Posts

Showing posts with the label छोट्या गोष्टी.

प्रसाद म्हणूनचेन्नईच्या या मंदिरात दिले जाते ब्राऊनी, सँडविच आणि केक....

Image
“समय सबसे बडा जादुगार हैं,”असं म्हटलं जातं ते खरं आहे. काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या पाहा ना... कधी काळी टीव्ही पाहण्यासाठी शेजारच्या घरी जाऊन बसावं लागायचं आणि आज टीव्ही आपल्या सर्वांच्या हातात आला आहे. (मोबाईलच्या रुपात हो!) अशा किती तरी बदलेल्या गोष्टी तुम्हालाही जाणवत असतील. पूर्वी देवळात गेल्यानंतर शांतपणे देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पुजारी आपल्या हातावर प्रसाद म्हणून साखर, फुटण्याची डाळ, तीर्थ (साधं पाणीच), किंवा लाडू, खोबरं (असं जे काही भाविकांनी देवाला नैवेद्य म्हणून चढवलं असेल तेच) ठेवायचे. पण, आता या प्रथेतही मोठा बदल होऊ पाहतो आहे. jaydurgapeetham.org   चेन्नईतील पेडप्पाई भागातील एका मंदिरात चक्क ब्राऊनी, बर्गर, चेरी टोमॅटो सॅलड आणि सँडविच प्रसाद म्हणून वाटला जात आहे. कहर म्हणजे या प्रसादाच्या पाकीटावर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा शिक्का आणि उत्पादन तिथी, एक्सपायरी डेट देखील छापली आहे.   पेडप्पाई भागातील जय दुर्गा पिठ्म मंदिरातील फक्त प्रसादाचा मेन्यूच बदलेला नाही तर प्रसाद वाटण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाल...

संपूर्ण दिवस आनंदात जावा असे वाटत असेल तर दिवसाची सुरुवात अशी करा.

Image
Image source : Google मनाला ताजेतवाने आणि सशक्त ठेवण्यासाठी रोज सकारात्मक विचारांचे खाद्य देण्याची गरज असते. रोजचा दिवस आनंदी जाणार की उदास हे तुमच्या परिस्थितीपेक्षा जास्त मन:स्थितीवर अवलंबून असते आणि मन:स्थिती तुमच्या विचारांवर अवलंबून असते. विचार आणि भावना यांचा संयोग जुळून आला की ती आपण त्याच भावनेच्या लाटेवर स्वार होतो.   दिवासभराचा आपला मूड कसा राहणार हे ठरवणे आपल्या हातात आहे. त्यासाठी फक्त आपल्याला स्वतःशी होणारा संवाद तपासावा लागेल आणि तो जर चुकीचा होणार असेल तर जाणीवपूर्वक बदलावा लागेल. इथे काही सकारात्मक वाक्यांची यादी देत आहोत, ती वाचा आणि त्यातून तुम्हाला योग्य वाटतील अशा सकारात्मक विधानांची निवड करून ती तुमच्या मोबाईलमध्ये कॉपी करून ठेवू शकता किंवा पाठ करू शकता. १. मी या नव्या दिवसाचे अतिशय आनंदाने, आशावादी होऊन आणि विश्वासाने स्वागत करत आहे. २. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा असणार आहे.   ३. मी माझ्यातील नाकारात्मकता, चिंता, भय बाहेर सोडत आहे आणि या विश्वातील सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये सामावून घेत आहे. ४. मी शांतता, प्रसन्नता आणि...

तुम्हालाही कसं तरी होतं? अशावेळी तुम्ही काय करता? काय केलं पाहिजे?

Image
कसं तरी होतं! म्हणजे काय होतं नेमकं हे सांगताही येत नाही पण चांगलंही वाटत नाही एवढं खरं. कसं तरी होण्याचा हा अनुभव तुम्हीही घेतलाच असेल. खरं तर हे असं प्रत्येकालाच वाटत असतं. मलाही अनेकदा वाटतं! हे असं का वाटतं? यामागे काय कारण असेल याचा बराच शोध घेतल्यानंतर जाणवलं की याची मुळे आपल्या विचारात आहेत. दिवसभरात मनात कितीतरी विचार येत असतात. काही चांगले तर काही वाईट. यातील कुठल्या विचारावर आपण जास्त विचार करतो त्यावर आपला मूड अवलंबून राहतो. कधी कधी तर अमका एक विचार आपल्या मनाला स्पर्श करून गेला हेही कळत नाही पण, त्या विचारातून निर्माण झालेल्या भावना मात्र आपल्याला सावलीसारख्या चिकटून राहतात. मग मनाची अशी काही अवस्था होते की ती शब्दात सांगता येत नाही, मग आपण म्हणतो मला कसं तरी होतंय! लहानमुलेही या मानसिक स्थितीला अपवाद नाहीत बरं. त्यांच्याही तोंडी तुम्ही अनेकदा हे वाक्य ऐकले असेल. मी तर बऱ्याचदा ऐकलंय! किंबहुना मीच हे वाक्य माझ्या लहानपणापासून अगणितवेळा उच्चारलं आहे. त्यामुळे अमक्या वयातच असं काही तरी होतं, जाणवतं, असं काही नाही. कुठल्याही वयातील व्यक्ति अशाप्रकारच्या अवस्थेतून जातच असते आणि...

उद्याचा दिवस आयुष्यात कधीच उगवत नाही. आयुष्यात आपल्या हाती असतो तो फक्त ‘आज!’

Image
चीडचीड, राग, नैराश्य, तणाव, निद्रानाश, अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी जेव्हा एकाचवेळी पछाडतात तेव्हा यातून बाहेर कसं पडायचं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. मानसिक स्थिती एकदा का घसरू लागली की ती कधी रसातळाला पोहेचेल हे सांगता येत नाही आणि मग आपण त्याच त्या घटना, त्याच त्या भावना आणि तेच ते परिणाम अनुभवत राहतो. आयुष्य जणू भोवऱ्यासारखं एकाच जागी गरागरा फिरायला लागतं. अशांत मनाला कशातच रस वाटत नाही, त्याला काही चांगलं दिसत नाही आणि काही चांगलं आठवत नाही. मनाचा प्रत्येक कोपरा काळ्याकुट्ट अंधाराने भरून जातो तेव्हा एक दिवा जरी लावला तरी अशा मानसिकतेतून बाहेर पडायला मदत होऊ शकते. अगदी घोर निराशा नसली तरी जेव्हा जेव्हा एकटं आणि उदास वाटेल त्यात्या वेळी हीच एक सवय तुम्हाला तरून नेऊ शकते. कुठली सवय?   कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय!   समजा तुम्ही फक्त फिरायला म्हणून बाहेर पडलाय! मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलंय हे करू का ते करू अशा अनेक विचारात तुम्ही गुरफटून गेलाय. विचार करता करता तुम्ही चालताय आणि चालत चालत तुम्ही एका झाडीत शिरता, थोडं पुढे थोडं पुढे करत जात राहता पण नंतर मात्र तुम्...

बिकट प्रसंगात कृतज्ञ राहणं सोपं आहे का?

Image
आयुष्यात सगळं काही अगदी सुरळीत, मनासारखं चाललेलं असतं, अपेक्षेपेक्षा पदरात जास्तच पडतं, हात लावेल तिथे सोनं अशी परिस्थिती असते तेव्हा तुम्ही मनापासून कृतकृत्य होत असाल. देवाचे किती आभार मानू आणि किती नको असे होत असेल. इतकं भरभरून दिल्याबद्दल तुम्ही त्याचे वारंवार आभारही मानत असाल पण, समजा हेच उलटं असेल तर? खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, रोजचा दिवस अगदी जीवावर उदार होऊन ढकलला जात असेल, मनावर निराशेचे मळभ दाटून आले असेल, कष्ट करूनही हाती फक्त शून्य लागत असेल तर? तर अशा परिस्थितीत कोणी कसे काय कृतज्ञ राहू शकेल. या परिस्थितीत कोणाला कृतकृत्य वाटेल? अशावेळी देवाकडे फक्त तक्रार केली जाते हे माझ्याच वाट्याला का? बरोबर ना?   Image source : Google खरे तर कितीही वाईट, दुर्धर, प्रसंग असला तरी त्यातही काही तरी चांगले दडलेले असते. अशा संकटाच्या काळातही तुमच्यातील आशावाद थोडासा तरी लुकलुकत असतो. मग अशा दिवसात जे काही हाताशी आहे त्याबद्दल नको का आभार मानायला? तुमच्या बिकट आणि खडतर परिस्थितीतही जर तुम्ही सकारात्मक राहायला शिकलात तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. ...

मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी या प्रकारचा आत्मसंवाद तुम्ही कधी केलाय का?

Image
“रोजचा दिवस कुठे उगवतो आणि धावपळीत कसा मावळतो हेही कळत नाही. दिवसभरात कसला तो निवांतपणा नाही. नुसती दगदग दगदग दगदग! आणि इतकं करून मिळतं काय? काहीच नाही. प्रत्येकाकडून आम्हालाच बोलून घ्यावं लागतं.” श्रियाचा पारा चांगलाच चढला होता. आज ऑफिस मध्ये असूनही ती नसल्यासारखीच होती. सकाळी सकाळीच स्वारी भलतीच नाराज आणि भडकलेली दिसत होती. खरं तर श्रियाच काय पण कधी कधी आपणही असे विनाकारण भडकलेले असतो. आपल्या मनात नेमका कसला संताप खदखदतोय ते आपल्यालाही कळत नसते. होतं काय की रोजच्या धावपळीत आपण आपल्या मानसिक अवस्थेकडे लक्षच देत नाही आणि मग आतली उलथापालथ अशी अचानक बाहेर पडते.   Image source : Google आपल्या मनाची उलथापालथ अशी अचानक बाहेर पडत असेल, सतत आपला संताप होत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवरूनही पारा चढत असेल तर आपण थोडं आपल्या मनाकडे लक्ष द्यायला हवंय. कारण, राग राग करणाऱ्या, सतत चीडणाऱ्या व्यक्तीसोबत राहायला इतरांनाही आवडत तर नाहीच पण तुम्हाला स्वतःलाही पुढे जाऊन या गोष्टीचा मोठा फटका बसू शकतो.   आपले व्यक्तिमत्व प्रसन्न, शांत, प्रफुल्लीत आणि उत्साही बनवायचे असेल तर आपल्या मनाशी हो...

एकटे राहण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Image
तो स्वतः पार्ट्या, मित्रपरिवार, मौजमजा करण्यात व्यस्त असतो पण तिच्यावर संशय घेतो. तिने घरातून बाहेर पाऊल जरी ठेवलं तरी त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. तिने कुठं जायचं, कुणाला भेटायचं, कधी भेटायचं हे सगळं तोच ठरवतो. तिने घरातील कामे वेळेत केली नाहीत की लगेच तिला वेळेचा हिशोब विचारतो.   तो कधी कधी उशिरा घरी येतो. त्याला काही तरी नवं शिकायचं आहे. तिला मात्र त्याचं हे तासानतास बाहेर राहणं आवडत नाही. सतत त्याच्या घरच्यांच्या संपर्कात राहतो म्हणून तिला चीड येते. तिच्या मागण्या पूर्ण नाही केल्या की घर डोक्यावर घेते. सतत हे का? ते कशासाठी विचारत राहते? भुणभुण लावते.   Image source : Google दोन्ही उदाहरणे वेगवेगळी आहेत पण दोन्ही ठिकाणी समस्या एकच आहे, जोडीदार!   प्रत्येक जोडप्यात तशा कुरुबुरी आणि तक्रारी असतातच. शंभर टक्के प्रेम किंवा शंभर टक्के तिरस्कार असा कुठल्याही नात्यात नसतं तरीही काही काही ठिकाणी काही लोक आपल्या हट्टापोटी, असुरक्षितते पोटी इतरांच्या पायात बेड्या अडकवतात. प्रेम करणं म्हणजे सतत दुसऱ्याची काळजी करणं नव्हे हे अशा लोकांना समजतच नाही किंवा सतत दुसऱ्य...

नात्याच्या बाबतीत चोखंदळपणा हवाच!

Image
काही लोक कुठलीही वस्तू घेताना, खरेदी करताना किती पारखत बसतात. त्यांना जशी हवी तशी वस्तू मिळाल्याशिवाय ते खरेदी तर करणार नाहीतच पण, ‘घे रे आता अॅडजस्ट करून,’ असे म्हटले तर ऐकणारही नाहीत. एकदम चोखंदळ. वस्तूच्या बाबतीत ठीक आहे पण काहीजण नात्याच्या बाबितीतही तितकेच चोखंदळ असतात. थोडसं जमवून घ्यावं नमतं घ्यावं आपल्या अपेक्षांना मुरड घालावी यातलं काही म्हणता काही त्यांना जमत नाही. त्यांच्या अटीवर ते ठाम असतात. इतका पण काय तो चोखंदळपणा किमान नात्याच्या बाबतीत तरी बरा नव्हे हं! असा सूर तुम्ही आजूबाजूला अनेकदा ऐकला असेल.   Image Source : Google “काय बाई किती पोरी बघितल्या तरी या सुदेशला एक पोरगी पसंत पडत नाही. कुठली अप्सरा आणणार आहे कुणास ठाऊक?”   “मुलीचं वय काय आणि यांच्या अपेक्षा काय, जरा तरी कुठे तडजोड नको का करायला? कायमची घरात बसली की मग कळेल.”   असे टोमणे आणि चर्चा तुमच्याही   कानावर पडत असतील. केवळ या टोमण्यांपासून तुमची सुटका व्हावी म्हणून जर तुम्ही घाई केलीत तर पुढे जाऊन तुम्हालाच पश्चाताप होणार आहे. नात्यांच्या बाबतीत चोखंदळपणा दाखवलेला अनेकांना आवडत नाह...

झोपेचं खोबरं होतंय?

Image
कोरोनामुळे गेले वर्ष दीड-वर्षं आपण सगळेच आरोग्याबाबत कधी नव्हे तेवढे सतर्क झालो आहोत. चांगली रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्तीला शक्यतो कोरोनाचा फार काही त्रास होत नाही, हे माहीत झाल्याने लोक खरोखर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकडे काळजीने आणि जागरूकतेने लक्ष देत आहेत. आरोग्याबाबत आलेली ही सतर्कता तशी चांगलीच म्हटली पाहिजे. त्याचवेळी वर्क फ्रॉम होममुळे विस्कळलेले शेड्युल, अनेकांना घरात कोंडून राहण्याचा आलेला मानसिक ताण, विस्कटलेली आर्थिक घडी, कोरोनामुळे सततची आरोग्याची चिंता, आपल्या जवळच्या लोकांची आरोग्याची, सुरक्षेची, सुरक्षित भविष्याची चिंता, काहींच्या वाट्याला आलेले एकाकीपण या कोरोनामुळे आणखी गडद झाले आहे. त्यात सतत अपडेट राहण्याचा आणि माहितीचा भडिमार झेलण्याचा एक वेगळाच ताण. काहींनी कोरोनाच्या लाटेत आपले आप्तस्वकीय, कुटुंबीय गमावले आहेत. थोडक्यात काय तर कोरोनाच्या आधीही आपल्या आयुष्यात प्रश्न, समस्या होत्याच पण कोरोनाने त्या आणखी तीव्र केल्या आहेत.   Image Souce : Google image या सगळ्या चिंता कुणासमोर बोलून दाखवणार? कारण घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाण...

संवादाचा पूल की संशयाची झूल? नाते कशावर टिकेल?

Image
माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत जगत असतो. प्रत्येक नात्याची भूमिका वेगळी असली तरी, त्याचा पाया मात्र एकच असतो, तो म्हणजे विश्वास. फक्त नवरा-बायको किंवा प्रियकर प्रेयसी यांच्यातच नाही तरी आई-मुलगी-मुलगा-वडील, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी, अशा सगळ्याच नात्यात विश्वासाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. विश्वासाचा हा पायाच डळमळला तर, नात्याला तडे जायला सुरुवात होते. माणूस कोणत्या एकाच नात्यावर जगतो असं नाही तर त्याला नात्यांचं सुरक्षित पर्यावरण हवं असतं. या पर्यावरणातील एका जरी नात्याला धक्का लागला तरी त्याचा इतर सगळ्याच नात्यांवर परिणाम होतो.   Image source : Google Image मनात एकदा का संशयाचं मूळ रुजू लागलं की याने तुमची मानसिकता तर बिघडतेच पण तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींचीही मानसिकता बिघडून जाते. ज्याच्यावर संशय घेतला जातोय त्या व्यक्तीवर तर हा थेट भावनिक हल्लाच असतो. हा हल्ला कसा परतवून लावायचा याचं जर योग्य ज्ञान त्या व्यक्तीजवळ नसेल तर, ती व्यक्ती भावनिकतेच्या लाटेत वाहवून जाण्याचीच शक्यता जास्त. अशा वाहवत जाण्याला न कळत आपल्याकडूनच हातभार लावला जातो.   पहिल्...

अडचणी तर येणारच म्हणून जगणं सोडून द्यायचं का?

Image
प्रत्येकाच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय असते स्वप्न असते. काहीजण शेवटपर्यंत या स्वप्नांचा पाठलाग करतात तर काहीजण मध्येच थकून जातात. ज्यांना शेवटपर्यंत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे जमले ते इतिहास घडवतात आणि ज्यांनी आपली स्वप्ने अर्ध्यातच सोडली ते फक्त नोंद बनून राहतात.   Image source : Google आयुष्याच्या प्रवासात अडचणी आणि अडथळे तर प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. जे लोक अडचणींचा बाऊ करतात ते अडचणीतच गुरफटून जातात. ज्यांना अडचणींचा बाऊ न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतात त्यांच्या पुढील अडचणी पालापाचोळ्या प्रमाणे उडून जातात.   श्रद्धाला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिच्या हालचाली तिच्या लकबी एका जन्मजात नर्तकीला शोभतील अशाच होत्या. तिने नृत्य शिकण्याची इच्छा आपल्या आई-बाबांजवळ बोलून दाखवली. पण, घरंदाज कुटुंबातील मुली असलं काही शिकत नसतात अशी सबब देऊन बाबांनी तिची मागणी उडवून लावली. बाबांची नाराजी पाहून श्रद्धाने नृत्य हा विषयच आपल्या प्राधान्यक्रमातून उडवून लावला. ती जाणूनबुजून आपले लक्ष इतर गोष्टीत रमवू लागली. तरीही तिला कोणत्याच गोष्टीत मन रमत नव्हते. कुठल...

काही लोकांना तुमच्यापेक्षा जास्त तुमच्याशी भांडण्यातच इंटरेस्ट असतो!

Image
भांडणं होण ही तशी सामान्य बाब. तसही भांडणाने प्रेम वाढतं असं म्हणतात. प्रेमातील चव जपणारी, लटकी, लुटुपुटूची भांडणं होण्यात काही वाईटही नाही म्हणा! पण जर कुणी मुद्दामच तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करत असेल. सतत तुमचा अपमान करत असेल, तुमच्याशी वादावादी करुन समाधान मिळवत असेल तर? काही लोकांना भांडण करण्याची हौसच असते आणि ते फक्त आपल्या जाळ्यात कोणी बकरा अडकतो का या संधीच्या शोधात असतात. आता अशा लोकांच्या जाळ्यात अडकून बकरा व्हायचं की भुर्रकन उडणारं कबुतर व्हायचं हे तुम्हीच ठरवा.   Image source : Google image मुद्दाम भांडणं उकरून काढणारी लोक असतात तरी कोण? या लोकांचे चार प्रकार पडतात. पहिले म्हणजे ज्यांना तुमच्यावर नाहक इर्षा वाटत असते असे. दुसरे म्हणजे ज्यांना स्वतःबद्दल अजिबात आत्मविश्वास नसतो, सतत भीती आणि तणावाखाली असतात असे. तिसरे ज्यांना आपण कुणाला तरी आपल्या बोलण्यातून दुखावत आहोत हे त्यांच्या गावीही नसणारे. आपल्या बोलण्याचा वागण्याचा समोरच्यावर काय परिणाम होईल याची जराही फिकीर नसणारे निष्काळजी आणि फटकळ लोक आणि चौथे तुमच्यावर प्रेम करणारे.   समोरचा माणूस या चारपैकी क...