इंग्रजांना धूळ चारणारी पहिली भारतीय रणरागिणी : राणी वेलू नचियार!
Image source : Google भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात १८५७ चा उठाव हा इंग्रजांविरोधातील पहिला उठाव मनाला जातो. पण, त्याच्याही आधी जेव्हा इस्ट इंडिया कंपनी भारतात हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा एका भारतीय राणीने इंग्रजांना असा धडा शिकवला होता की इंग्रजांनी पुन्हा तिच्या राज्याकडे डोळा वर करून पाहण्याचीही हिंमत केली नाही. आपल्या पतीच्या पश्चात आपल्या राज्याचे समर्थपणे रक्षण करणाऱ्या या राणीचे नाव होते राणी वेलू नचियार. इंग्रजांना धूळ चारणाऱ्या या राणीची यशोगाथा खूप कमी लोकांना माहिती आहे. या लेखाच्या माध्यमातून राणी वेलू नचियारच्या साहसी जीवनगाथेवर प्रकाशझोत टाकण्याचा एक प्रयत्न! ब्रिटीश सत्तेविरोधात आवाज उठवणारी राणी वेलू नचियार ही पहिली राणी होती. १८५७च्या उठावाच्या आधी शंभर वर्षे या आपल्या राज्यातून इंग्रजांना पळवून लावले होते. यामुळे तिला भारताची पहिली स्वातंत्र्य योद्धा म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तामिळनाडूमध्ये आजही वीरमंगाई (वीरमाता/ brave lady ) म्हणून तिचा आदराने उल्लेख केला जातो. राणी वेलू नाचीयार ही रामनाड राज्याचे शासक राजा चेल्लूमुत्थू वि...