Posts

Showing posts with the label जाणून घ्या.

नकारात्मक विचार पळवून लावण्यासाठी तुम्ही कधी हे मार्ग अवलंबले आहेत का?

Image
“मी आज नवीन काही तरी शिकलं पाहिजे.” “नाही तर नकोच, काही नाही जमलं तर उगाच वेळ वाया जाणार, वर उरलेली कामं होतील तीही नाही होणार.” वरील प्रकारचा संवाद हा आपलाच आपल्याशी होणारा संवाद आहे. दिवसातून आपण कित्येक गोष्टीवर असा स्वसंवाद साधत असतो. यातील काही भाग सकारात्मक तर फार मोठा भाग हा नकारात्मक स्वरूपाचा असतो. बारकाईने पाहिलं तर इतर कुणाहीपेक्षा आपला हा स्वसंवादच आपल्यासाठी प्रेरणादायी किंवा आपल्याला खचवणारा असतो. विज्ञानाच्या मते एका दिवसात माणसाच्या डोक्यात ७० हजारहून जास्त विचार जन्म घेतात. यातील सकारात्मक किती नकारात्मक किती हे आपण मोजू नाही शकाणार पण, यात नकारात्मक विचारांचा वाटा नक्कीच जास्त असतो. खरं तर कुणालाच आपण नकारात्मक विचार करावेत असं वाटत नाही किंवा कुणीही ठरवून नकारात्मक विचार करत नाही. याउलट सकारात्मक विचार ठेवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक आपल्या विचारांवर काम करावे लागते. आजच्या या लेखात आपण हेच पाहणार आहोत. किमान, नकारात्मक विचार ओळखून ते बाजूला कसे करायचे यावर जरी आपण विचार केला तरी पुष्कळ होईल.   २४ तास सकारात्मक राहणं कुणालाही शक्य नाहीच, तरीही किमान नका...

मोहित करहानाला संशोधनासाठी मिळणार पावणे दोन कोटीची फेलोशिप! (Mohit karhana)

Image
लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हर नहीं होती| प्रयत्न करत राहणाऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळतेच. याचे ताजे उदाहरण म्हणजे हरयाणाचा मोहित करहाना! २२ वर्षाच्या मोहित करहानाला ( Mohit Karhana) अमेरिकेच्या केंटुकी युनिव्हर्सिटीकडून ( University of Kentucky)   पीएचडी साठी पावणे दोन कोटीची स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. indiatimes.com हरियाणा राज्यातील गुरूग्राम जिल्ह्यातील गुलाखुवास गावापासून मोहितचा प्रवास सुरू झाला. शालेय जीवनापासूनच मोहित अभ्यासात हुशार होता. त्याची आई बबिता करहाना यांनी नेहमीच आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्या स्वतः देखील सरकारी सेवेत कार्यरत आहेत. मोहितची आई बबिता यांना लग्नानंतर उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य झाले नाही. लग्नानंतर काही वर्षानी त्यांच्या पतीचा गंभीर अपघात झाला ज्यामुळे सुमारे दीड वर्षे तरी त्यांना आयसीयूत ठेवावे लागले होते. अशा सर्व खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण अतिशय चांगल्याप्रकारे पूर्ण केले. त्यांची मुलगी अंजली चंडीगड विद्यापीठा...

प्रसाद म्हणूनचेन्नईच्या या मंदिरात दिले जाते ब्राऊनी, सँडविच आणि केक....

Image
“समय सबसे बडा जादुगार हैं,”असं म्हटलं जातं ते खरं आहे. काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या पाहा ना... कधी काळी टीव्ही पाहण्यासाठी शेजारच्या घरी जाऊन बसावं लागायचं आणि आज टीव्ही आपल्या सर्वांच्या हातात आला आहे. (मोबाईलच्या रुपात हो!) अशा किती तरी बदलेल्या गोष्टी तुम्हालाही जाणवत असतील. पूर्वी देवळात गेल्यानंतर शांतपणे देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पुजारी आपल्या हातावर प्रसाद म्हणून साखर, फुटण्याची डाळ, तीर्थ (साधं पाणीच), किंवा लाडू, खोबरं (असं जे काही भाविकांनी देवाला नैवेद्य म्हणून चढवलं असेल तेच) ठेवायचे. पण, आता या प्रथेतही मोठा बदल होऊ पाहतो आहे. jaydurgapeetham.org   चेन्नईतील पेडप्पाई भागातील एका मंदिरात चक्क ब्राऊनी, बर्गर, चेरी टोमॅटो सॅलड आणि सँडविच प्रसाद म्हणून वाटला जात आहे. कहर म्हणजे या प्रसादाच्या पाकीटावर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा शिक्का आणि उत्पादन तिथी, एक्सपायरी डेट देखील छापली आहे.   पेडप्पाई भागातील जय दुर्गा पिठ्म मंदिरातील फक्त प्रसादाचा मेन्यूच बदलेला नाही तर प्रसाद वाटण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाल...

कनिका टेकरीवाल, अवघ्या ३२व्या वर्षी कोट्यावधींची उलाढाल करणारी बिझनेसवूमन! /Kanika Tekariwal

Image
मंजिल उन्ही को मिलती है, जिनके सपनो में जान होती है| सिर्फ पंखो से कुछ नाही होता, हौसलों सें उडान होती है| स्वप्न आकाशाला गवसणी घालणारी असतात तेव्हाच वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करता येते म्हणून तर वयाच्या २१ व्या वर्षी कॅन्सरला हरवून २२ व्या वर्षी स्वतःचा स्टार्टअप सुरु करणारी कनिका टेकरीवाल आज इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. आज जिकडे तिकडे कनिकाचीच चर्चा दिसते आहे. अर्थातच तिची झेपच इतकी उंच आहे की, चर्चा तर होणारच! google image अवघ्या ३२ व्या वर्षी दहा प्रायव्हेट जेट जिच्या नावावर आहेत ती कनिका आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. जगातील १०० श्रीमंत महिलांच्या यादीत तिने आपले स्थान निर्माण केले आहे आणि हे करत असताना वाटेतील प्रत्येक अडथळ्यावर तिने यशस्वी मात केलेली आहे.   एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी आज गाडी, रेल्वे,बस असे कित्येक पर्याय आहेत. त्यातही अति वेगवान पर्याय कुठला तर प्रायव्हेट जेट! पण, हा पर्याय किती लोकांच्या आवाक्यातला आहे? अगदी थोड्या. त्यातही ज्यांना हा पर्याय परवडतो त्यांनाही यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. प्रायव्हेट जेटने प्रवास करण्यासाठी ...

काहीही न करता बसून रहाणं सुद्धा खूप मोठं काम आहे!

Image
कधी कधी सकाळी अंथरुणातून उठावंच वाटत नाही. कुठलंच काम करायला नको दिवस फक्त असाच निवांत असावा...असं वाटणं साहजिक नाही का? दररोज उठून आपण आपलं रुटीन धावपळीचं आणि प्रचंड धकाधकीचं जीवन जगतच असतो. त्यातून एखादा दिवस असा काहीही न करता घालवावासा वाटणं स्वाभाविक आहे. रोजच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येणं ही सामान्य बाब आहे. पण, आपल्याला कामाची इतकी सवय झालेली असते की, काहीही न करता कसं बसायचं? हेच कळत नाही. किंवा आपण बसून राहिलो तर अंगात आळस भरेल, शिवाय कामं तर केलीच पाहिजेत ना? त्याला पर्याय नाही असं म्हणत आपण स्वतःला रेटत नेतो. स्वतःवरच कामाची सक्ती करत राहतो. एखादा दिवस असं स्वतःला अजिबात जबरदस्ती न करता मस्त लोळत काढला जाऊ शकत नाही का? खरं तर हा प्रश्न बायकांना विचारायला हवा. कारण, असा एखादा दिवस त्याच्या नशिबी येणं म्हणजे स्वर्गीय सुखच. नाही का! रोजच्या कामातून सुट्टी ही हवीच. आपल्या शरीराला आणि मनालाही. काहीही न करू वाटणं, म्हणजे आपल्या शरीरानं आणि आपल्या मनानं पुकारलेलं बंडच असतं. अशावेळी काहीही न करता राहणं ही अवघड आणि काही करणं ही अवघड अशी द्विधा अवस्था होते आणि ती ठीक आहे.   ...

तुमची भीती हाच तर तुमच्या मार्गातील मोठा अडथळा नाही ना!

Image
एखाद्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी , एखादी नवे कौशल्य शिकण्यापूर्वी, एखादी नवी कल्पना सत्यात उतरवण्यापूर्वी , आपल्या मनात बरेच प्रश्न थैमान घालत असतात. आता हे मला जमेल का ? मी ठरवतोय तसं नाही घडलं तर ? आता याचा काही फायदा होईल का ? इतका वेळ देणं शक्य होईल का ? असे असंख्य प्रश्न कुठून उगम पावतात माहितीये ?   Image source : Google आपलं रुटीन लाईफ सोडून आपण काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपलं मन विनाकारण असहकार पुकारतं. का तर मनालानव्याने काही व्याप नको असतात. आहेत त्याचाच गुंता सोडवता सोडवता त्याला थकवा आलेला असतो. मग मन अनेक करणं द्यायला सुरुवात करतं. त्यातूनच आपल्या मनात यशाबद्दल संभ्रम आणि अपयशाची भीती बसते. अपयशाची ही भीती सर्वांनाच वाटत असते पण , या अपयशाच्या भीतीवर मात करण्यासाठी काही तरी केलं पाहिजे. जेणेकरून आपणच आपले पाय मागे खेचतोय असे होणार नाही.   यापूर्वी आपण कधी केलय का असलं काही? नाही ना ? मग आत्ता अचानक उठून काहीही करण्यात काय हाशील आहे ? आपल्याला इतकी धावपळ दगदग झेपणार नाही. घर सोडून जायचं पण , मग घरच्या जबाबदाऱ्या कोण बघणार...

स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी आणि शांती मिळवण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटेही वेळ नाही का?

Image
कृतज्ञता ही सर्व सकारात्मक भावनांची जननी आहे, असं म्हटलं जातं. बुद्ध म्हणतात, तुमचा प्रत्येक दिवस कृतज्ञतेने सुरु करा. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणत असे की मला माझे आयुष्य सुखकरपणे जगता यावे म्हणून ज्या-ज्या लोकांची मदत होते त्या सर्वांप्रती मी दिवसातून शंभर वेळा कृतज्ञता   व्यक्त करतो. गोतम बुद्धापासून ते अगदी दलाई लामा यांच्यापर्यंत अनेकांनी कृतज्ञतेचे महत्त्व पटवून दिले आहे आणि ते आचरणातही आणले आहे. या सगळ्या महान लोकांच्या महानतेचे रहस्यच हे होते की ते कृतज्ञ होते.   तुम्हीही जर स्वतःला ही सवय लावून घेतली तर याचे असंख्य फायदे तुमच्या आयुष्यात उतरू लागतील. रोजच्या आयुष्यात कृतज्ञ राहण्याची सवय लावून घ्यायची असेल तर सुरुवातीला तरी तुम्ही कृतज्ञता लेखन केले पाहिजे. कृतज्ञता व्यक्त केल्याने नेमके काय फायदे होतात जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.   कृतज्ञता लेखन किना कृतज्ञता जर्नल लिहिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सकारात्मक राहता येते आणि आपल्यातील सकारात्मकता वाढीस लागते. तुम्ही कोणकोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहात हे जेव्हा तुम्ही लिहून काढता तेव्हा जीवनाबद्दल आणि ज...

उद्याचा दिवस आयुष्यात कधीच उगवत नाही. आयुष्यात आपल्या हाती असतो तो फक्त ‘आज!’

Image
चीडचीड, राग, नैराश्य, तणाव, निद्रानाश, अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी जेव्हा एकाचवेळी पछाडतात तेव्हा यातून बाहेर कसं पडायचं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. मानसिक स्थिती एकदा का घसरू लागली की ती कधी रसातळाला पोहेचेल हे सांगता येत नाही आणि मग आपण त्याच त्या घटना, त्याच त्या भावना आणि तेच ते परिणाम अनुभवत राहतो. आयुष्य जणू भोवऱ्यासारखं एकाच जागी गरागरा फिरायला लागतं. अशांत मनाला कशातच रस वाटत नाही, त्याला काही चांगलं दिसत नाही आणि काही चांगलं आठवत नाही. मनाचा प्रत्येक कोपरा काळ्याकुट्ट अंधाराने भरून जातो तेव्हा एक दिवा जरी लावला तरी अशा मानसिकतेतून बाहेर पडायला मदत होऊ शकते. अगदी घोर निराशा नसली तरी जेव्हा जेव्हा एकटं आणि उदास वाटेल त्यात्या वेळी हीच एक सवय तुम्हाला तरून नेऊ शकते. कुठली सवय?   कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय!   समजा तुम्ही फक्त फिरायला म्हणून बाहेर पडलाय! मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलंय हे करू का ते करू अशा अनेक विचारात तुम्ही गुरफटून गेलाय. विचार करता करता तुम्ही चालताय आणि चालत चालत तुम्ही एका झाडीत शिरता, थोडं पुढे थोडं पुढे करत जात राहता पण नंतर मात्र तुम्...

बिकट प्रसंगात कृतज्ञ राहणं सोपं आहे का?

Image
आयुष्यात सगळं काही अगदी सुरळीत, मनासारखं चाललेलं असतं, अपेक्षेपेक्षा पदरात जास्तच पडतं, हात लावेल तिथे सोनं अशी परिस्थिती असते तेव्हा तुम्ही मनापासून कृतकृत्य होत असाल. देवाचे किती आभार मानू आणि किती नको असे होत असेल. इतकं भरभरून दिल्याबद्दल तुम्ही त्याचे वारंवार आभारही मानत असाल पण, समजा हेच उलटं असेल तर? खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, रोजचा दिवस अगदी जीवावर उदार होऊन ढकलला जात असेल, मनावर निराशेचे मळभ दाटून आले असेल, कष्ट करूनही हाती फक्त शून्य लागत असेल तर? तर अशा परिस्थितीत कोणी कसे काय कृतज्ञ राहू शकेल. या परिस्थितीत कोणाला कृतकृत्य वाटेल? अशावेळी देवाकडे फक्त तक्रार केली जाते हे माझ्याच वाट्याला का? बरोबर ना?   Image source : Google खरे तर कितीही वाईट, दुर्धर, प्रसंग असला तरी त्यातही काही तरी चांगले दडलेले असते. अशा संकटाच्या काळातही तुमच्यातील आशावाद थोडासा तरी लुकलुकत असतो. मग अशा दिवसात जे काही हाताशी आहे त्याबद्दल नको का आभार मानायला? तुमच्या बिकट आणि खडतर परिस्थितीतही जर तुम्ही सकारात्मक राहायला शिकलात तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. ...

प्रसंग येतो पण तो घर करून राहत नाही!

Image
आज लीना खूप म्हणजे खूप खुश होती. तिला बढती मिळाली होती. स्वप्न पूर्ण झाले म्हणून लीना खूप म्हणजे खूपच आनंदात होती. आपले बॉस, सहकारी, कार्यालायातील इतर कर्मचारी या सगळ्याबद्दल तिला मनोमन कृतज्ञता वाटत होती.   Image Source : Google काही दिवसांनी लीनाचे रुटीन काम सुरु झाले. बढती मिळाली होती म्हणजे अर्थातच जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. कामात ती इतकी बुडाली होती की दुसऱ्या कशासाठी तिला वेळच नव्हता. आपला फोनही तिने दुसऱ्या टेबलवर ठेवून दिला होता, कामात व्यत्यय नको म्हणून. इतक्यात तिला ऑफिसच्या फोनवर एक फोन येतो, आणि तिच्या सासूबाई घरातल्या घरातच पाय घसरून पडल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचे तिला समजते. अर्थातच खूपच गंभीर बाब असल्याने ती आपल्या वरिष्ठांशी याबाबत बोलते आणि ऑफिसमधून बाहेर पडते. बाथरूम मधल्या स्टूलवर बसून पाय स्वच्छ करायला गेल्या आणि स्टूल निसटून तिथल्या तिथे जोरात आपटल्या. तिथल्या तिथे पडल्या असल्या तरी त्यांच्या खुब्याचे हाड मोडले होते आणि त्याचे तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे होते. ऑपरेशन नंतरही त्यांना ऊठ-बस करायला जमेल की नाही याची शंकाच होती. आता त्यांच्य...

प्राध्यापक असूनही हा माणूस पत्र्याच्या डब्यापासून काचरापेटी बनवतोय!

Image
शाळेत जाऊन मुलांना फक्त गमभन लिहायला वाचायला शिकवणं एवढंच शिक्षकाचं काम नाही तर, समाजात एक सुजाण नागरिक म्हणून कसं वावरायचं? याचे धडेही आपल्याला शिक्षकांकडूनच मिळतात. समाजातील न्याय आणि नैतिक मुल्यांची शिकवणही आपल्याला आपले शिक्षकच देतात. म्हणूनच आई-वडिलांच्या नंतर आपल्याला आपल्या शिक्षकांविषयी प्रचंड आदर वाटतो. आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबतच समाजात जागरूकता निर्माण करणारा एक शिक्षक काय काय करू शकतो हे जर पहायचे असेल तर आपल्याला उत्तराखंड राज्यातील अल्मोडा तालुक्यतील शिक्षक जमुना प्रसाद तिवारी   यांच्या विषयी जाणून घेतलं पाहिजे. Image source : Google प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होते असेही म्हणायचे आणि दुसरीकडे तेच प्लास्टिक विविध रुपात बाजारात आणायचे. हा दुटप्पीपणा सहन न होणारे जमुना प्रसाद यांनी पत्र्याच्या डब्यापासून कचराकुंड्या बनवल्या. स्वतःच्या हातानी बनवलेल्या या कचराकुंड्या ते आजूबाजूच्या लोकांना फुकटात वाटतात. पर्यावरण वाचवा आणि स्वच्छता राखा अशा नुसत्या घोषणा देऊन पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात तिवारी यांना फारसा रस नाही. त्याउलट त्यांनी स्वतः एक अशी वाट निवडली...

मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी या प्रकारचा आत्मसंवाद तुम्ही कधी केलाय का?

Image
“रोजचा दिवस कुठे उगवतो आणि धावपळीत कसा मावळतो हेही कळत नाही. दिवसभरात कसला तो निवांतपणा नाही. नुसती दगदग दगदग दगदग! आणि इतकं करून मिळतं काय? काहीच नाही. प्रत्येकाकडून आम्हालाच बोलून घ्यावं लागतं.” श्रियाचा पारा चांगलाच चढला होता. आज ऑफिस मध्ये असूनही ती नसल्यासारखीच होती. सकाळी सकाळीच स्वारी भलतीच नाराज आणि भडकलेली दिसत होती. खरं तर श्रियाच काय पण कधी कधी आपणही असे विनाकारण भडकलेले असतो. आपल्या मनात नेमका कसला संताप खदखदतोय ते आपल्यालाही कळत नसते. होतं काय की रोजच्या धावपळीत आपण आपल्या मानसिक अवस्थेकडे लक्षच देत नाही आणि मग आतली उलथापालथ अशी अचानक बाहेर पडते.   Image source : Google आपल्या मनाची उलथापालथ अशी अचानक बाहेर पडत असेल, सतत आपला संताप होत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवरूनही पारा चढत असेल तर आपण थोडं आपल्या मनाकडे लक्ष द्यायला हवंय. कारण, राग राग करणाऱ्या, सतत चीडणाऱ्या व्यक्तीसोबत राहायला इतरांनाही आवडत तर नाहीच पण तुम्हाला स्वतःलाही पुढे जाऊन या गोष्टीचा मोठा फटका बसू शकतो.   आपले व्यक्तिमत्व प्रसन्न, शांत, प्रफुल्लीत आणि उत्साही बनवायचे असेल तर आपल्या मनाशी हो...