Posts

पुण्य एनकॅश करण्याच्या या काळात पाप मात्र फोफावत चाललंय…!

तो कळकट चेहरा. मळके कपडे. काडीसारखे हातपाय. भिरभिरणारे डोळे. हताश, आगतिक, हतबल तरीही आशा लावून बसलेले.  आपल्या या दयनीय परिस्थितीची कुणी तरी दखल घेईल. आपल्याकडे कुणाचं तरी लक्ष जाईल. आपण पकडूच कुणाला तरी ज्याच्या मनात कणव असेल. आपल्याकडे पाहून ज्याचं काळीज हलेल. ज्याला दान करून पुण्य पदरात पाडून घ्यायची हौस असेल.  पाप धुवून पुण्य एनकॅश करण्यासाठी जमलेल्या या गर्दीत त्याच्या गळाला लागतील असे चिक्कार मासे होतेच आजुबाजुला. तरीही आपली शिकार होऊ न देता, त्याला शिकार शोधायची होती सावधपणे.  हां सापडली.  "काकु खायला द्या ना." एवढंस लेकरू. खायलाच तर मागतंय. चला देऊन टाकू म्हणून तिनेही विचारलं, "काय खाणार?" "चिकन राईस." दोघे समोरच्या चायनीज टपरीवर गेले. सगळी खाऊ गल्ली ओसंडून वाहत होती गर्दीने. तो टपरीवाला त्यांना पाहून गालातल्या गालात हसला. तिने हाफ चिकन राईसची ऑर्डर दिली.  टपरीवाल्याच्या चेहऱ्यावरील भाव बघून तिने हेरलं काही तरी घोळ आहे.  एका भुकेल्या जीवाचा आत्मा शांत करावा इतकं साधंसुधं प्रकरण नाही वाटत हे.  टपरीवाला गोंधळलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होता, ...

Just read - must readआठवणीत चिंब करणारा पावसाआधीचा पाऊस,

Image
पावसाआधीचा पाऊस - शांता शेळके  नेमेचि येतो पावसाळा, हा सृष्टीचा नियमच. या पावसासोबत काही आठवणीही येतात. बालपणीचा पाऊस कसा सुखद असतो, हल्ली मात्र पाऊस म्हणजे अनंत कटकटींचे पाल्हाळ. एक घटना घडावी आणि त्या मागून मनात आठवणींचे तरंग उठावेत, हे ही काही नवीन नाही. शांताबाईंनी अशाच एका घटनेतून जन्मलेल्या आणि त्याच्याशी समरूप असणाऱ्या असंख्य आठवणी यातील ललित लेखांत शब्दबद्ध केल्या आहेत.  त्यांची चिंतनशील वृत्ती, कविमनाची संवेदनशीलता, सहानुभूती या लेखातून प्रकट होतेच पण, एखाद्या घटनेनंतर मनाचा प्रवास कसा होत जातो तेही इथं दिसतं. त्यात हा प्रवास तर कवी मनाचा. यात घटना आणि आठवणींचा बंध उलगडताना त्यातील अनेक छुप्या कंगोऱ्यांचे सखोल दर्शन घडते.  सोपी, रसाळ आणि मनाचा ठाव घेणारी भाषा. त्यामुळे वाचनाची सहज तंद्री लागते. वाचताना अनेकदा वाटतं, आपणही हे अनुभवलंय, पाहिलंय किंवा अनुभवत आहोत. खरं तर प्रत्येक लिखाणात आपल्या भावभानांशी साधर्म्य असलेलं काही ना काही सापडतंच. तसं ते इथंही जाणवतं.  आजुबाजुला घडणाऱ्या घटनांचे सखोल निरीक्षण, जीवनाबद्दलचे कुतूहल, गुढ, अज्ञात गोष्टींची ओढ, हुरहूर, घ...

Just Read - Must Read डिप्रेशन - नैराश्यासारख्या गंभीर आजाराची खोली आणि व्याप्ती समजावून देणारं पुस्तक

Image
सध्याच्या काळात सर्वच पातळ्यांवर जाणवणारी एक भीषण समस्या म्हणजे मनोविकार. त्यातही नैराश्य ( Depression) चं प्रमाण खूप जास्त आहे. एकूण लोकसंख्येपैकी किमान 10% लोकांना तरी या समस्येनं ग्रासलेलं आहे, पण याची तीव्रता अजूनही म्हणावी तशी लक्षात आलेली नाही. अलीकडच्या काळात याचं प्रमाण वाढलं असलं तरी, हा आजार काही नवा नाही. मग याची कारणं काय असू शकतात , याची लक्षणं काय असू शकतात आणि हा आजार केव्हापासून मानवासोबत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर , प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी लिहिलेलं डिप्रेशन (नैराश्य) हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं. Image source - vachan.com नैराश्य म्हणजे काय , त्याची लक्षणं काय , त्याची सुरुवात कशी होते आणि यावर आजवर कोणकोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्यांचा विकास कसा झाला, या सगळ्याची सखोल आणि उत्तम माहिती या पुस्तकात दिली आहे. बरेचदा आपल्याला नैराश्य म्हणजे काय? ते कसं असतं आणि ज्या व्यक्तीला या विकारानं घेरलंय त्याची अवस्था कशी असते हेच कळत नाही. ‘काही नाही सगळे मनाचे खेळ आहेत,’ असं म्हणून आपण एखाद्या नैराश्यग्रस्त व्यक्तीला आण...

आई - वात्सल्यमूर्ती की न दिसणारा एक अबोल संघर्ष ?

Image
मला हे का लिहावं वाटतंय ? तर फक्त ‘हे असंही असतं,’ हे इतरांना समजावं म्हणून. मानसिक आरोग्याच्या बाबतीत मी सातत्याने लिहित आहे. कारण एक तर हा विषय मा‍झ्या आवडीचा आहेच पण, काही अत्यंत वाईट कारणांमुळे खूपच जवळचा झालेला आहे. गेल्या वर्षी मी आईपणाची दुसरी बाजू नावाचा एक लेख लिहिला होता ज्यात पोस्टपार्टम डिप्रेशनचा आई आणि बाबा दोघांवरही कसा परिणाम होतो याबद्दल लिहिलं होतं. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या नातीने याच डिप्रेशनमधून आत्महत्या केल्यानंतर हा विषय चर्चेत आला. बाळंतपणानंतर स्त्रीचे मानसिक आरोग्य कितपत खालावू शकते याचे ते एक उदाहरण होते. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा अशा घटना घडतात तेव्हाच आपले डोळे उघडतात. एरवी आपल्या आजूबाजूला जेव्हा अशीच उदाहरणं दिसतात तेव्हा मात्र आपण सोयीस्करपणे डोळ्यांना झापड लावून घेतो. दुसऱ्याच्या मानसिक आजारात त्याला साथ द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं हेच कदाचित अजून आम्हाला कळलेलं नाही आणि हे समजून घेण्याचे मार्ग सुद्धा खूप कमी आहेत. म्हणून हे होत असावं. Image source : Google आज आम्ही प्रेमचा चौदावा वाढदिवस साजरा केला. या निमि...

विषादाची आत्मकथा

Image
तिने गळफास घेतला. आता ती गेली. कायमची. तिला कणाकणानी मरताना पाहणं वेदनादायी होतं खरं. पण सुटले मी तिच्या मरणानंतर. Image source: Google  "तिनं आत्महत्या का केली?" माझ्यामुळंच. मीच कारणीभुत तिच्या जगण्याला आणि मरण्याला सुद्धा. इथं तिला असं लटकताना बघतेय. शांत वाटतंय.  सगळे प्रश्न संपले? कि नविन निर्माण झाले? का केलं मी असं?  कारण वैताग आला होता रोजची किरकिर सहन करण्याचा. दररोज उठून जगण्याचा. सहन करण्याचा, रागावण्याचा, भांडण्याचा, ऐकण्याचा, ऐकून घेण्याचा, बोलण्याचा आणि बोलून दाखवण्याचा. सगळं चक्र एकदासं संपून जावं, म्हणून केलं मी हे. जगण्याची ही भयानक बाजू मी नेहमी तिला दाखवत राहिले.  तिला आकाशात उडणारी फुलपाखरं खुणावायची तेव्हा मी तिला गांधील माशीची घरटी दाखवली आणि सांगितलं की यांचा डंख खुप दाहक असतो.  तिला पावसात भिजायला आवडायचं तेव्हा, मी दाखवला तिला पायाखलचा किचकिच चिखल. तिला खिदिखिदी हसायला आवडायचं तेव्हा मी तिला भिती घातली, असं खिदिखिदी हसणाऱ्या बाईला चार लोकं चांगलं नाही म्हणत.  तिला आरशात न्याहाळायला आवडायचं तेव्हा मी सांगितलं की ती चारचौघींपेक्षाही ख...

खुन्याचे शब्द

माझ्या हातातला चाकू फिरत होता आणि डोक्यात विचार. किती तरी वेळ गेला आणि मी भानावर आले. कांदा कापण्यासाठी म्हणून घेतलेला चाकू हतात तसाच होता. पुढ्यात ठेवलेला कांदाही तसाच.  आजुबाजुला कापल्या गेलेल्या शब्दांच्या बेवारस मढ्यांचा खच लागला होता आणि नाकात शिरणारा कुबट वास डोक्यात झिणझिण्या आणत होता. आता पुन्हा नवा विचार खुन तर केला पण या मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची ? © निर्मोही 

ध्यानाबद्दलचे हे प्रश्न तुम्हालाही पडतात का?

Image
सर्वांसाठीच ध्यान करणे फायद्याचे आहेच. त्यातही चिंता, अतिविचार, नैराश्य, निद्रानाश अशा मानसिक विकारांनी ग्रस्त लोकांसाठी ध्यान करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. एकदा ध्यानाला सुरूवात केल्यानंतर ध्यान दिवसातून कितीवेळा आणि कितीवेळ करू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो. सुरूवात करताना तुम्ही अगदी कमी वेळ घेतला तरी हरकत नाही. हळूहळू तुम्ही ही वेळ वाढवू शकता. अमुक इतका वेळ ध्यान केलं तरच त्याचा फायदा होतो असा काही नियम नाही. ध्यान करण्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते तुमचं सातत्य. सुरुवातीलाच जर तुम्ही फार मोठी अपेक्षा ठेवली तर तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे म्हणून सुरुवातीला ध्यानामध्ये सातत्य राखणे हेच ध्येय ठेवा. ध्यानातून मिळणाऱ्या फायद्यांचा विचार लगेच करू नका. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने याचे फायदे दिसून येतात.  सुरुवातीलाच तुम्ही तास किंवा अर्धा तास तरी ध्यान करणारच असा हट्ट करून बसलात तर तुमचं ध्यान व्यवस्थित होणार नाही आणि त्याचे अपेक्षित परिणाम पण दिसून येणार नाहीत. ध्यान करून झाल्यानंतर तुम्हाला अधिक उत्साही आणि फ्रेश वाटलं पाहिजे. ध्यान सुरू केल्यानंतर अपेक्षित परिणाम लगेच दि...