Posts

Showing posts with the label Indian Independence Day

एकाच वेळी ३० हून अधिक इंग्रज शिपायांचे शिर उडवणाऱ्या उदा देवीची शौर्यगाथा!

Image
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात कोट्यावधी लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंग, राजगुरू सुखदेव, सारखे क्रांतिवीर फासावर चढले. क्रांतिकारी बाबू गेनू सारख्या कित्येकांनी इंग्रजांशी लढता-लढता आपला प्राण त्याग केला, हे तर आपल्याला माहीत आहेच. पण, याच संग्रामातील काही कथा आणि व्यक्ति अशाही आहेत ज्यांची इतिहासाने पुरेशी दखल घेतलेली नाही. आपल्या प्राणाचे बलिदान देऊन ३० पेक्षा जास्त ब्रिटीश सैनिकांना धारातीर्थी पडणाऱ्या उदा देवी पासी या विरांगणेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कदाचित फक्त मोजक्या लोकांनाच याची माहिती असेल बहुतांश लोकांना नाही. धाडस, शौर्य, जिद्द, जोश आणि पराक्रम यांची धगधगती ज्वाला म्हणजे उदा देवी! उदा देवीच्या पराक्रमाची ही गाथा वाचल्यानंतर तुमचे रक्तही सळसळल्या शिवाय राहणार नाही.   Image source : Google तो काळ होता १८५७ चा. भारतात सर्वत्रच ब्रिटीश विरोधी रोष शिगेला पोहोचला होता. विविध संस्थानिकांपासून सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाच्या मनात ब्रिटीश विरोधी असंतोष खदखदत होता. ठिकठीकाणच्या संस्थानातून ब्रिटिशांच्या विरोधात मोहीम छेडली जात होती. या उठवात स्त्रियाही पुढे ...

संपन्न आणि घरंदाज कुटुंबातील जानकीदेवी बजाज यांनी घरच्या समृद्धीचा त्याग करून स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले.

Image
Image source : Google भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिला आघाडीवर होत्या. यापैकी खूप कमी नावं आपल्या ओळखीची आहेत. बरीच नावं तर अजूनही अज्ञात आहेत. असेच एक नाव म्हणजे जानकीदेवी बजाज. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या आणि त्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनांत सहभागी होणाऱ्या जानकीदेवी बजाज यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत.   जानकी देवी यांचा जन्म १८९३ साली मध्यप्रदेश मधील जवोरा गावातील एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यांची आई मैना देवी म्हणजे साधेपणा आणि प्रेमळतेचे मूर्तिमंत प्रतीक. त्यांना दोन भाऊ होते चिरंजी लालजी आणि पुरुषोत्तम दास. हे कुटुंब पैशाने धनवान होते आणि मानानेही. गावातील सर्व थरातील लोकांना कधीही कशाचीही मदत लागली तरी, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता हे कुटुंब इतरांना मदत करण्यास सरसावत असे. हिंदू वैष्णव कुटुंबात जन्मलेल्या जानकीदेवी अशा पारंपरिक आणि उदार वातावरणातच मोठ्या झाल्या. १९०२ साली वयाच्या नवव्या वर्षी जानकीदेवी यांचा जमनालाल बजाज यांच्याशी विवाह झाला. हेच ते जमनालाल बजाज ज्यांनी पुढे   प्रसिद्ध बजाज उद्योगाचा पाया रचला. जमनालाल यांच्याशी विवाह...