Posts

Showing posts with the label सकारात्मक विचार

नकोशा आठवणींचा ससेमिरा कसा टाळावा, यासाठी काही टिप्स./Tips to release painful memories.

Image
आठवणी चमत्कारिक असतात. आठवणी आपल्याला उलट्या पावलांनी भूतकाळात जायला भाग पाडतात. भूतकाळातील आठवणी आपला वर्तमान आणि भविष्यकाळही प्रभावित करत असतात. काही आठवणी सुखद असतात. ज्या आपल्याला आनंद देतात, तर वाईट आठवणी मात्र विंचवासारख्या डसत राहतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळाले, शिक्षकांनी कौतुक केले, नोकरीसाठी दिलेली मुलाखत यशस्वी झाली, अशा आठवणी आपल्याला प्रेरणा देतात. पण एखाद्या व्यक्तीशी झालेले भांडण, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, एखादा अपघात, कुणीतरी केलेली फसवणूक, प्रेमभंग अशा आठवणी आपल्याला आणखी कमजोर बनवतात. आठवणींचा हा खेळ जर जास्तच त्रासदायक होत असेल, तर काय करावं? या वाईट आठवणींच्या जंजाळातून सुटण्याचा काहीच मार्ग नसेल का? होतं काय घटना भूतकाळात घडून गेली असली तरी तिचे व्रण वर्तमानातही खुपत राहतात. काहींसाठी या आठवणी डिप्रेशनचे कारणही ठरतात. या आठवणींच्या दुष्ट पंजातून सुटका करून घ्यायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला तसा निश्चय करावा लागेल आणि दुसरी गोष्ट त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागेल. तुमच्या या आठवणी आठवणीत राहिल्या तरी त्या  तुम्हाला छळणार नाहीत. भूतकाळातील आठवणी बाजूला सा...

स्वतःवरही भरपूर प्रेम करू शकतो आपण! या Valentine ला स्वतःवरचं प्रेम व्यक्त करा!

Image
प्रेमाचा आठवडा सुरु आहे. प्रेमाच्या या प्रवासाची सुरुवात होते ती स्वतःपासून आणि स्वतःवरील प्रेमाची सुरुवात होते आत्म-स्वीकारापासून. पण स्वतःचा स्वीकार म्हणजे तरी काय? स्वतःला आहोत तसं स्वीकारणं म्हणजे आत्म-स्वीकार. हे वाक्य वाचायला जितकं सोपं आहे तितकंच प्रत्यक्षात अवलंबायला कठीण! मुळात आपण कसे आहोत हेच बरेचदा आपल्याला माहीत नसतं.  मग हा प्रवास स्वतःला ओळखण्यापासून सुरू व्हायला हवा. एकदा का स्वतः आपण कसे आहोत कसे नाही हे कळालं की, मग ते स्विकारणं सोपं होईल नाही का? बरेचदा इतरांनी दिलेले शेरे, कौतुक, मान अपमान याच चष्म्याने आपण आपली एक प्रतिमा बनवलेली असते. पण, मुळात आपण कसे आहोत, कसे होतो? हेच कधी कधी विसरून गेलेलं असतं. असे इतरांनी दिलेली मतं आपण आपल्यावर लादली आहेत का हेही पाहायला हवं. कधी कधी अशी मतं न कळत आपल्यात रुजलेली असतात, आपण ती स्वीकारलेली असतात. स्वतःला स्वीकारताना, अशी लादलेली प्रतिमा नाकारताही यायला हवं. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एकदा आपण स्वतःला ओळखलं, एकदा स्वीकारलं आणि बस्स आता आपण स्वतःच्या प्रेमात पडलो असं होत नाही. तुमचं दुसऱ्याशी असलेलं ना...

नकारात्मक विचार पळवून लावण्यासाठी तुम्ही कधी हे मार्ग अवलंबले आहेत का?

Image
“मी आज नवीन काही तरी शिकलं पाहिजे.” “नाही तर नकोच, काही नाही जमलं तर उगाच वेळ वाया जाणार, वर उरलेली कामं होतील तीही नाही होणार.” वरील प्रकारचा संवाद हा आपलाच आपल्याशी होणारा संवाद आहे. दिवसातून आपण कित्येक गोष्टीवर असा स्वसंवाद साधत असतो. यातील काही भाग सकारात्मक तर फार मोठा भाग हा नकारात्मक स्वरूपाचा असतो. बारकाईने पाहिलं तर इतर कुणाहीपेक्षा आपला हा स्वसंवादच आपल्यासाठी प्रेरणादायी किंवा आपल्याला खचवणारा असतो. विज्ञानाच्या मते एका दिवसात माणसाच्या डोक्यात ७० हजारहून जास्त विचार जन्म घेतात. यातील सकारात्मक किती नकारात्मक किती हे आपण मोजू नाही शकाणार पण, यात नकारात्मक विचारांचा वाटा नक्कीच जास्त असतो. खरं तर कुणालाच आपण नकारात्मक विचार करावेत असं वाटत नाही किंवा कुणीही ठरवून नकारात्मक विचार करत नाही. याउलट सकारात्मक विचार ठेवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक आपल्या विचारांवर काम करावे लागते. आजच्या या लेखात आपण हेच पाहणार आहोत. किमान, नकारात्मक विचार ओळखून ते बाजूला कसे करायचे यावर जरी आपण विचार केला तरी पुष्कळ होईल.   २४ तास सकारात्मक राहणं कुणालाही शक्य नाहीच, तरीही किमान नका...

मोहित करहानाला संशोधनासाठी मिळणार पावणे दोन कोटीची फेलोशिप! (Mohit karhana)

Image
लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हर नहीं होती| प्रयत्न करत राहणाऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळतेच. याचे ताजे उदाहरण म्हणजे हरयाणाचा मोहित करहाना! २२ वर्षाच्या मोहित करहानाला ( Mohit Karhana) अमेरिकेच्या केंटुकी युनिव्हर्सिटीकडून ( University of Kentucky)   पीएचडी साठी पावणे दोन कोटीची स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. indiatimes.com हरियाणा राज्यातील गुरूग्राम जिल्ह्यातील गुलाखुवास गावापासून मोहितचा प्रवास सुरू झाला. शालेय जीवनापासूनच मोहित अभ्यासात हुशार होता. त्याची आई बबिता करहाना यांनी नेहमीच आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्या स्वतः देखील सरकारी सेवेत कार्यरत आहेत. मोहितची आई बबिता यांना लग्नानंतर उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य झाले नाही. लग्नानंतर काही वर्षानी त्यांच्या पतीचा गंभीर अपघात झाला ज्यामुळे सुमारे दीड वर्षे तरी त्यांना आयसीयूत ठेवावे लागले होते. अशा सर्व खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण अतिशय चांगल्याप्रकारे पूर्ण केले. त्यांची मुलगी अंजली चंडीगड विद्यापीठा...

कनिका टेकरीवाल, अवघ्या ३२व्या वर्षी कोट्यावधींची उलाढाल करणारी बिझनेसवूमन! /Kanika Tekariwal

Image
मंजिल उन्ही को मिलती है, जिनके सपनो में जान होती है| सिर्फ पंखो से कुछ नाही होता, हौसलों सें उडान होती है| स्वप्न आकाशाला गवसणी घालणारी असतात तेव्हाच वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करता येते म्हणून तर वयाच्या २१ व्या वर्षी कॅन्सरला हरवून २२ व्या वर्षी स्वतःचा स्टार्टअप सुरु करणारी कनिका टेकरीवाल आज इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. आज जिकडे तिकडे कनिकाचीच चर्चा दिसते आहे. अर्थातच तिची झेपच इतकी उंच आहे की, चर्चा तर होणारच! google image अवघ्या ३२ व्या वर्षी दहा प्रायव्हेट जेट जिच्या नावावर आहेत ती कनिका आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. जगातील १०० श्रीमंत महिलांच्या यादीत तिने आपले स्थान निर्माण केले आहे आणि हे करत असताना वाटेतील प्रत्येक अडथळ्यावर तिने यशस्वी मात केलेली आहे.   एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी आज गाडी, रेल्वे,बस असे कित्येक पर्याय आहेत. त्यातही अति वेगवान पर्याय कुठला तर प्रायव्हेट जेट! पण, हा पर्याय किती लोकांच्या आवाक्यातला आहे? अगदी थोड्या. त्यातही ज्यांना हा पर्याय परवडतो त्यांनाही यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. प्रायव्हेट जेटने प्रवास करण्यासाठी ...

काहीही न करता बसून रहाणं सुद्धा खूप मोठं काम आहे!

Image
कधी कधी सकाळी अंथरुणातून उठावंच वाटत नाही. कुठलंच काम करायला नको दिवस फक्त असाच निवांत असावा...असं वाटणं साहजिक नाही का? दररोज उठून आपण आपलं रुटीन धावपळीचं आणि प्रचंड धकाधकीचं जीवन जगतच असतो. त्यातून एखादा दिवस असा काहीही न करता घालवावासा वाटणं स्वाभाविक आहे. रोजच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येणं ही सामान्य बाब आहे. पण, आपल्याला कामाची इतकी सवय झालेली असते की, काहीही न करता कसं बसायचं? हेच कळत नाही. किंवा आपण बसून राहिलो तर अंगात आळस भरेल, शिवाय कामं तर केलीच पाहिजेत ना? त्याला पर्याय नाही असं म्हणत आपण स्वतःला रेटत नेतो. स्वतःवरच कामाची सक्ती करत राहतो. एखादा दिवस असं स्वतःला अजिबात जबरदस्ती न करता मस्त लोळत काढला जाऊ शकत नाही का? खरं तर हा प्रश्न बायकांना विचारायला हवा. कारण, असा एखादा दिवस त्याच्या नशिबी येणं म्हणजे स्वर्गीय सुखच. नाही का! रोजच्या कामातून सुट्टी ही हवीच. आपल्या शरीराला आणि मनालाही. काहीही न करू वाटणं, म्हणजे आपल्या शरीरानं आणि आपल्या मनानं पुकारलेलं बंडच असतं. अशावेळी काहीही न करता राहणं ही अवघड आणि काही करणं ही अवघड अशी द्विधा अवस्था होते आणि ती ठीक आहे.   ...

तुमच्या नात्यात (Longterm relationship) या १० गोष्टी असतील तर....!

Image
Source : Google Image  व्हॅलेंटाइन विक ( Valentine week)   सुरू आहे. प्रेमाच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी सगळेच उतावीळ असतात. आपल्या आवडत्या व्यक्तीविषयीच्या भावना व्यक्त करण्यामागचा हेतू एकच असतो ते म्हणजे नातं अधिकाधिक फुलवणं!   आपल्या आयुष्याचा जोडीदार कायम आपल्या सोबत राहावा असं वाटणं साहजिकच आहे ना? पण, काही नाती अशी शेवटपर्यंत टवटवीत राहत नाहीत. नातं अधिक काळ टिकण्यासाठीही कष्ट घ्यावे लागतात. त्याला वेळ, आपुलकी, संवेदनशीलता, प्रेम, विश्वास, एकनिष्ठता, विवेक, समजूतदारपणा, अशा भावनांचे खतपाणी घालावे लागते. ज्या नात्यात या सगळ्या गोष्टी आवश्यक प्रमाणात असतात ते नाते दूरपर्यंत आपल्या सोबत राहते. ज्या नात्याला या गोष्टी मिळत नाहीत, ती लवकरच दम टाकतात.   आपली नाती दीर्घकाळ ( long term relationship) टिकावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर, तुमचा जोडीदार आणि तुम्ही दोघांमध्येही काही सकारात्मक गुण असणे आवश्यक आहेत. हे दहा गुण जर तुम्हा दोघांमध्येही असतील तर, नक्कीच तुम्ही आनंदी आणि समाधानकारक आयुष्य जगू शकाल.   १) प्रतिक्रिया देणे ( Responsiveness) – ज...

पुनीत काळाच्या पडद्यावर ठसा उमटवणारा 'रिअल हिरो'!

Image
काल दुपारी ती बातमी धडकली आणि धक्काच बसला. अवघ्या ४६ व्या वर्षी कन्नड पॉवर स्टार पुनीत राजकुमार याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू. पहिल्यांदा कू मराठी अॅपवर जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा विश्वासच बसला नाही. अशीच अफवा असेल असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. पण, नंतर विवध न्यूज चॅनेल्सवरूनही जेव्हा ही बातमी प्रसारित होऊ लागली तेव्हा मात्र मन सुन्न झाले. पुनीथ राजकुमारच्या जाण्याने संपूर्ण कन्नड चित्रपट सृष्टी दु:खाच्या खाईत लोटली गेली आहे. त्याच्या अशा अवचित जाण्याच्या बातमीने त्याच्या दोन चाहत्यांचाही हृद्यविकाराने मृत्यू झाला आहे तर एका चाहत्याने आत्महत्या ऐकल्याचे समजते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या चाहत्यांनाही ही बातमी पचवणे खूप अवघड गेले असणार. फिटनेस , अॅक्टिव्हनेस आणि दानशूरता यासाठी ओळखला जाणारा पुनीत असा जाऊ शकतो हेच मुळी अविश्वसनीय! मरणानंतरही तो आपले दोन्ही डोळे मागे ठेवून जातोय. ( त्याचे वडील, सुपरस्टार डॉ. राजकुमार यांनीच १९९४ सालीच आपल्या कुटुंबातील सर्वांनीच नेत्रदान करावे   अशी तरतूद केली आहे.)   एक कलाकार म्हणून तर तो ग्रेट होताच पण माणूस म्हणूनही तो...

तुम्हाला जखडून ठेवणाऱ्या या बेड्या तुम्ही ओळखल्या आहेत का?

Image
आपली मानसिकता , आपला दृष्टीकोन, आपले विचार , या गोष्टींमुळे आपल्याला आपल्या ताकदीचा कधी अंदाजच येत नाही. मानसिक तणाव , विचारातील गोंधळ , नकारात्मक विचार , निराशा , राग या सगळ्यांचा आपल्या प्रगतीवर विपरीत परिणाम होत असतो. या सगळ्यांपासून स्वतःची सुटका करून घेणं तसं सोपं आहे. गरज आहे ती ठामपणे निश्चय करण्याची. Image source : Google दिवाळीच्या मुहूर्तावर घराची साफसफाई झाली असेल तर याच मुहूर्तावर एकदा अंतर्मनाची साफसफाई करून तिथे उर्जेचा , उत्साहाचा , दिवा लावण्याचा संकल्प करूया. पहिली स्वच्छता करायची आहे ती , भीतीची. भीती कशाचीही असू शकते. अगदी लोक काय म्हणतील इथपासून ते आपल्याला जमलंच नाही तर ? आपण अपयशी झालो तर ? अशा कल्पनांनी मनात असा काही ठिय्या मांडलेल असतो की , कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वीच काही लोक हातपाय गाळून बसतात. अपयश आले तरी कोणी तुम्हाला खाऊन टाकणार नाही. उलट त्यातून तुम्हाला नवीन काही तरी शिकायला मिळेल. म्हणून अपयश आले तरी त्याकडे एक धडा म्हणून पाहिल्यास त्याची भीती राहणार नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले जाते. पण जर या पायऱ्या सारख्...

तुमची भीती हाच तर तुमच्या मार्गातील मोठा अडथळा नाही ना!

Image
एखाद्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी , एखादी नवे कौशल्य शिकण्यापूर्वी, एखादी नवी कल्पना सत्यात उतरवण्यापूर्वी , आपल्या मनात बरेच प्रश्न थैमान घालत असतात. आता हे मला जमेल का ? मी ठरवतोय तसं नाही घडलं तर ? आता याचा काही फायदा होईल का ? इतका वेळ देणं शक्य होईल का ? असे असंख्य प्रश्न कुठून उगम पावतात माहितीये ?   Image source : Google आपलं रुटीन लाईफ सोडून आपण काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपलं मन विनाकारण असहकार पुकारतं. का तर मनालानव्याने काही व्याप नको असतात. आहेत त्याचाच गुंता सोडवता सोडवता त्याला थकवा आलेला असतो. मग मन अनेक करणं द्यायला सुरुवात करतं. त्यातूनच आपल्या मनात यशाबद्दल संभ्रम आणि अपयशाची भीती बसते. अपयशाची ही भीती सर्वांनाच वाटत असते पण , या अपयशाच्या भीतीवर मात करण्यासाठी काही तरी केलं पाहिजे. जेणेकरून आपणच आपले पाय मागे खेचतोय असे होणार नाही.   यापूर्वी आपण कधी केलय का असलं काही? नाही ना ? मग आत्ता अचानक उठून काहीही करण्यात काय हाशील आहे ? आपल्याला इतकी धावपळ दगदग झेपणार नाही. घर सोडून जायचं पण , मग घरच्या जबाबदाऱ्या कोण बघणार...