Posts

Showing posts with the label positive mind

सतत सतावणाऱ्या चिंतेवर काय उपाय करू शकतो? कधी विचार केला आहे का?

Image
आयुष्यात प्रत्येकालाच कशा ना कशाची चिंता लागून राहिलेली असते. कसलीच चिंता नाही असा मनुष्य शोधूनही सापडणार नाही. कुणाला शिक्षणाची , कुणाला नोकरीची , कुणाला लग्न होत नाही त्याची , कुणाचं कुटुंबीयांसोबत पटत नाही त्याची. दररोज घडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या चिंतेत नवी भर टाकत असतात. आज ऑफिसमध्ये कुणी काही बोललं. घरात वाद झाले. आर्थिक फटका बसला. व्यवसायात कुणी फसवणूक केली. अशा मोठ्या घटना तर पार आपल्याला हादरवून टाकतात तेव्हा चिंता वाढते. वाढलेली ही चिंता सावलीसारखी आपल्या पाठीशी चिकटून राहते. मग जिथे जाईल तिथे आपल्याला चिंता दिसायला लागते. यात - त्यात प्रत्येकात!   चिंता किंवा काळजी वाटणं ही तशी फार सामान्य गोष्ट आहे. पण , हीच चिंता जेव्हा पाठ घेते तेव्हा मात्र ती फक्त एक भावना न राहता रोग बनून जाते. अति तिथे माती होतेच. अति चिंता जेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते, तुमच्या दैनंदिन कामात लुडबुड करते, तुमचा ताबा घेते, तेव्हा तिला Anxiety disorder म्हणतात. तुम्हाला नेहमीच कशा ना कशाची चिंता वाटत असेल , त्यामुळे तुम्हाला भीती वाटणे , घाम फुटणे , अंग थरथरण...

तुमच्या नात्यात या गोष्टी असतील तर तुमच्या जोडीदाराशी असलेलं तुमचं नातं आणखी दृढ होऊ शकतं.

Image
नात्यात वाद-विवाद , मतभेद, रुसवे फुगवे, राग हे होतंच राहतं. या सगळ्या दुविधांच्या पलीकडे जाऊन नातं अधिक दृढ आणि बळकट करायचं असेल तर नात्यासाठी आवर्जून वेळ द्यावा लागतो. जोडीदाराशी जुळवून घेणं, त्याला समजून घेणं, त्याला वेळ देणं, एकमेकांच्या अडचणी , समज गैरसमज शेअर करणं , त्याबद्दल बोलणं , एकमेकांना मदत करणं , मार्ग काढणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सुखी संसारासाठी याच गोष्टी फार महत्वाच्या असतात. आर्थिक स्थैर्य, समाजिक प्रतिष्ठा , मान्यता यांच्याही पलीकडे नात्यात दोघांच एक वेगळं जग असतं. हे जग सुंदर करण्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतात. आता बघूया नातं सुंदर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं उपयुक्त ठरतील. लक्षात घ्या या सगळ्याच गोष्टींसाठी एकमेकांच्या व्यस्त दिनक्रमातून काही खास वेळ काढणं गरजेचं आहे. आणि हा खास वेळ फक्त याच कामासाठी वापरायचा, हे लक्षात राहणंही गरजेचं आहे. नातं टिकवणं ही कुणा एकट्याची जबाबदारी नसते. यासाठी दोन्ही बाजूंनी तितकीच ओढ असायला लागते. डेटिंग – अतिशय मस्त आणि मस्ट अशी ही कल्पना आहे. मुव्ही किंवा डिनर डेट या कल्पना चांगल्याच आहेत. पण याव्यतिरिक्त तुम...

आयुष्यातील कोणताही संघर्ष स्वप्रेमाच्या बळावरच जिंकता येतो!

Image
संपूर्ण आयुष्यात उलथापालथ घडवून आणणारी एखादी घटना आपल्या मनावर इतका खोलवर परिणाम करून जाते की आपला स्वतःवरीलच विश्वास डळमळीत होतो. परिस्थिती बदलते पण तिच्या खुणा/व्रण मनावर कायम राहतात. अशावेळी हताश न होता पुन्हा नव्या जिद्दीनं उभं राहणं यालाच तर संघर्ष म्हणतात. लक्षात ठेवा आयुष्यात संघर्षाचे अनेक प्रसंग येतील जातील या प्रसंगात कोणी तुमची साथ देईल कोणी सोडून जाईल. पण , या सगळ्या प्रसंगात एक साथ महत्वाची...ती म्हणजे स्वतःची साथ.   सगळं काही संपलं असं वाटत असतानाच पुन्हा नव्या जिद्दीनं उभं राहण्यासाठी लागतो तो आत्मविश्वास आणि स्व-प्रेम. पण आत्मविश्वासच नसेल तर स्वत:वर प्रेम तरी कसं होणार. त्यासाठी आधी आत्मविश्वास पुन्हा मिळवावा लागणार. तो आपल्यातच कुठे तरी दडी मारून बसलेला असतो. हरलेला असतो. त्याला पुन्हा शोधून बळ देणं हे आपलंच काम. त्यासाठी कुणाची वाट पाहत बसलात तर ते कधीच शक्य होणार नाही. गमवलेला आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवायाचा आणि स्वतःवर प्रेम कसं करायचं ? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर , हा संपूर्ण लेख वाचाच.   आत्मविश्वास नसेल तर स्वतःबद्दल वाटणारी आस्था ,...

तणाव हाताळण्याच्या काही प्रभावी पद्धती!

Image
दररोजच्या थकवा आणणाऱ्या रुटीन कामापासून ते अचानक उभ्या राहिलेल्या एखाद्या संकटामुळे आपल्याला तणाव जाणवतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी कामे अशी असतात ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही थकवा येतो. हा थकवा किंवा हा तणाव कमी करण्यासाठी आवर्जून वेळ दिला नाही तर तो वाढत जातो आणि एखाद्या दिवशी याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.  आपण नेहमीच बाह्य परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. पण मनस्थिती जर नीट हाताळता आली तर येणारा तणाव आणि त्यामुळे निर्माण होणारी शारीरिक-मानसिक गुंतागुंत आपण नक्कीच टाळू शकतो. तणाव तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. अतिरिक्त तणावामुळे तुमचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते. म्हणूनच शरीर आणि मन दोन्हीवरील ताण  हलका करणं खूपच गरजेचं आहे. या लेखात आपण तणाव हाताळण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनाचा आनंद घेऊ शकाल आणि तणावाच्या गंभीर परिणामापासून स्वतःला दूर ठेऊ शकाल. आता तणाव निवळण्यासाठी प्रत्येकाला एकच मात्रा लागू होईल असे नाही. प्रत्येकाला येणाऱ्या तणावाचे कारण ...

नकारात्मक विचारांना सकारात्मक दिशा देता येते./Flip negative thoughts into positivity!

Image
  दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार येत असतात. यातील कित्येक विचार हे नकारार्थी आणि आपल्याला मागे खेचणारे असतात. ‘वैरी न चिंती ते मन चिंती,’ असं उगीच म्हटलेलं नाही. आपल्याबद्दल ते आपल्या वैऱ्याच्याही मनात कधी येणार नाही ते आपल्या मनात आधीच येऊन गेलेलं असतं. ‘रिकामं मन सैतानाचं घर,’ अशीही म्हण आपल्याकडे रूढ आहेच. या सगळ्या म्हणीतून हेच सांगायचं आहे की, मनातील विचारांकडे आपले लक्ष असेल तर आपल्या कितीतरी चिंता निर्माण होण्याआधीच दूर होतात. आता प्रसादचंच उदाहरण घ्या. गाडी चालवायला शिकून त्याला आत्ता जवळपास दहा वर्षे तरी होत आली. अनेकदा त्याने दिवसरात्र प्रवास करून लांबचे अंतर कमी वेळेत पार केलेले आहे. पण, त्यादिवशी घरातून पार्टीला जाताना मध्येच त्याच्या मनात विचार आला, आपण इतकी फास्ट गाडी चालवतो पण, कधी कुठे अपघात झाला तर काय करणार? झालं या एका विचारातून त्याच्या मनात पुढे नकारात्मक विचारांची मालिकाच तयार झाली आणि अपघाताच्या नुसत्या कल्पनेनेच त्याला दरदरून घाम फुटला. खरं तशाही अवस्थेत तो गाडी चालवत होताच पण नुसत्या कल्पनेने त्याला हतबल करून सोडले. पण, अपघाताचा विचार त्याच्या मनात आला ...

नकोशा आठवणींचा ससेमिरा कसा टाळावा, यासाठी काही टिप्स./Tips to release painful memories.

Image
आठवणी चमत्कारिक असतात. आठवणी आपल्याला उलट्या पावलांनी भूतकाळात जायला भाग पाडतात. भूतकाळातील आठवणी आपला वर्तमान आणि भविष्यकाळही प्रभावित करत असतात. काही आठवणी सुखद असतात. ज्या आपल्याला आनंद देतात, तर वाईट आठवणी मात्र विंचवासारख्या डसत राहतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळाले, शिक्षकांनी कौतुक केले, नोकरीसाठी दिलेली मुलाखत यशस्वी झाली, अशा आठवणी आपल्याला प्रेरणा देतात. पण एखाद्या व्यक्तीशी झालेले भांडण, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, एखादा अपघात, कुणीतरी केलेली फसवणूक, प्रेमभंग अशा आठवणी आपल्याला आणखी कमजोर बनवतात. आठवणींचा हा खेळ जर जास्तच त्रासदायक होत असेल, तर काय करावं? या वाईट आठवणींच्या जंजाळातून सुटण्याचा काहीच मार्ग नसेल का? होतं काय घटना भूतकाळात घडून गेली असली तरी तिचे व्रण वर्तमानातही खुपत राहतात. काहींसाठी या आठवणी डिप्रेशनचे कारणही ठरतात. या आठवणींच्या दुष्ट पंजातून सुटका करून घ्यायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला तसा निश्चय करावा लागेल आणि दुसरी गोष्ट त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागेल. तुमच्या या आठवणी आठवणीत राहिल्या तरी त्या  तुम्हाला छळणार नाहीत. भूतकाळातील आठवणी बाजूला सा...

आनंद कशाकशात आणि किती असतो. जाणून घेऊया

Image
आयुष्यात प्रत्येकाला आनंदी व्हायचं असतं. प्रत्येकाची आनंदाची व्याख्याही वेगवेगळी असते. आनंद म्हणजे अशी भावना ज्यात समाधान, पूर्णता आणि तृप्तता असेल. आनंदाचेही कित्येक प्रकार आहेत. प्रत्येक सकारात्मक भावना आनंदाशी निगडीत आहे. आयुष्यात समस्या, संघर्ष, तणाव असणारच आहे तरीही त्यांच्यासोबत जुळवून घेण्याची क्षमता आपल्याला या आनंदी क्षणातूनच मिळते. आनंद शोधण्याचे कित्येक मार्ग आहेत. हे मार्ग जाणून घेऊन ते अवलंबता आले तर, आयुष्यातील निराशा, दु:ख, त्रास थोडा तरी कमी होईल. यातील बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती असतील आणि काही नव्या असतील. वेगवेगळ्या परिस्थितीतही स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आनंदाचे हे प्रकार तुम्हाला माहीत असायला हवेत. १.         कृतज्ञता – दैनंदिन जीवनातील चांगल्या गोष्टींची दखल घेण्यास कृतज्ञता खरोखर उपयुक्त ठरते. आजूबाजूला असणाऱ्या चांगल्या गोष्टी, वस्तू आणि व्यक्तींची जाणीव होते. यामुळेही आपल्या आनंदात भर पडते. २.        नवा अनुभव – काही नवी गोष्टी केल्याने मिळणारा आनंद तुम्हीही अनुभवला असाल. नव्या ठिकाणांना भेट द...