“समय सबसे बडा जादुगार हैं,”असं म्हटलं जातं ते
खरं आहे. काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या पाहा ना... कधी काळी टीव्ही
पाहण्यासाठी शेजारच्या घरी जाऊन बसावं लागायचं आणि आज टीव्ही आपल्या सर्वांच्या हातात
आला आहे. (मोबाईलच्या रुपात हो!) अशा किती तरी बदलेल्या गोष्टी तुम्हालाही जाणवत
असतील. पूर्वी देवळात गेल्यानंतर शांतपणे देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पुजारी
आपल्या हातावर प्रसाद म्हणून साखर, फुटण्याची डाळ, तीर्थ (साधं पाणीच), किंवा लाडू,
खोबरं (असं जे काही भाविकांनी देवाला नैवेद्य म्हणून चढवलं असेल तेच) ठेवायचे. पण,
आता या प्रथेतही मोठा बदल होऊ पाहतो आहे.
jaydurgapeetham.org |
इथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित
करण्यासाठी ही कल्पना प्रभावी ठरत असल्याचे इथल्या हर्बल ऑंकॉलॉजिस्ट असलेल्या के
श्री श्रीधर यांचे मत आहे. यातून आम्हाला फक्त हे दाखवून द्यायचे आहे की, जे काही
पोषक मूल्यांनी भरपूर आणि स्वच्छतेचे नियम पळून बनवले गेले असेल ते सर्व देवाला
चालते. फक्त पारंपरिक पदार्थांचाच नैवेद्य म्हणून दाखवला पाहिजे असे काही नाही.
wikipedia.org |
या मंदिराने आणखीही एक चमत्कारिक पाउल उचलले
आहे. एखाद्या दिवशी जर एखाद्या भाविकाचा वाढदिवस असेल त्या दिवशी त्याच्यासाठी खास
केक बनवून त्याला प्रसाद म्हणून दिला जातो. यासाठी मंदिरात येणाऱ्या प्रत्येक
भाविकाची जन्मतारीख मंदिराच्या कंप्युटर सिस्टीममध्ये नोंद केली आहे. विशेषत:
वृद्ध भाविकांसाठी तर हा एक आनंदोत्सवच ठरत आहे. कारण, किमान मंदिरात तरी त्यांचे
वाढदिवस लक्षात ठेवले जात आहेत आणि तिथून प्रसाद म्हणून त्यांच्यासाठी खास केक
पाठवला जात आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील या स्पेशल दिवसाला आणखीनच स्पेशल
टच मिळत आहे. यात मंदिराने फक्त एकच बदल केला आहे, केक सोबत मेणबत्ती ऐवजी तेलाची
पणती (अगर दिपम) दिली जाते.
निव्वळ जंक फूड प्रसादामध्ये मिळते म्हणून
तरुणाई मंदिराकडे आकर्षित होईल, असे वाटते का?
0 Comments