Posts

Showing posts with the label Gratitude

नैराश्यातही रोजची कामं उरकण्यासाठी काय आयडिया वापरता येतील? तुम्हालाही हाच प्रश्न पडलाय का?

Image
घर आवरायचं आहे, कपडे धुवायचे आहेत , परवा धुवून आणून ठेवलेले कपडे अजून घडी घालायचे आहे, स्वयंपाकाची तयारी करायची आहे, बाजारातून भाजी पण आणली नाही अजून... डोक्यात कामांची नुसती यादी सुरु असते पण एकाही कामाला हात लावू वाटत नाही. अगदी जे काम केल्याशिवाय पर्यायच नाही अशी कामं तेवढी कशीबशी उरकली जातात. ती करताना पूर्वीचा उत्साह जाणवत नाही. विनाकारण थकल्यासारखं वाटतं. स्वयंपाकात जिथे पूर्वी दोन भाज्या बनत होत्या तिथे आता एक भाजी करायचंही जीवावर येतं. ही लक्षणे म्हणजे आळस किंवा थकवा नव्हे. ही नैराश्याची लक्षणे आहेत. नैराश्य आलेल्या किंवा डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला आयुष्यातील अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतही रस वाटत नसल्याने त्या गोष्टी करू वाटत नाहीत. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये जर असा बदल दिसत असेल तर , आळशी झालीये , घरात बसून काही काम नसतं म्हणून असं होतं , जरा बाहेर पड , फिरून ये , जग बघ म्हणजे कळेल , इतकंही नाही जमत मग काय उपयोग? असले शब्द वापरून आणखीन निराश करण्यापूर्वी एकदा या गोष्टीचा नक्की विचार करा. रोजची अगदी साधीसाधी वाटणारी कामं करणंही जेव्हा कठ...

कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी (Cognitive behavioral therapy) म्हणजे काय? CBTचे प्रकार आणि ही थेरपी कोणकोणत्या समस्यांवर उपयोगी ठरते, पाहूया या लेखातून!

Image
कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) म्हणजे काय ? CBT चे प्रकार आणि ही थेरपी कोणकोणत्या समस्यांवर उपयोगी ठरते, पाहूया या लेखातून! आपली विचार करण्याची पद्धती , आपले अनुभव त्यातून आपण काढलेले निष्कर्ष , आपल्या श्रद्धा-भावना-दृढविश्वास , यांचा परिणाम आपल्या वर्तनावर होत असतो. विचार , भावना यात काही   बिघाड निर्माण झाल्यास आपले मानसिक संतुलन बिघडते. मग विचार आणि भावनांतील हे संतुलन राखण्यासाठी काय करता येईल ? मानसिक तणाव , नैराश्य , निद्रानाश ,   Anxiety, mood swings अशा मानसिक, भावनिक समस्यांवर उपाय करण्यासाठी समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञ जी पद्धत वापरतात ती म्हणजे   कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) . आज आपण या प्रभावी पद्धतीबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. आपल्या विचारातील , भावनांमधील नकारात्मकता शोधून तिच्यावर सकारात्मक काम करण्याचे तंत्र म्हणजे कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) . या तंत्रामुळे आपण आपले विचार , भावना तर सोडाच पण वर्तन देखील बदलू शकतो. पण यासाठी खूप कष्ट घेण्याच...

जाणून घेऊया मेडिटेशनबाबतचे समज आणि गैरसमज !

Image
मेडिटेशन कसे करावे? आपण योग्य पद्धतीने मेडीटेशन करतो की नाही? मेडिटेशन करताना विशिष्ट अनुभव आलेच पाहिजेत का? मेडिटेशन सुरू केल्यानंतर लोकांना असे अनेक प्रश्न छळत असतात. विशेषत: मेडिटेशन योग्य पद्धतीने होते की नाही हे कसे ओळखायचे, या बाबतीत लोकांच्या मनात बराच संभ्रम असतो.  मेडिटेशनचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ताणताणाव हाताळण्यासाठी, कठीण प्रसंगात मन स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी, मनातील गोंधळ टाळण्यासाठी, एखाद्या शारीरिक व्याधीशी झुंजत असताना आणि भावनिक समतोल राखण्यासाठी याचा फायदा होतो.  परंतु यासोबत अनेक गैरसमज जोडले गेले आहेत ज्यामुळे सामान्य व्यक्तीच्या मनात मेडिटेशन बद्दल एक गूढ आकर्षण तर वाटतेच पण ही गोष्ट आपल्या आवाक्यातील नाही असेही वाटते.  तुम्हाला मेडिटेशन करण्याची भीती वाटत असेल, कंटाळा येत असेल किंवा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मेडीटेशन करता येत नाही असे वाटत असले तरी तुम्ही मेडिटेशन करत राहा. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, असे म्हटले आहेच. जेव्हा तुम्ही नियमितपणे मेडिटेशन करत राहाल. तेव्हा त्याचे फायदे तुम्हाला जाणवू लागतील....

तणाव हाताळण्याच्या काही प्रभावी पद्धती!

Image
दररोजच्या थकवा आणणाऱ्या रुटीन कामापासून ते अचानक उभ्या राहिलेल्या एखाद्या संकटामुळे आपल्याला तणाव जाणवतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी कामे अशी असतात ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही थकवा येतो. हा थकवा किंवा हा तणाव कमी करण्यासाठी आवर्जून वेळ दिला नाही तर तो वाढत जातो आणि एखाद्या दिवशी याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.  आपण नेहमीच बाह्य परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. पण मनस्थिती जर नीट हाताळता आली तर येणारा तणाव आणि त्यामुळे निर्माण होणारी शारीरिक-मानसिक गुंतागुंत आपण नक्कीच टाळू शकतो. तणाव तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. अतिरिक्त तणावामुळे तुमचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते. म्हणूनच शरीर आणि मन दोन्हीवरील ताण  हलका करणं खूपच गरजेचं आहे. या लेखात आपण तणाव हाताळण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनाचा आनंद घेऊ शकाल आणि तणावाच्या गंभीर परिणामापासून स्वतःला दूर ठेऊ शकाल. आता तणाव निवळण्यासाठी प्रत्येकाला एकच मात्रा लागू होईल असे नाही. प्रत्येकाला येणाऱ्या तणावाचे कारण ...

नकारात्मक विचारांना सकारात्मक दिशा देता येते./Flip negative thoughts into positivity!

Image
  दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार येत असतात. यातील कित्येक विचार हे नकारार्थी आणि आपल्याला मागे खेचणारे असतात. ‘वैरी न चिंती ते मन चिंती,’ असं उगीच म्हटलेलं नाही. आपल्याबद्दल ते आपल्या वैऱ्याच्याही मनात कधी येणार नाही ते आपल्या मनात आधीच येऊन गेलेलं असतं. ‘रिकामं मन सैतानाचं घर,’ अशीही म्हण आपल्याकडे रूढ आहेच. या सगळ्या म्हणीतून हेच सांगायचं आहे की, मनातील विचारांकडे आपले लक्ष असेल तर आपल्या कितीतरी चिंता निर्माण होण्याआधीच दूर होतात. आता प्रसादचंच उदाहरण घ्या. गाडी चालवायला शिकून त्याला आत्ता जवळपास दहा वर्षे तरी होत आली. अनेकदा त्याने दिवसरात्र प्रवास करून लांबचे अंतर कमी वेळेत पार केलेले आहे. पण, त्यादिवशी घरातून पार्टीला जाताना मध्येच त्याच्या मनात विचार आला, आपण इतकी फास्ट गाडी चालवतो पण, कधी कुठे अपघात झाला तर काय करणार? झालं या एका विचारातून त्याच्या मनात पुढे नकारात्मक विचारांची मालिकाच तयार झाली आणि अपघाताच्या नुसत्या कल्पनेनेच त्याला दरदरून घाम फुटला. खरं तशाही अवस्थेत तो गाडी चालवत होताच पण नुसत्या कल्पनेने त्याला हतबल करून सोडले. पण, अपघाताचा विचार त्याच्या मनात आला ...

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय?

Image
माणसाचं सरासरी आयुष्य किती? तर साधारण, ७५ वर्षे. त्यातही अनेकांना ८०/९०/१०० वर्षे जगण्याचा बहुमान मिळतो. हो दीर्घायुष्य हे निसर्गाने दिलेलं एक वरदानच आहे. आज जगणं महाग आणि मरण स्वस्त झालेलं असताना काही लोक शंभरी पार करण्याचा विक्रम कसा काय करू शकतात? Image Source: Twitter आता अमेरिकेत जन्मलेल्या ब्रेन्यीस मोरेरा या स्पानिश आजीचंच उदाहरण घ्या. या वर्षी आजींनी ११५व्या वर्षात पदार्पण केले. २३ जानेवारी रोजी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ति म्हणून गिनीज बुकात नोंद असणाऱ्या ल्युसील रँडन याचं निधन झालं आणि ११५ वर्षाच्या ब्रेन्यीस मोरेरा जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ति म्हणून गिनीज बुकात नाव नोंद होण्याची अनपेक्षित भेट मिळाली. ११५ वर्षाच्या आयुष्यात आजींनी दोन महायुद्धे, १९१८चा स्पॅनिश फ्लू, १९३६चे स्पेनमधील नागरी युद्ध आणि कोव्हीड-१९ची जागतिक महामारी एवढ्या जागतिक उलथापालथी पहिल्या आहेत. ब्रेन्यीस मोरेरा यांचा जन्म ४ मार्च १९०७ रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. त्यांचा कुटुंबीयांनी त्यांच्या जन्माच्या एकावर्षापूर्वीच मेक्सिकोमधून अमेरिकेत स्थलांतर केले होते. १९१५ साली पहिल्या महायुद्धाच्या पार्श्...

काहीही न करता बसून रहाणं सुद्धा खूप मोठं काम आहे!

Image
कधी कधी सकाळी अंथरुणातून उठावंच वाटत नाही. कुठलंच काम करायला नको दिवस फक्त असाच निवांत असावा...असं वाटणं साहजिक नाही का? दररोज उठून आपण आपलं रुटीन धावपळीचं आणि प्रचंड धकाधकीचं जीवन जगतच असतो. त्यातून एखादा दिवस असा काहीही न करता घालवावासा वाटणं स्वाभाविक आहे. रोजच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येणं ही सामान्य बाब आहे. पण, आपल्याला कामाची इतकी सवय झालेली असते की, काहीही न करता कसं बसायचं? हेच कळत नाही. किंवा आपण बसून राहिलो तर अंगात आळस भरेल, शिवाय कामं तर केलीच पाहिजेत ना? त्याला पर्याय नाही असं म्हणत आपण स्वतःला रेटत नेतो. स्वतःवरच कामाची सक्ती करत राहतो. एखादा दिवस असं स्वतःला अजिबात जबरदस्ती न करता मस्त लोळत काढला जाऊ शकत नाही का? खरं तर हा प्रश्न बायकांना विचारायला हवा. कारण, असा एखादा दिवस त्याच्या नशिबी येणं म्हणजे स्वर्गीय सुखच. नाही का! रोजच्या कामातून सुट्टी ही हवीच. आपल्या शरीराला आणि मनालाही. काहीही न करू वाटणं, म्हणजे आपल्या शरीरानं आणि आपल्या मनानं पुकारलेलं बंडच असतं. अशावेळी काहीही न करता राहणं ही अवघड आणि काही करणं ही अवघड अशी द्विधा अवस्था होते आणि ती ठीक आहे.   ...

Emotional Intelligence म्हणजेच भावनिक बुद्ध्यांक कसा राखावा?

Image
Image source : Google    बुद्ध्यांक हा शब्द तुमच्या चांगलाच परिचयाचा असेल. पण भावनिक बुद्ध्यांक हा शब्द तुम्ही कधी वाचला किंवा ऐकला आहे का? भावनिक बुद्ध्यांक म्हणजे, स्वतःच्या भावना ओळखता येण्याची, त्या योग्य पद्धतीने व्यक्त करण्याची आणि भावनांचे नियंत्रण करण्याची क्षमता. प्रत्येक व्यक्तीकडे ही क्षमता असेलच असे नाही पण थोड्याशा प्रयत्नाने हे नक्कीच साध्य होऊ शकते. वैयक्तिक नातेसंबंध आणि व्यावसायिक संबंध अशा दोन्ही ठिकाणी जर याचा योग्य वापर करता आला तर व्यक्ति आयुष्यात यशस्वी होऊ शकते. बौद्धिक क्षमतेपेक्षाही ज्याचा भावनिक बुद्ध्यांक चांगला असतो ती व्यक्ति यशाच्या पायऱ्या सर करण्यात लवकर यशस्वी होते.   हा भावनिक बुद्ध्यांक कसा वाढवावा याबद्दल काही टिप्स इथे देत आहोत. १)       प्रश्न विचारा – तुम्हाला जर प्रश्न विचारण्याची सवय असेल तर ही एक एकदम चांगली सवय आहे. प्रश्न विचारल्याने आपल्या ज्ञानात, माहितीत भर पडते. कधीकधी स्वतःला प्रश्न विचारणेही सोयीचे ठरते. म्हणजे एखाद्या वेळी उदास, निराश, हताश वाटत असेल किंवा कुणाचा राग आला असेल, अशा वेळी स्वतः...

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

Image
Image source : Google गतकाळाच्या आठवणी एखाद्या भुताप्रमाणे आपल्याला झपाटून टाकतात. हा भूतकाळ कधीकधी इतका आपल्यावर अधिकार गाजवतो की आपण त्याच्या मगरमिठीतून कितीही सुटण्याचा प्रयत्न केला तरी सुटू शकत नाही. एखादे जीवघेणे आजारपण असेल , प्रेमभंग असेल , कुणा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल , एखाद्या जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात असेल , अशा घटनांनी मनावर खोल परिणाम केलेला असतो हे नाकारता येत नाही. या आघातातून सावरायचे झाल्यास स्वतःलाच प्रयत्न केले पाहिजेत. या नकारात्मक आठवणी सोडून देऊन जगणं शक्य आहे का ? असा जर प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर याचं उत्तर आहे, हो. तुमचा भूतकाळ कसाही आणि कितीही वाईट असला तरी आजही एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आपला भूतकाळ म्हणजे आपल्या आयुष्याचा एक भाग असतो , भूतकाळ म्हणजेच संपूर्ण आयुष्य नव्हे. थोड्याशा प्रयत्नाने तुम्ही या जंजाळातून नक्कीच बाहेर पडू शकता. या सहा पायऱ्या तुम्हाला तुमच्या भूतकाळाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी खूप म्हणजे खूपच फायदेशीर ठरतील.   यातील पहिली पायरी आहे , आपल्या भावनांप्रती सजग होणे – तुम्हाला जो ...