भांडणं होण ही तशी सामान्य बाब. तसही भांडणाने प्रेम वाढतं असं म्हणतात. प्रेमातील चव जपणारी, लटकी, लुटुपुटूची भांडणं होण्यात काही वाईटही नाही म्हणा! पण जर कुणी मुद्दामच तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करत असेल. सतत तुमचा अपमान करत असेल, तुमच्याशी वादावादी करुन समाधान मिळवत असेल तर? काही लोकांना भांडण करण्याची हौसच असते आणि ते फक्त आपल्या जाळ्यात कोणी बकरा अडकतो का या संधीच्या शोधात असतात. आता अशा लोकांच्या जाळ्यात अडकून बकरा व्हायचं की भुर्रकन उडणारं कबुतर व्हायचं हे तुम्हीच ठरवा.   Image source : Google image मुद्दाम भांडणं उकरून काढणारी लोक असतात तरी कोण? या लोकांचे चार प्रकार पडतात. पहिले म्हणजे ज्यांना तुमच्यावर नाहक इर्षा वाटत असते असे. दुसरे म्हणजे ज्यांना स्वतःबद्दल अजिबात आत्मविश्वास नसतो, सतत भीती आणि तणावाखाली असतात असे. तिसरे ज्यांना आपण कुणाला तरी आपल्या बोलण्यातून दुखावत आहोत हे त्यांच्या गावीही नसणारे. आपल्या बोलण्याचा वागण्याचा समोरच्यावर काय परिणाम होईल याची जराही फिकीर नसणारे निष्काळजी आणि फटकळ लोक आणि चौथे तुमच्यावर प्रेम करणारे.   समोरचा माणूस या चारपैकी क...

आयुष्यातील ४० वर्षे त्याने सायकलवरून फिरण्यात घालवली!

Image
हिर-रांझा, लैला-मजनू, रोमिओ-ज्युलिएट,   याच मांदियाळीतील आणखी एक नाव म्हणजे, इवान-सायकल. काय डोकं फिरलंय का हिचं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. पण जितकं प्रेम हिरचं रंझावर, लैलाचं मजनूवर आणि रोमिओचं ज्युलिएटवर होतं तितकच काय त्यापेक्षा जास्तच प्रेम इवानचं सायकलवर होतं. या प्रेमाची आणखी एक सकारात्मक बाजू म्हणजे हिर-रांझा, लैला-मजनू असो की रोमिओ-ज्युलीएट या सर्वांच्या प्रेमाचा शेवट  शोकांतिक होता. इवान आणि त्याची सायकल मात्र शेवटपर्यंत एकमेकासोबत राहिले. या सायकलवरून चाळीस वर्षात त्याने सबंध जग पालथं घातलं. चाळीस वर्षाच्या प्रवासात त्याला जगाची कितीतरी विलोभनीय, मोहक आणि क्रूर रूपे दिसली या सर्वाबद्दल त्याने अनेक पुस्तके लिहिली. ती छापली गेली आणि मोठ्या प्रमाणात वाचलीही गेली. त्याच्या या पर्यटन अनुभवाबद्दल ऐकण्यासाठी कित्येक लोक उत्सुक होते आणि यातूनच इवानला एक व्याख्याता अशीही ओळख मिळाली. कोण होता हा इवान आणि सायकलने त्याला इतकं वेड कसं काय लावलं असेल? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा!   Image source : Google दररोज तेच ते रुटीन ऑफिस ते घर घर ते ऑफिस, तीच कामं...