Posts

तणाव तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यासोबतच तुमच्या आनंदाचाही बळी घेऊ शकतो.

Image
दररोज आपण कितीतरी गोष्टी हाताळत असतो. घरची बाहेरची ऑफिसची दैनंदिन कामं करत असताना आपल्याला सतत काही विचार करावा लागतो , निर्णय घ्यावे लागतात , कुटुंबीय , ऑफिस कलीग यांच्याशी संवाद साधावा लागतो. त्यांची मदत घ्यावी लागते. कधी त्यांना मदत करावी लागते. या सगळ्या गोष्टी नेहमीच अगदी सुरळीत होतात असं नाही. कधी कधी यात काही उन्नीस-बीस होत राहतं. कधी घरच्यांशी खटकतं, कधी ऑफिसमध्ये तर कधी अगदी प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तीसोबत. आपल्याला यावर एक तर काही कृती करावी लागते किंवा आजूबाजूला काय घडतंय यावर सतत लक्ष ठेवून असावं लागतं. यातूनच निर्माण होतो तणाव. हा तणाव जर प्रमाणाबाहेर जायला लागला तर मात्र त्याचे शारीरिक , मानसिक आणि भावनिक परिणाम दिसायला लागतात. सरळसध्या आयुष्यावरही हा तणाव वाईट परिणाम घडवून आणतो. आपण सतत तणावात असतो किंवा तणाव आपल्यावर हावी होत आहे, हे ओळखायचं कसं पण ?   आपण तणावात आहोत हे आपल्याला त्या-त्या क्षणी जाणवतंच पण हा तणाव निवळला गेला की साचून राहिला हे कसं ओळखायचं ? वाढलेल्या अतिरीक्त तणावाची काही लक्षणे आहेत. जी आपल्या मानसिकतेतून , शारीरिक व्याधीतून आणि भावन...

दोन मनं एक अंतर!

Image
तिचे डोळे एकाच वेळी हसतातही आणि उदासही होतात. जणू त्या डोळ्यांना क्षितीजपल्याड झेपावायचं असतं. पण जमत नाही. वारंवार प्रयत्न करूनही! तरीही ती प्रयत्न सोडत नाही. जितके दूरपर्यंत नजर फेकता येईल तिथपर्यंत ती जाण्याचा प्रयत्न करते. नजर आहे तोवर नजरेचा टप्पा संपणार नाही हे माहित असूनही. आपल्याच नजरेच्या विळख्यात गढून गेलीये ती. मागे एकदा कधीतरी ती म्हणाली होती की आता एक माणूस हवंय.... ती माणसात रमणारी नव्हे आणि तरीही तिला मित्र का हवा होता? आजूबाजूला कित्येक लोक असतात. त्यांच्याशी हसावं, बोलावं हे एक वर्तन व्यवहार म्हणून ठीक आहे. पण.... काही गोष्टी जुळत नसतात. कधीच जुळत नसतात. पूर्वीही ती अनेकदा हे बोलली आहे. तिचं हे मागणं तरी खरं कि खोटं हेही कळत नाही. तिच्या सोबत असले तरी आपण तिच्यात नाही... हे मला फार वेळा जाणवलेलं आहे. कधीकधी वाटतं तिच्या-माझ्यातील हे अंतर फार बरं आहे. त्यामुळे मला तिच्या झळा सोसाव्या लागत नाहीत.   हल्ली बरेचदा तिच्यातील अधुरेपणाची जाणीव गडद होत जाते. इतकी की ती मलाही जाणवावी. मला नेहमी वाटतं ती स्वतःला हरवत चालली आहे.   एकदा तिला विचारलंच कसा मित्र हवा तुला. ...

तणाव हाताळण्याच्या काही प्रभावी पद्धती!

Image
दररोजच्या थकवा आणणाऱ्या रुटीन कामापासून ते अचानक उभ्या राहिलेल्या एखाद्या संकटामुळे आपल्याला तणाव जाणवतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी कामे अशी असतात ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही थकवा येतो. हा थकवा किंवा हा तणाव कमी करण्यासाठी आवर्जून वेळ दिला नाही तर तो वाढत जातो आणि एखाद्या दिवशी याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.  आपण नेहमीच बाह्य परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. पण मनस्थिती जर नीट हाताळता आली तर येणारा तणाव आणि त्यामुळे निर्माण होणारी शारीरिक-मानसिक गुंतागुंत आपण नक्कीच टाळू शकतो. तणाव तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. अतिरिक्त तणावामुळे तुमचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते. म्हणूनच शरीर आणि मन दोन्हीवरील ताण  हलका करणं खूपच गरजेचं आहे. या लेखात आपण तणाव हाताळण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनाचा आनंद घेऊ शकाल आणि तणावाच्या गंभीर परिणामापासून स्वतःला दूर ठेऊ शकाल. आता तणाव निवळण्यासाठी प्रत्येकाला एकच मात्रा लागू होईल असे नाही. प्रत्येकाला येणाऱ्या तणावाचे कारण ...

सात्विक कॉफी

Image
दिवस पहिला आज आईला अस्वस्थ वाटत होतं. भावासाठी नाष्टा घेऊन जाता जाताच ती खाली कोसळली.  दिवस दुसरा आज आई शुन्यात नजर लावून बसले. तिला काही तरी बोलायचं आहे बहुतेक. आता घाई आहे. जावं लागेल. आधीच तिच्या आजारपणात भरपूर खाडे झालेत. संध्याकाळी बघू. घरात कधी संध्याकाळ होतंच नाही. होते ती थेट रात्र. रात्रीचं जेवण उरकणं आणि मग आपापल्या जगात निवांत. आई शुन्यातून बाहेर आलेली दिसली. म्हणजे ठिक असावी. दिवस चौथा आज आई गेली. तिच्या पोस्टमार्टचं कारण‌ काय‌ पण? मरण्यास कारणं बरीच असतात. दिवस आठवा/दहावा/कोणताही आई आठवणीतून जात नव्हती. म्हटलं थोडा वेळ काढून सांत्वन करावं स्वतःचं. सीसीडीत जाऊन कॉफी घेतली. निवांत स्क्रोल करून काही रिल्स लाईक केले. अर्धातास निवांत घालवण्यासाठी हजार-पाचशे घालवायला लागतात. रम, व्हिस्कीनी दुःख हलकं झालं असतं. पण आईला ते पटलं नसतं. त्रास झाला असता.  सात्विक आईसाठी सात्विक कॉफी.  Image source: Yahoo! बस्स आईसाठी इतकंच. हजार-पाचशे, निवांत अर्धा तास आणि सात्विक कॉफी. ©मेघश्री

असुरक्षित मातृत्वाच्या व्यथित कथा..!

Image
प्रसंग – १ माझं सिझेरियन झाल्यानंतर मला एका मोठ्या हॉलसारख्या ठिकाणी ठेवलेल्या बेडवर आणून टाकलं. हो अक्षरश: ‘टाकलं’ हाच शब्दप्रयोग इथे चपखल बसतो. जसं आपण केळीची सालं डस्टबिनमध्ये टाकतो. कारण , केळ खाल्ल्यानंतर तिच्याशी आपलं काही देणं घेणं नसतं. खरं तर सुरक्षित सिझेरियन करून सीपीआरच्या त्या डॉक्टरनी एकप्रकारे उपकारच केले होते. चित्र स्रोत: गुगल खरंच इतकी विदारक, असुविधाजनक , असुरक्षित परिस्थिती आपल्याच नशिबी असावी का असा विचार करत करत अर्धवट शुद्धीत ती रात्र तशीच काढली. दुसऱ्या दिवशी भूल उतरली आणि मी पूर्ण शुद्धीत आले. स्वतःच्या परिस्थितीची फारच कीव वाटत होती. मी उठून बसण्याचा प्रयत्न केला. उठून बसल्यावर जे दिसलं ते जास्त शुद्धीवर आणणारं होतं. समोरच्या बेडवर एक पेशंट होती जिचं पहाटे-पहाटे सिझेरियन झालं होतं. दुसरी मुलगीच झाली म्हणून ती प्रचंड नाराज होती. दोन-तीन तास होत आले तरी तिनं मुलीला जवळ घेतलं नव्हतं, की तिला दूध पाजलं नव्हतं. तिच्या सासरचं कुणीही माणूस दवाखान्यात फिरकलं नव्हतं. तिच्यासोबत तिची कुणीतरी मावशी होती , ती कितीदा तिची समजूत काढत होती. मुलीला पाजण्यासाठी. भुकेनं ...

कोलाज भाग दुसरा

Image
हातातील साखळदंड रुतत होते. खरचटून मनगटाला जखमा झाल्या होत्या. एकाच ठिकाणी बंदिस्त राहून सुरुवातीला चिडचिड, नंतर अगतिकता आणि हताशता वाटू लागली, पण हळूहळू त्या बंदिस्तपणाची सवय झाली. इतकी सवय की, तिथून बाहेर पडण्याची कल्पनाही भितीदायक वाटू लागली.  एका ठिकाणीच असं किती दिवस पडून राहणार? खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाच्या एकाच तुकड्यावर किती दिवस समाधान मानणार? हवेची ‘एकच झुळूक’ त्यात दिवसाच्या वेळेनुसार तापमानात होणारे बदल एवढं सोडलं तर आयुष्यात नाविन्य असं काहीच नाही.  बाहेर पडण्याचा विचार केला तर वाट दिसेलही. पण त्या अनोळखी वाटेचीच तर भिती वाटते. कसं असेल इथून बाहेर पडल्यावर दिसणारं जग? आणि खरंच ते ‘तो’ सांगतोय तसं असुरक्षित असेल तर... तसंही इथं बंदिस्त राहून एक दिवस मरणारच आहेस... आणि बाहेरचं जग असुरक्षित असलं तर तिथंही मरणारच आहेस... दोन्हीकडेही मृत्यू हा आहेच... पण न जाणो बाहेर पडल्यावर मरण्यापूर्वी ‘जगण्याची संधी’ मिळेल. हा दुसरा आवाज... पण हा इतका क्षीण असतो की, त्याचं ऐकावं वाटत नाही...त्यात दम असत नाही... ना जरब आणि जबरदस्ती असते... ऐकलं तर ऐक नाही तर राहूदे असा एक विचित्र अलि...

कोलाज

Image
खिडकीतून बाहेर पाहिलं तर फक्त रणरण ऊन दिसत होतं. उन्हाच्या तडाख्यानं झाडं मलूल झालेली. ते दृश्य पाहून तिचंही मन कदाचित मलूल झालं होतं. ती नव्या जगाच्या शोधात निघाली होती. पण निर्धास्त मन नव्हतं. नव्या क्षणांवरही आपल्या आधीच अपशकुनी सावल्यांनी घर केलं असावं अशी धास्ती होती. मध्येच आपल्यातील ही विषण्णता झटकून तिने दीर्घ श्वास घेतला. बाजूला बसलेल्या मुलाचा हात हातात घेऊन घट्ट दाबला आणि त्याच्यावर ओठ टेकवले. ओल्या पापण्या मिटून शांत होण्याचा प्रयत्न केला. तरीही मनातील द्वंद्व संपत नव्हतं. आतील धडधड थांबत नव्हती. मनात उठणाऱ्या प्रश्नांना ती कुठल्याच प्रकारे समाधानकारक उत्तरे देत नव्हती. होईल , बघू , अशा अर्धवट शक्यातांवर आधारलेली तिची उत्तरं तिलाच पटत नव्हती. तरीही अल्लडपणा न शोभणाऱ्या वयात तिला आणखी एक आंधळी कोशिंबीर खेळायची होती. कशासाठी ? तिलाही माहीत नव्हतं. ऊन झेलणारी झाडं बघून तिला हसू येत होतं. या झाडांच्या जागी आपण असतो तर इतकं ऊन झेलून सावली देऊ शकलो असतो का ? असा एक पोकळ अतिमानवी विचार स्पर्शून गेल्यावर तिचं तिलाच तिच्या मूर्खपणाचं हसूही आलं. रस्ता पळत होता पण थांबण्याचं न...