Posts

Showing posts from September, 2021

उद्याचा दिवस आयुष्यात कधीच उगवत नाही. आयुष्यात आपल्या हाती असतो तो फक्त ‘आज!’

Image
चीडचीड, राग, नैराश्य, तणाव, निद्रानाश, अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी जेव्हा एकाचवेळी पछाडतात तेव्हा यातून बाहेर कसं पडायचं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. मानसिक स्थिती एकदा का घसरू लागली की ती कधी रसातळाला पोहेचेल हे सांगता येत नाही आणि मग आपण त्याच त्या घटना, त्याच त्या भावना आणि तेच ते परिणाम अनुभवत राहतो. आयुष्य जणू भोवऱ्यासारखं एकाच जागी गरागरा फिरायला लागतं. अशांत मनाला कशातच रस वाटत नाही, त्याला काही चांगलं दिसत नाही आणि काही चांगलं आठवत नाही. मनाचा प्रत्येक कोपरा काळ्याकुट्ट अंधाराने भरून जातो तेव्हा एक दिवा जरी लावला तरी अशा मानसिकतेतून बाहेर पडायला मदत होऊ शकते. अगदी घोर निराशा नसली तरी जेव्हा जेव्हा एकटं आणि उदास वाटेल त्यात्या वेळी हीच एक सवय तुम्हाला तरून नेऊ शकते. कुठली सवय?   कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय!   समजा तुम्ही फक्त फिरायला म्हणून बाहेर पडलाय! मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलंय हे करू का ते करू अशा अनेक विचारात तुम्ही गुरफटून गेलाय. विचार करता करता तुम्ही चालताय आणि चालत चालत तुम्ही एका झाडीत शिरता, थोडं पुढे थोडं पुढे करत जात राहता पण नंतर मात्र तुम्...

तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती होणं आवडेल? नकारात्मक की, सकारात्मक?

Image
Image source : Google  काही लोकं नेहमी हसतमुख आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात. आजूबाजूच्या लोकांशी पटले नाही तरी त्याचा बाऊ करत राहत नाहीत, आपल्याच आयुष्यात कसं आणि किती दुख आहे याचा हिशोब मांडत बसत नाहीत. तर काही अगदी उलटे सतत तक्रार करणार, इतरांबद्दल नाही तर स्वतःबद्दल तरी यांची तक्रार असतेच असते. कुणावर विश्वास ठेवणार नाहीत. आयुष्यात खूप काही असूनही यांच्या तक्रारींची यादी काही संपत नाही.   असे दोन प्रकारचे लोक आपल्या आजूबाजूला दिसतात, तुम्हीही पहिले असतील. आयुष्याबद्दल तक्रार करण्याची सवय कुणी मुद्दामहून लावून घेत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही खाचखळगे हे असतातच. काही लोकांना हे खाचखळगे लीलया पार करता येतात तर काही लोक मानसिकरित्या त्यातच गुरफटून राहतात. त्यांना यातून बाहेर पडायचं असतं पण योग्य दिशा सापडत नसते.   थोडासा प्रयत्न केल्यानंतर नकारात्मक व्यक्तीही जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन स्वीकारू शकते. आपल्या विचारात सकारात्मक बदल करणे शक्य असते अगदी जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर किंवा वळणावर आपण हे बदल करू शकतो. गरज आहे ती फक्त आपली इच्...

तुम्ही मनाची काळजी घेत राहा. मन तुमची काळजी घेत राहील!

Image
आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं जिथे आपला धीर खचतो, स्वतःवर विश्वास राहत नाही. राहून राहून आता सगळं संपलं असं वाटू लागतं. अशा नकारात्मक भावना तयार होण्यापाठीमागे अनेक कारणे असू शकतात. जसे की प्रेमभंग, कुणा जिवलग व्यक्तीचा मृत्यू, व्यवसायात झालेले मोठे आर्थिक नुकसान, चुकीच्या निर्णयाचे विपरीत परिणाम, अशा अनेक कारणांनी आपण मानसिक दृष्ट्या खचून जातो. आपण हे का केलं? आपल्याला आधी कळलं नाही का? आपण तेव्हाच हा विचार करायला हवा होता. आपण मूर्ख आहोत, नालायक आहोत, अशा अनेक नकारात्मक दूषणांनी आपण आपलाच उद्धार करायला लागतो.   Image source : Google चूक प्रत्येकाच्या हातून होते आणि या चुकीची जाणीव होणे ही आपण योग्य वाटेवर असल्याची पहिली खुण असते.   कळतपणे किंवा नकळतपणे आपणच आपल्याला पाण्यात पाहत असतो. कुणीतरी आपली आर्थिक, भावनिक फसवणूक केलेली असते. मुद्दामहून आपल्याला वाईट वाटेल, आपण अस्वस्थ होऊ असे शब्द वापरलेले असतात आणि त्यात आपणही स्वतःलाच दुषणे देत राहतो ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी चिघळते.   एखाद्या मोठ्या प्रसंगातून सावरताना कि...

बिकट प्रसंगात कृतज्ञ राहणं सोपं आहे का?

Image
आयुष्यात सगळं काही अगदी सुरळीत, मनासारखं चाललेलं असतं, अपेक्षेपेक्षा पदरात जास्तच पडतं, हात लावेल तिथे सोनं अशी परिस्थिती असते तेव्हा तुम्ही मनापासून कृतकृत्य होत असाल. देवाचे किती आभार मानू आणि किती नको असे होत असेल. इतकं भरभरून दिल्याबद्दल तुम्ही त्याचे वारंवार आभारही मानत असाल पण, समजा हेच उलटं असेल तर? खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, रोजचा दिवस अगदी जीवावर उदार होऊन ढकलला जात असेल, मनावर निराशेचे मळभ दाटून आले असेल, कष्ट करूनही हाती फक्त शून्य लागत असेल तर? तर अशा परिस्थितीत कोणी कसे काय कृतज्ञ राहू शकेल. या परिस्थितीत कोणाला कृतकृत्य वाटेल? अशावेळी देवाकडे फक्त तक्रार केली जाते हे माझ्याच वाट्याला का? बरोबर ना?   Image source : Google खरे तर कितीही वाईट, दुर्धर, प्रसंग असला तरी त्यातही काही तरी चांगले दडलेले असते. अशा संकटाच्या काळातही तुमच्यातील आशावाद थोडासा तरी लुकलुकत असतो. मग अशा दिवसात जे काही हाताशी आहे त्याबद्दल नको का आभार मानायला? तुमच्या बिकट आणि खडतर परिस्थितीतही जर तुम्ही सकारात्मक राहायला शिकलात तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. ...

प्रसंग येतो पण तो घर करून राहत नाही!

Image
आज लीना खूप म्हणजे खूप खुश होती. तिला बढती मिळाली होती. स्वप्न पूर्ण झाले म्हणून लीना खूप म्हणजे खूपच आनंदात होती. आपले बॉस, सहकारी, कार्यालायातील इतर कर्मचारी या सगळ्याबद्दल तिला मनोमन कृतज्ञता वाटत होती.   Image Source : Google काही दिवसांनी लीनाचे रुटीन काम सुरु झाले. बढती मिळाली होती म्हणजे अर्थातच जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. कामात ती इतकी बुडाली होती की दुसऱ्या कशासाठी तिला वेळच नव्हता. आपला फोनही तिने दुसऱ्या टेबलवर ठेवून दिला होता, कामात व्यत्यय नको म्हणून. इतक्यात तिला ऑफिसच्या फोनवर एक फोन येतो, आणि तिच्या सासूबाई घरातल्या घरातच पाय घसरून पडल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचे तिला समजते. अर्थातच खूपच गंभीर बाब असल्याने ती आपल्या वरिष्ठांशी याबाबत बोलते आणि ऑफिसमधून बाहेर पडते. बाथरूम मधल्या स्टूलवर बसून पाय स्वच्छ करायला गेल्या आणि स्टूल निसटून तिथल्या तिथे जोरात आपटल्या. तिथल्या तिथे पडल्या असल्या तरी त्यांच्या खुब्याचे हाड मोडले होते आणि त्याचे तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे होते. ऑपरेशन नंतरही त्यांना ऊठ-बस करायला जमेल की नाही याची शंकाच होती. आता त्यांच्य...

प्राध्यापक असूनही हा माणूस पत्र्याच्या डब्यापासून काचरापेटी बनवतोय!

Image
शाळेत जाऊन मुलांना फक्त गमभन लिहायला वाचायला शिकवणं एवढंच शिक्षकाचं काम नाही तर, समाजात एक सुजाण नागरिक म्हणून कसं वावरायचं? याचे धडेही आपल्याला शिक्षकांकडूनच मिळतात. समाजातील न्याय आणि नैतिक मुल्यांची शिकवणही आपल्याला आपले शिक्षकच देतात. म्हणूनच आई-वडिलांच्या नंतर आपल्याला आपल्या शिक्षकांविषयी प्रचंड आदर वाटतो. आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबतच समाजात जागरूकता निर्माण करणारा एक शिक्षक काय काय करू शकतो हे जर पहायचे असेल तर आपल्याला उत्तराखंड राज्यातील अल्मोडा तालुक्यतील शिक्षक जमुना प्रसाद तिवारी   यांच्या विषयी जाणून घेतलं पाहिजे. Image source : Google प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होते असेही म्हणायचे आणि दुसरीकडे तेच प्लास्टिक विविध रुपात बाजारात आणायचे. हा दुटप्पीपणा सहन न होणारे जमुना प्रसाद यांनी पत्र्याच्या डब्यापासून कचराकुंड्या बनवल्या. स्वतःच्या हातानी बनवलेल्या या कचराकुंड्या ते आजूबाजूच्या लोकांना फुकटात वाटतात. पर्यावरण वाचवा आणि स्वच्छता राखा अशा नुसत्या घोषणा देऊन पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात तिवारी यांना फारसा रस नाही. त्याउलट त्यांनी स्वतः एक अशी वाट निवडली...

मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी या प्रकारचा आत्मसंवाद तुम्ही कधी केलाय का?

Image
“रोजचा दिवस कुठे उगवतो आणि धावपळीत कसा मावळतो हेही कळत नाही. दिवसभरात कसला तो निवांतपणा नाही. नुसती दगदग दगदग दगदग! आणि इतकं करून मिळतं काय? काहीच नाही. प्रत्येकाकडून आम्हालाच बोलून घ्यावं लागतं.” श्रियाचा पारा चांगलाच चढला होता. आज ऑफिस मध्ये असूनही ती नसल्यासारखीच होती. सकाळी सकाळीच स्वारी भलतीच नाराज आणि भडकलेली दिसत होती. खरं तर श्रियाच काय पण कधी कधी आपणही असे विनाकारण भडकलेले असतो. आपल्या मनात नेमका कसला संताप खदखदतोय ते आपल्यालाही कळत नसते. होतं काय की रोजच्या धावपळीत आपण आपल्या मानसिक अवस्थेकडे लक्षच देत नाही आणि मग आतली उलथापालथ अशी अचानक बाहेर पडते.   Image source : Google आपल्या मनाची उलथापालथ अशी अचानक बाहेर पडत असेल, सतत आपला संताप होत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवरूनही पारा चढत असेल तर आपण थोडं आपल्या मनाकडे लक्ष द्यायला हवंय. कारण, राग राग करणाऱ्या, सतत चीडणाऱ्या व्यक्तीसोबत राहायला इतरांनाही आवडत तर नाहीच पण तुम्हाला स्वतःलाही पुढे जाऊन या गोष्टीचा मोठा फटका बसू शकतो.   आपले व्यक्तिमत्व प्रसन्न, शांत, प्रफुल्लीत आणि उत्साही बनवायचे असेल तर आपल्या मनाशी हो...

एकटे राहण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Image
तो स्वतः पार्ट्या, मित्रपरिवार, मौजमजा करण्यात व्यस्त असतो पण तिच्यावर संशय घेतो. तिने घरातून बाहेर पाऊल जरी ठेवलं तरी त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. तिने कुठं जायचं, कुणाला भेटायचं, कधी भेटायचं हे सगळं तोच ठरवतो. तिने घरातील कामे वेळेत केली नाहीत की लगेच तिला वेळेचा हिशोब विचारतो.   तो कधी कधी उशिरा घरी येतो. त्याला काही तरी नवं शिकायचं आहे. तिला मात्र त्याचं हे तासानतास बाहेर राहणं आवडत नाही. सतत त्याच्या घरच्यांच्या संपर्कात राहतो म्हणून तिला चीड येते. तिच्या मागण्या पूर्ण नाही केल्या की घर डोक्यावर घेते. सतत हे का? ते कशासाठी विचारत राहते? भुणभुण लावते.   Image source : Google दोन्ही उदाहरणे वेगवेगळी आहेत पण दोन्ही ठिकाणी समस्या एकच आहे, जोडीदार!   प्रत्येक जोडप्यात तशा कुरुबुरी आणि तक्रारी असतातच. शंभर टक्के प्रेम किंवा शंभर टक्के तिरस्कार असा कुठल्याही नात्यात नसतं तरीही काही काही ठिकाणी काही लोक आपल्या हट्टापोटी, असुरक्षितते पोटी इतरांच्या पायात बेड्या अडकवतात. प्रेम करणं म्हणजे सतत दुसऱ्याची काळजी करणं नव्हे हे अशा लोकांना समजतच नाही किंवा सतत दुसऱ्य...