Posts

Showing posts with the label Motivation

नैराश्यातही रोजची कामं उरकण्यासाठी काय आयडिया वापरता येतील? तुम्हालाही हाच प्रश्न पडलाय का?

Image
घर आवरायचं आहे, कपडे धुवायचे आहेत , परवा धुवून आणून ठेवलेले कपडे अजून घडी घालायचे आहे, स्वयंपाकाची तयारी करायची आहे, बाजारातून भाजी पण आणली नाही अजून... डोक्यात कामांची नुसती यादी सुरु असते पण एकाही कामाला हात लावू वाटत नाही. अगदी जे काम केल्याशिवाय पर्यायच नाही अशी कामं तेवढी कशीबशी उरकली जातात. ती करताना पूर्वीचा उत्साह जाणवत नाही. विनाकारण थकल्यासारखं वाटतं. स्वयंपाकात जिथे पूर्वी दोन भाज्या बनत होत्या तिथे आता एक भाजी करायचंही जीवावर येतं. ही लक्षणे म्हणजे आळस किंवा थकवा नव्हे. ही नैराश्याची लक्षणे आहेत. नैराश्य आलेल्या किंवा डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला आयुष्यातील अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतही रस वाटत नसल्याने त्या गोष्टी करू वाटत नाहीत. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये जर असा बदल दिसत असेल तर , आळशी झालीये , घरात बसून काही काम नसतं म्हणून असं होतं , जरा बाहेर पड , फिरून ये , जग बघ म्हणजे कळेल , इतकंही नाही जमत मग काय उपयोग? असले शब्द वापरून आणखीन निराश करण्यापूर्वी एकदा या गोष्टीचा नक्की विचार करा. रोजची अगदी साधीसाधी वाटणारी कामं करणंही जेव्हा कठ...

ध्यान करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घ्या!

Image
Image source : Google  ध्यान म्हणजे काय याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही लोकांसाठी तर ध्यान म्हणजे आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट वाटते. काही लोकांना ध्यान म्हणजे एखादी गूढ क्रिया वाटते. परंतु वास्तवात ध्यान ही एक सहज सुंदर गोष्ट आहे.  या लेखातून आपण ध्यान म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. ध्यान कोणकोणत्या प्रकारे करता येते आणि त्याचे फायदे काय आहेत हेही पाहू.  सरळ सोप्या भाषेत सांगायचे तर ध्यान म्हणजे विचार, चिंतन किंवा आपल्या भावनांचे परीक्षण करणे. खरे तर आपण बरेचदा नकळत या गोष्टी करत असतोच. पण, जाणीवपूर्वक आणि शक्य तितक्या तटस्थपणे आपल्या विचारांचे, भावनांचे परीक्षण करणे म्हणजे ध्यान असे म्हणता येईल. ध्यान करण्याची विशिष्ट पद्धती आहे का? खरे तर ध्यानाचा अमुक एक मार्गच बरोबर आणि दुसरा चुकीचा असं काही म्हणता येणार नाही. तुम्हाला ज्या मार्गाने ध्यान करणे आवडेल आणि ज्या पद्धतीने ध्यान केल्याने तुमच्या मानसिकतेत फरक पडेल तो मार्ग, ती पद्धत तुम्ही बिनधास्तपणे स्वीकारू शकता.  एका ठिकाणी मांडी ठोकून, डोळे झाकून बसणे म्हणजेच ध्यान असं अजिबात नाही.  जगातील प्रत्येक...

आयुष्यातील कोणताही संघर्ष स्वप्रेमाच्या बळावरच जिंकता येतो!

Image
संपूर्ण आयुष्यात उलथापालथ घडवून आणणारी एखादी घटना आपल्या मनावर इतका खोलवर परिणाम करून जाते की आपला स्वतःवरीलच विश्वास डळमळीत होतो. परिस्थिती बदलते पण तिच्या खुणा/व्रण मनावर कायम राहतात. अशावेळी हताश न होता पुन्हा नव्या जिद्दीनं उभं राहणं यालाच तर संघर्ष म्हणतात. लक्षात ठेवा आयुष्यात संघर्षाचे अनेक प्रसंग येतील जातील या प्रसंगात कोणी तुमची साथ देईल कोणी सोडून जाईल. पण , या सगळ्या प्रसंगात एक साथ महत्वाची...ती म्हणजे स्वतःची साथ.   सगळं काही संपलं असं वाटत असतानाच पुन्हा नव्या जिद्दीनं उभं राहण्यासाठी लागतो तो आत्मविश्वास आणि स्व-प्रेम. पण आत्मविश्वासच नसेल तर स्वत:वर प्रेम तरी कसं होणार. त्यासाठी आधी आत्मविश्वास पुन्हा मिळवावा लागणार. तो आपल्यातच कुठे तरी दडी मारून बसलेला असतो. हरलेला असतो. त्याला पुन्हा शोधून बळ देणं हे आपलंच काम. त्यासाठी कुणाची वाट पाहत बसलात तर ते कधीच शक्य होणार नाही. गमवलेला आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवायाचा आणि स्वतःवर प्रेम कसं करायचं ? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर , हा संपूर्ण लेख वाचाच.   आत्मविश्वास नसेल तर स्वतःबद्दल वाटणारी आस्था ,...

तणाव हाताळण्याच्या काही प्रभावी पद्धती!

Image
दररोजच्या थकवा आणणाऱ्या रुटीन कामापासून ते अचानक उभ्या राहिलेल्या एखाद्या संकटामुळे आपल्याला तणाव जाणवतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी कामे अशी असतात ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही थकवा येतो. हा थकवा किंवा हा तणाव कमी करण्यासाठी आवर्जून वेळ दिला नाही तर तो वाढत जातो आणि एखाद्या दिवशी याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.  आपण नेहमीच बाह्य परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. पण मनस्थिती जर नीट हाताळता आली तर येणारा तणाव आणि त्यामुळे निर्माण होणारी शारीरिक-मानसिक गुंतागुंत आपण नक्कीच टाळू शकतो. तणाव तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. अतिरिक्त तणावामुळे तुमचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते. म्हणूनच शरीर आणि मन दोन्हीवरील ताण  हलका करणं खूपच गरजेचं आहे. या लेखात आपण तणाव हाताळण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनाचा आनंद घेऊ शकाल आणि तणावाच्या गंभीर परिणामापासून स्वतःला दूर ठेऊ शकाल. आता तणाव निवळण्यासाठी प्रत्येकाला एकच मात्रा लागू होईल असे नाही. प्रत्येकाला येणाऱ्या तणावाचे कारण ...

नकोशा आठवणींचा ससेमिरा कसा टाळावा, यासाठी काही टिप्स./Tips to release painful memories.

Image
आठवणी चमत्कारिक असतात. आठवणी आपल्याला उलट्या पावलांनी भूतकाळात जायला भाग पाडतात. भूतकाळातील आठवणी आपला वर्तमान आणि भविष्यकाळही प्रभावित करत असतात. काही आठवणी सुखद असतात. ज्या आपल्याला आनंद देतात, तर वाईट आठवणी मात्र विंचवासारख्या डसत राहतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळाले, शिक्षकांनी कौतुक केले, नोकरीसाठी दिलेली मुलाखत यशस्वी झाली, अशा आठवणी आपल्याला प्रेरणा देतात. पण एखाद्या व्यक्तीशी झालेले भांडण, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, एखादा अपघात, कुणीतरी केलेली फसवणूक, प्रेमभंग अशा आठवणी आपल्याला आणखी कमजोर बनवतात. आठवणींचा हा खेळ जर जास्तच त्रासदायक होत असेल, तर काय करावं? या वाईट आठवणींच्या जंजाळातून सुटण्याचा काहीच मार्ग नसेल का? होतं काय घटना भूतकाळात घडून गेली असली तरी तिचे व्रण वर्तमानातही खुपत राहतात. काहींसाठी या आठवणी डिप्रेशनचे कारणही ठरतात. या आठवणींच्या दुष्ट पंजातून सुटका करून घ्यायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला तसा निश्चय करावा लागेल आणि दुसरी गोष्ट त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागेल. तुमच्या या आठवणी आठवणीत राहिल्या तरी त्या  तुम्हाला छळणार नाहीत. भूतकाळातील आठवणी बाजूला सा...

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय?

Image
माणसाचं सरासरी आयुष्य किती? तर साधारण, ७५ वर्षे. त्यातही अनेकांना ८०/९०/१०० वर्षे जगण्याचा बहुमान मिळतो. हो दीर्घायुष्य हे निसर्गाने दिलेलं एक वरदानच आहे. आज जगणं महाग आणि मरण स्वस्त झालेलं असताना काही लोक शंभरी पार करण्याचा विक्रम कसा काय करू शकतात? Image Source: Twitter आता अमेरिकेत जन्मलेल्या ब्रेन्यीस मोरेरा या स्पानिश आजीचंच उदाहरण घ्या. या वर्षी आजींनी ११५व्या वर्षात पदार्पण केले. २३ जानेवारी रोजी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ति म्हणून गिनीज बुकात नोंद असणाऱ्या ल्युसील रँडन याचं निधन झालं आणि ११५ वर्षाच्या ब्रेन्यीस मोरेरा जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ति म्हणून गिनीज बुकात नाव नोंद होण्याची अनपेक्षित भेट मिळाली. ११५ वर्षाच्या आयुष्यात आजींनी दोन महायुद्धे, १९१८चा स्पॅनिश फ्लू, १९३६चे स्पेनमधील नागरी युद्ध आणि कोव्हीड-१९ची जागतिक महामारी एवढ्या जागतिक उलथापालथी पहिल्या आहेत. ब्रेन्यीस मोरेरा यांचा जन्म ४ मार्च १९०७ रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. त्यांचा कुटुंबीयांनी त्यांच्या जन्माच्या एकावर्षापूर्वीच मेक्सिकोमधून अमेरिकेत स्थलांतर केले होते. १९१५ साली पहिल्या महायुद्धाच्या पार्श्...

स्वतःवरही भरपूर प्रेम करू शकतो आपण! या Valentine ला स्वतःवरचं प्रेम व्यक्त करा!

Image
प्रेमाचा आठवडा सुरु आहे. प्रेमाच्या या प्रवासाची सुरुवात होते ती स्वतःपासून आणि स्वतःवरील प्रेमाची सुरुवात होते आत्म-स्वीकारापासून. पण स्वतःचा स्वीकार म्हणजे तरी काय? स्वतःला आहोत तसं स्वीकारणं म्हणजे आत्म-स्वीकार. हे वाक्य वाचायला जितकं सोपं आहे तितकंच प्रत्यक्षात अवलंबायला कठीण! मुळात आपण कसे आहोत हेच बरेचदा आपल्याला माहीत नसतं.  मग हा प्रवास स्वतःला ओळखण्यापासून सुरू व्हायला हवा. एकदा का स्वतः आपण कसे आहोत कसे नाही हे कळालं की, मग ते स्विकारणं सोपं होईल नाही का? बरेचदा इतरांनी दिलेले शेरे, कौतुक, मान अपमान याच चष्म्याने आपण आपली एक प्रतिमा बनवलेली असते. पण, मुळात आपण कसे आहोत, कसे होतो? हेच कधी कधी विसरून गेलेलं असतं. असे इतरांनी दिलेली मतं आपण आपल्यावर लादली आहेत का हेही पाहायला हवं. कधी कधी अशी मतं न कळत आपल्यात रुजलेली असतात, आपण ती स्वीकारलेली असतात. स्वतःला स्वीकारताना, अशी लादलेली प्रतिमा नाकारताही यायला हवं. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एकदा आपण स्वतःला ओळखलं, एकदा स्वीकारलं आणि बस्स आता आपण स्वतःच्या प्रेमात पडलो असं होत नाही. तुमचं दुसऱ्याशी असलेलं ना...

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

Image
Image source : Google गतकाळाच्या आठवणी एखाद्या भुताप्रमाणे आपल्याला झपाटून टाकतात. हा भूतकाळ कधीकधी इतका आपल्यावर अधिकार गाजवतो की आपण त्याच्या मगरमिठीतून कितीही सुटण्याचा प्रयत्न केला तरी सुटू शकत नाही. एखादे जीवघेणे आजारपण असेल , प्रेमभंग असेल , कुणा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल , एखाद्या जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात असेल , अशा घटनांनी मनावर खोल परिणाम केलेला असतो हे नाकारता येत नाही. या आघातातून सावरायचे झाल्यास स्वतःलाच प्रयत्न केले पाहिजेत. या नकारात्मक आठवणी सोडून देऊन जगणं शक्य आहे का ? असा जर प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर याचं उत्तर आहे, हो. तुमचा भूतकाळ कसाही आणि कितीही वाईट असला तरी आजही एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आपला भूतकाळ म्हणजे आपल्या आयुष्याचा एक भाग असतो , भूतकाळ म्हणजेच संपूर्ण आयुष्य नव्हे. थोड्याशा प्रयत्नाने तुम्ही या जंजाळातून नक्कीच बाहेर पडू शकता. या सहा पायऱ्या तुम्हाला तुमच्या भूतकाळाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी खूप म्हणजे खूपच फायदेशीर ठरतील.   यातील पहिली पायरी आहे , आपल्या भावनांप्रती सजग होणे – तुम्हाला जो ...

विज्ञान आणि ‌तंत्रज्ञान क्षेत्रात अमुल्य योगदान देणाऱ्या डॉ कमल रणदिवे

Image
आज विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही भारतीय महिला उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. विज्ञान आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात भारतीय महिलांची वाट सुकर व्हावी म्हणून इतिहासात काही महिलांनी आपले योगदान दिले आहे आणि त्यातीलच एक नाव म्हणजे डॉ कमल रणदिवे. आज त्यांची १०४वी जयंती आहे आणि त्यांच्या या शतकोत्तर जयंती दिनाचे औचित्य साधून गुगलने आजचे डूडल त्यांना समर्पित केले आहे. डॉ कमल रणदिवे यांनी स्तनाच्या कॅन्सर संदर्भात महत्वपूर्ण संशोधन केले. त्यांच्या या संशोधन कार्यासाठी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याकाळी विज्ञान क्षेत्रात महिलांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी होती. विज्ञान क्षेत्रात महिलांनाही वाव मिळावा म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन भारतीय महिला वैज्ञानिक संघ स्थापन केला. या संस्थेच्या त्या संस्थापक सदस्य होत्या. विज्ञान आणि शिक्षण यांच्या सहाय्याने समाजात समानता प्रस्थापित केली जाऊ शकते असे त्यांचे मत होते, याच उद्देशाने त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात काम केले. या संस्थेतर्फे खास महिलांसाठी ११ कॉलेजस चालवले जातात आणि   महिलांना संशोधन का...