Posts

Showing posts from August, 2021

काळजी करून काय होणार?

Image
संध्याकाळच्या भाजीची तयारी करता करता, लता घड्याळाकडे पाहत होती, तिच्याही नकळत या दहा मिनिटात तिने दहा वेळा घड्याळाकडे पहिले होते. समोर तिच्या सासूबाई पेपर वाचत बसल्या होत्या. त्यांच्या बारीक नजरेतून हे सुटलं नाही. त्यांनी लताला विचारलंच, “काय गं लता कसल्या विचारात आहेस? कुठे जायचं आहे का तुला?” Photo by  Andrea Piacquadio  from  Pexels “काही तरीच, आता यावेळी मी कुठे जाणार?” थोड्याशा ताणलेल्या स्वरात लता उत्तरली. “मग काय सारखी घड्याळाकडे पाहतेस मघापासून?” “अहो, स्वरा आली नाही अजून म्हणून बघतेय किती वेळ झाला?” तोच ताणलेला स्वर.   येईल की सारखं असं घड्याळाकडे पाहून काय होणार? फोन करून बघ कुठे आहे? का उशीर झाला?” त्यांचं हे बोलणं सुरुच होत तेवढ्यात स्वरा आलीच.   आल्या आल्या आजीच्या गळ्यात पडली आणि तिथेच बसली.   लताकडे तिचं लक्षच नव्हतं. लता मात्र मघापासून तिला उशीर का झाला या काळजीने अस्वस्थ झाली होती. इतकी अस्वस्थ झाली होती की तिची चलबिचल तिच्या शेजारी बसलेल्या सासूलाही जाणवली.   खरं तर मुलीला पाच-दहा मिनिटं उशीर झाला तर काही वाटत ...

झोपेचं खोबरं होतंय?

Image
कोरोनामुळे गेले वर्ष दीड-वर्षं आपण सगळेच आरोग्याबाबत कधी नव्हे तेवढे सतर्क झालो आहोत. चांगली रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्तीला शक्यतो कोरोनाचा फार काही त्रास होत नाही, हे माहीत झाल्याने लोक खरोखर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकडे काळजीने आणि जागरूकतेने लक्ष देत आहेत. आरोग्याबाबत आलेली ही सतर्कता तशी चांगलीच म्हटली पाहिजे. त्याचवेळी वर्क फ्रॉम होममुळे विस्कळलेले शेड्युल, अनेकांना घरात कोंडून राहण्याचा आलेला मानसिक ताण, विस्कटलेली आर्थिक घडी, कोरोनामुळे सततची आरोग्याची चिंता, आपल्या जवळच्या लोकांची आरोग्याची, सुरक्षेची, सुरक्षित भविष्याची चिंता, काहींच्या वाट्याला आलेले एकाकीपण या कोरोनामुळे आणखी गडद झाले आहे. त्यात सतत अपडेट राहण्याचा आणि माहितीचा भडिमार झेलण्याचा एक वेगळाच ताण. काहींनी कोरोनाच्या लाटेत आपले आप्तस्वकीय, कुटुंबीय गमावले आहेत. थोडक्यात काय तर कोरोनाच्या आधीही आपल्या आयुष्यात प्रश्न, समस्या होत्याच पण कोरोनाने त्या आणखी तीव्र केल्या आहेत.   Image Souce : Google image या सगळ्या चिंता कुणासमोर बोलून दाखवणार? कारण घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाण...

संवादाचा पूल की संशयाची झूल? नाते कशावर टिकेल?

Image
माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत जगत असतो. प्रत्येक नात्याची भूमिका वेगळी असली तरी, त्याचा पाया मात्र एकच असतो, तो म्हणजे विश्वास. फक्त नवरा-बायको किंवा प्रियकर प्रेयसी यांच्यातच नाही तरी आई-मुलगी-मुलगा-वडील, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी, अशा सगळ्याच नात्यात विश्वासाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. विश्वासाचा हा पायाच डळमळला तर, नात्याला तडे जायला सुरुवात होते. माणूस कोणत्या एकाच नात्यावर जगतो असं नाही तर त्याला नात्यांचं सुरक्षित पर्यावरण हवं असतं. या पर्यावरणातील एका जरी नात्याला धक्का लागला तरी त्याचा इतर सगळ्याच नात्यांवर परिणाम होतो.   Image source : Google Image मनात एकदा का संशयाचं मूळ रुजू लागलं की याने तुमची मानसिकता तर बिघडतेच पण तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींचीही मानसिकता बिघडून जाते. ज्याच्यावर संशय घेतला जातोय त्या व्यक्तीवर तर हा थेट भावनिक हल्लाच असतो. हा हल्ला कसा परतवून लावायचा याचं जर योग्य ज्ञान त्या व्यक्तीजवळ नसेल तर, ती व्यक्ती भावनिकतेच्या लाटेत वाहवून जाण्याचीच शक्यता जास्त. अशा वाहवत जाण्याला न कळत आपल्याकडूनच हातभार लावला जातो.   पहिल्...

अडचणी तर येणारच म्हणून जगणं सोडून द्यायचं का?

Image
प्रत्येकाच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय असते स्वप्न असते. काहीजण शेवटपर्यंत या स्वप्नांचा पाठलाग करतात तर काहीजण मध्येच थकून जातात. ज्यांना शेवटपर्यंत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे जमले ते इतिहास घडवतात आणि ज्यांनी आपली स्वप्ने अर्ध्यातच सोडली ते फक्त नोंद बनून राहतात.   Image source : Google आयुष्याच्या प्रवासात अडचणी आणि अडथळे तर प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. जे लोक अडचणींचा बाऊ करतात ते अडचणीतच गुरफटून जातात. ज्यांना अडचणींचा बाऊ न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतात त्यांच्या पुढील अडचणी पालापाचोळ्या प्रमाणे उडून जातात.   श्रद्धाला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिच्या हालचाली तिच्या लकबी एका जन्मजात नर्तकीला शोभतील अशाच होत्या. तिने नृत्य शिकण्याची इच्छा आपल्या आई-बाबांजवळ बोलून दाखवली. पण, घरंदाज कुटुंबातील मुली असलं काही शिकत नसतात अशी सबब देऊन बाबांनी तिची मागणी उडवून लावली. बाबांची नाराजी पाहून श्रद्धाने नृत्य हा विषयच आपल्या प्राधान्यक्रमातून उडवून लावला. ती जाणूनबुजून आपले लक्ष इतर गोष्टीत रमवू लागली. तरीही तिला कोणत्याच गोष्टीत मन रमत नव्हते. कुठल...

काही लोकांना तुमच्यापेक्षा जास्त तुमच्याशी भांडण्यातच इंटरेस्ट असतो!

Image
भांडणं होण ही तशी सामान्य बाब. तसही भांडणाने प्रेम वाढतं असं म्हणतात. प्रेमातील चव जपणारी, लटकी, लुटुपुटूची भांडणं होण्यात काही वाईटही नाही म्हणा! पण जर कुणी मुद्दामच तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करत असेल. सतत तुमचा अपमान करत असेल, तुमच्याशी वादावादी करुन समाधान मिळवत असेल तर? काही लोकांना भांडण करण्याची हौसच असते आणि ते फक्त आपल्या जाळ्यात कोणी बकरा अडकतो का या संधीच्या शोधात असतात. आता अशा लोकांच्या जाळ्यात अडकून बकरा व्हायचं की भुर्रकन उडणारं कबुतर व्हायचं हे तुम्हीच ठरवा.   Image source : Google image मुद्दाम भांडणं उकरून काढणारी लोक असतात तरी कोण? या लोकांचे चार प्रकार पडतात. पहिले म्हणजे ज्यांना तुमच्यावर नाहक इर्षा वाटत असते असे. दुसरे म्हणजे ज्यांना स्वतःबद्दल अजिबात आत्मविश्वास नसतो, सतत भीती आणि तणावाखाली असतात असे. तिसरे ज्यांना आपण कुणाला तरी आपल्या बोलण्यातून दुखावत आहोत हे त्यांच्या गावीही नसणारे. आपल्या बोलण्याचा वागण्याचा समोरच्यावर काय परिणाम होईल याची जराही फिकीर नसणारे निष्काळजी आणि फटकळ लोक आणि चौथे तुमच्यावर प्रेम करणारे.   समोरचा माणूस या चारपैकी क...

स्वतःवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे हे गुण तुम्हाला माहीत आहेत का?

Image
स्वत:वर प्रेम करणं, स्वतःचं एकूण घेणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःला हवं-नको ते पाहणं म्हणजे स्वार्थीपणा नव्हे. स्वत:वर प्रेम करणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे. Image source : Google तुमच्याकडे कुणी साखर मागायला आले आणि तुमच्या घरी साखरच नसेल तर काय कराल? मागणाऱ्याला रिकाम्या हातानेच परत जावे लागणार. बरोबर ना? तसच काहीसं प्रेमाचंही आहे, जर तुम्ही स्वतःवरच प्रेम करत नसाल तर तुम्ही दुसऱ्याला कुठून प्रेम देणार? आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार अशी म्हण आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवली आहे ती का उगीच? तुम्ही तहानलेले असताना एखाद्या कोरड्या विहिरीतून पाणी काढण्याचा प्रयत्न केलात तर काय हाताशी लागेल? मरणच!   Image source : Google म्हणून इतरांकडून प्रेमाची अपेक्षा करण्यापूर्वी किंवा इतरांवर प्रेम करण्यापूर्वी आपलं स्वतःचं स्वतःवर प्रेम असणं गरजेच आहे. या प्रेमात कोणकोणत्या गोष्टी येतात ते पाहूया.   १.   अनेकांना असं वाटतं की स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःतील उणीवांकडे दुर्लक्ष करणे, मेहनत करण्यापासून रोखणे. स्वतःचे फाजील लाड पुरवणे म्हणजे प्रेम नव्हे. उलट या प्रेमात पहिली पाय...

आयुष्यातील ४० वर्षे त्याने सायकलवरून फिरण्यात घालवली!

Image
हिर-रांझा, लैला-मजनू, रोमिओ-ज्युलिएट,   याच मांदियाळीतील आणखी एक नाव म्हणजे, इवान-सायकल. काय डोकं फिरलंय का हिचं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. पण जितकं प्रेम हिरचं रंझावर, लैलाचं मजनूवर आणि रोमिओचं ज्युलिएटवर होतं तितकच काय त्यापेक्षा जास्तच प्रेम इवानचं सायकलवर होतं. या प्रेमाची आणखी एक सकारात्मक बाजू म्हणजे हिर-रांझा, लैला-मजनू असो की रोमिओ-ज्युलीएट या सर्वांच्या प्रेमाचा शेवट  शोकांतिक होता. इवान आणि त्याची सायकल मात्र शेवटपर्यंत एकमेकासोबत राहिले. या सायकलवरून चाळीस वर्षात त्याने सबंध जग पालथं घातलं. चाळीस वर्षाच्या प्रवासात त्याला जगाची कितीतरी विलोभनीय, मोहक आणि क्रूर रूपे दिसली या सर्वाबद्दल त्याने अनेक पुस्तके लिहिली. ती छापली गेली आणि मोठ्या प्रमाणात वाचलीही गेली. त्याच्या या पर्यटन अनुभवाबद्दल ऐकण्यासाठी कित्येक लोक उत्सुक होते आणि यातूनच इवानला एक व्याख्याता अशीही ओळख मिळाली. कोण होता हा इवान आणि सायकलने त्याला इतकं वेड कसं काय लावलं असेल? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा!   Image source : Google दररोज तेच ते रुटीन ऑफिस ते घर घर ते ऑफिस, तीच कामं...

एकाच वेळी ३० हून अधिक इंग्रज शिपायांचे शिर उडवणाऱ्या उदा देवीची शौर्यगाथा!

Image
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात कोट्यावधी लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंग, राजगुरू सुखदेव, सारखे क्रांतिवीर फासावर चढले. क्रांतिकारी बाबू गेनू सारख्या कित्येकांनी इंग्रजांशी लढता-लढता आपला प्राण त्याग केला, हे तर आपल्याला माहीत आहेच. पण, याच संग्रामातील काही कथा आणि व्यक्ति अशाही आहेत ज्यांची इतिहासाने पुरेशी दखल घेतलेली नाही. आपल्या प्राणाचे बलिदान देऊन ३० पेक्षा जास्त ब्रिटीश सैनिकांना धारातीर्थी पडणाऱ्या उदा देवी पासी या विरांगणेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कदाचित फक्त मोजक्या लोकांनाच याची माहिती असेल बहुतांश लोकांना नाही. धाडस, शौर्य, जिद्द, जोश आणि पराक्रम यांची धगधगती ज्वाला म्हणजे उदा देवी! उदा देवीच्या पराक्रमाची ही गाथा वाचल्यानंतर तुमचे रक्तही सळसळल्या शिवाय राहणार नाही.   Image source : Google तो काळ होता १८५७ चा. भारतात सर्वत्रच ब्रिटीश विरोधी रोष शिगेला पोहोचला होता. विविध संस्थानिकांपासून सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाच्या मनात ब्रिटीश विरोधी असंतोष खदखदत होता. ठिकठीकाणच्या संस्थानातून ब्रिटिशांच्या विरोधात मोहीम छेडली जात होती. या उठवात स्त्रियाही पुढे ...

संपन्न आणि घरंदाज कुटुंबातील जानकीदेवी बजाज यांनी घरच्या समृद्धीचा त्याग करून स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले.

Image
Image source : Google भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिला आघाडीवर होत्या. यापैकी खूप कमी नावं आपल्या ओळखीची आहेत. बरीच नावं तर अजूनही अज्ञात आहेत. असेच एक नाव म्हणजे जानकीदेवी बजाज. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या आणि त्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनांत सहभागी होणाऱ्या जानकीदेवी बजाज यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत.   जानकी देवी यांचा जन्म १८९३ साली मध्यप्रदेश मधील जवोरा गावातील एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यांची आई मैना देवी म्हणजे साधेपणा आणि प्रेमळतेचे मूर्तिमंत प्रतीक. त्यांना दोन भाऊ होते चिरंजी लालजी आणि पुरुषोत्तम दास. हे कुटुंब पैशाने धनवान होते आणि मानानेही. गावातील सर्व थरातील लोकांना कधीही कशाचीही मदत लागली तरी, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता हे कुटुंब इतरांना मदत करण्यास सरसावत असे. हिंदू वैष्णव कुटुंबात जन्मलेल्या जानकीदेवी अशा पारंपरिक आणि उदार वातावरणातच मोठ्या झाल्या. १९०२ साली वयाच्या नवव्या वर्षी जानकीदेवी यांचा जमनालाल बजाज यांच्याशी विवाह झाला. हेच ते जमनालाल बजाज ज्यांनी पुढे   प्रसिद्ध बजाज उद्योगाचा पाया रचला. जमनालाल यांच्याशी विवाह...

अवयव दान, श्रेष्ठ दान!

Image
मृत्यू हे एक अटळ आणि सुंदर सत्य आहे! आपण मेल्यावर आपलं किंवा आपल्या पाठीमागे राहणाऱ्यांचं काय होत असेल? हे कळण्याची काहीच सोय नाही. असली तरी अजून तरी ज्ञात नाही. मनुष्य देह निष्प्राण झाल्यानंतर बहुतांश वेळा त्याला जाळले किंवा पुरले जाते. व्यक्त ज्या धर्माची अनुयायी असेल त्यावरून हे जाळणे किंवा पुरणे ठरवले जाते. काही धर्मात याहूनही दुसरा मार्ग अनुसरला जातो. (उदा. पारशी) मेल्यानंतर मनुष्य देहाची कोणत्या ना कोणत्या प्रकारे विल्हेवाट लावली जातेच. पण जाळण्या किंवा पुरण्याऐवजी तुम्ही आणखी एक मार्ग स्वीकारू शकता, तो म्हणजे शरीर किंवा शरीरातील काही अवयव दान करणे.   Image source : Google जाळले किंवा पुरले गेल्याने कोणाचा काय फायदा होईल हे सांगता येत नाही. किंबहुना फायद्यापेक्षा यात तोटेच अधिक आहेत, हेही मान्य केले पाहिजे.   जिवंतपणी तर आपण माणूस म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी खूप काही करतो. बहुतांश वेळा 'मी त्याच्यासाठी इतकं केलं, पण त्याला काही याची जाणीवच नाही,' असंही घोकत राहतो. इतरांसाठी करूनही त्याचं समाधान अनुभवण्यापेक्षा त्याबद्दल तक्रारीच सांगत राहतो.   'म...

उठा,लिहा, बोला, आज संपूर्ण जग तुम्हाला ऐकायला उत्सुक आहे!

Image
Image source : Google युवा म्हणजे कोण ? देश, समाज, कुटुंब, शहर यांच्या भल्यासाठी, उन्नतीसाठी, झटणारा तो युवा! ज्याच्याकडे बल आणि युक्ती यांचा संगम आढळतो तो म्हणजे युवा! भविष्याची कमान आणि भूतकाळाचे संचित ज्याला सांभाळायचे आहे तो म्हणजे युवा! अशा या युवावर्गाच्याही स्वतःच्या काही समस्या असू शकतात. त्यांच्या स्वविकासात अडचणी येऊ शकतात. नवनव्या संकल्पना साकारताना, त्या संकल्पना अंमलात आणताना या युवावर्गाला काही अडथळे पार करावे लागतात. त्यांच्यातील संघर्षशील वृत्तीला, सर्जनशीलतेला, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील समस्या जाणून घेऊन त्यांना हिंमत देण्यासाठी जगभर १२ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. शिवाय, जगभरातील ही युवाशक्तीच बदलाची कारक आहे, हेही आपल्याला विसरून चालणार नाही.   देशाची आणि समाजाची प्रगती ही त्या देशातील आणि समाजातील युवकांच्या सहभागाशिवाय अपूर्ण आहे. त्यांना देशासाठी समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, त्यांनी केलेल्या कामाची दाखल घेतली गेली पाहिजे, वेगवेगळ्या देशातील युवकांनी सम...

आजच्या तरुणांच्या समस्या कधी समजून घेणार?

Image
सळसळता उत्साह म्हणजे युवा, जल्लोष म्हणजे युवा, आनंद म्हणजे युवा, असे अनेक विशेषणे लावून आजच्या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या जात आहेत. पण आजच्या युवावर्गासमोर ज्या समस्या आ वासून उभ्या आहेत त्यांची कुणी दखल घेणार आहे की नाही? हा कळीचा मुद्दा आहे. आजची पिढी जी इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या प्रभावात वाढते आहे जगते आहे या पिढीचे प्रश्नही तितकेच वेगळे आणि गुंतागुंतीचे आहेत. काय तुम्ही आजकालची मुलं हे ऐकवताना आमच्या काळी अस होतं तसं नव्हतं अशा शिळ्या कढीला ऊत आणताना या पिढी समोरील वास्तवाकडे डोळेझाक करून चालणार नाही. दोन पिढ्यांतील संघर्षाला जनरेशन गॅपच्या नावाखाली दुर्लक्षूनही चालणार नाही. जग झपाट्याने बदलत आहे. आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल की फक्त एका दशकाच्या कालावधीत कितीतरी गोष्टी बदलल्या आहेत. सामाजिक गुंतागुंत वाढत चालली आहे. म्हणूनच आजच्या पिढीला ज्या समस्या भेडसावत आहेत त्यांची तीव्रताही कित्येक पटीने वाढली आहेया समस्या काय आहेत ते मांडण्यासाठीच आजचा हा लेखनप्रपंच! Image source : Google १. शिक्षण – आजच्या पिढीचे भवितव्य हे शिक्षणावरच अवलंबून आहे. पण प्र...