Posts

पुनीत काळाच्या पडद्यावर ठसा उमटवणारा 'रिअल हिरो'!

Image
काल दुपारी ती बातमी धडकली आणि धक्काच बसला. अवघ्या ४६ व्या वर्षी कन्नड पॉवर स्टार पुनीत राजकुमार याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू. पहिल्यांदा कू मराठी अॅपवर जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा विश्वासच बसला नाही. अशीच अफवा असेल असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. पण, नंतर विवध न्यूज चॅनेल्सवरूनही जेव्हा ही बातमी प्रसारित होऊ लागली तेव्हा मात्र मन सुन्न झाले. पुनीथ राजकुमारच्या जाण्याने संपूर्ण कन्नड चित्रपट सृष्टी दु:खाच्या खाईत लोटली गेली आहे. त्याच्या अशा अवचित जाण्याच्या बातमीने त्याच्या दोन चाहत्यांचाही हृद्यविकाराने मृत्यू झाला आहे तर एका चाहत्याने आत्महत्या ऐकल्याचे समजते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या चाहत्यांनाही ही बातमी पचवणे खूप अवघड गेले असणार. फिटनेस , अॅक्टिव्हनेस आणि दानशूरता यासाठी ओळखला जाणारा पुनीत असा जाऊ शकतो हेच मुळी अविश्वसनीय! मरणानंतरही तो आपले दोन्ही डोळे मागे ठेवून जातोय. ( त्याचे वडील, सुपरस्टार डॉ. राजकुमार यांनीच १९९४ सालीच आपल्या कुटुंबातील सर्वांनीच नेत्रदान करावे   अशी तरतूद केली आहे.)   एक कलाकार म्हणून तर तो ग्रेट होताच पण माणूस म्हणूनही तो...

तुम्हाला जखडून ठेवणाऱ्या या बेड्या तुम्ही ओळखल्या आहेत का?

Image
आपली मानसिकता , आपला दृष्टीकोन, आपले विचार , या गोष्टींमुळे आपल्याला आपल्या ताकदीचा कधी अंदाजच येत नाही. मानसिक तणाव , विचारातील गोंधळ , नकारात्मक विचार , निराशा , राग या सगळ्यांचा आपल्या प्रगतीवर विपरीत परिणाम होत असतो. या सगळ्यांपासून स्वतःची सुटका करून घेणं तसं सोपं आहे. गरज आहे ती ठामपणे निश्चय करण्याची. Image source : Google दिवाळीच्या मुहूर्तावर घराची साफसफाई झाली असेल तर याच मुहूर्तावर एकदा अंतर्मनाची साफसफाई करून तिथे उर्जेचा , उत्साहाचा , दिवा लावण्याचा संकल्प करूया. पहिली स्वच्छता करायची आहे ती , भीतीची. भीती कशाचीही असू शकते. अगदी लोक काय म्हणतील इथपासून ते आपल्याला जमलंच नाही तर ? आपण अपयशी झालो तर ? अशा कल्पनांनी मनात असा काही ठिय्या मांडलेल असतो की , कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वीच काही लोक हातपाय गाळून बसतात. अपयश आले तरी कोणी तुम्हाला खाऊन टाकणार नाही. उलट त्यातून तुम्हाला नवीन काही तरी शिकायला मिळेल. म्हणून अपयश आले तरी त्याकडे एक धडा म्हणून पाहिल्यास त्याची भीती राहणार नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले जाते. पण जर या पायऱ्या सारख्...

तुमची भीती हाच तर तुमच्या मार्गातील मोठा अडथळा नाही ना!

Image
एखाद्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी , एखादी नवे कौशल्य शिकण्यापूर्वी, एखादी नवी कल्पना सत्यात उतरवण्यापूर्वी , आपल्या मनात बरेच प्रश्न थैमान घालत असतात. आता हे मला जमेल का ? मी ठरवतोय तसं नाही घडलं तर ? आता याचा काही फायदा होईल का ? इतका वेळ देणं शक्य होईल का ? असे असंख्य प्रश्न कुठून उगम पावतात माहितीये ?   Image source : Google आपलं रुटीन लाईफ सोडून आपण काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपलं मन विनाकारण असहकार पुकारतं. का तर मनालानव्याने काही व्याप नको असतात. आहेत त्याचाच गुंता सोडवता सोडवता त्याला थकवा आलेला असतो. मग मन अनेक करणं द्यायला सुरुवात करतं. त्यातूनच आपल्या मनात यशाबद्दल संभ्रम आणि अपयशाची भीती बसते. अपयशाची ही भीती सर्वांनाच वाटत असते पण , या अपयशाच्या भीतीवर मात करण्यासाठी काही तरी केलं पाहिजे. जेणेकरून आपणच आपले पाय मागे खेचतोय असे होणार नाही.   यापूर्वी आपण कधी केलय का असलं काही? नाही ना ? मग आत्ता अचानक उठून काहीही करण्यात काय हाशील आहे ? आपल्याला इतकी धावपळ दगदग झेपणार नाही. घर सोडून जायचं पण , मग घरच्या जबाबदाऱ्या कोण बघणार...

ध्यान करण्यासाठी गंभीर होण्याची काय गरज?

Image
ध्यान, मेडिटेशन, माइंडफुलनेस किंवा जागरूकता असे शब्द वाचनात किंवा ऐकण्यात आले तर आपल्याला वाटते की यासाठी आपल्याला खूपच गंभीर होऊन जगावं लागेल किंवा यागोष्टी म्हणजे एक फार मोठे गूढ आहे. अर्थात या गोष्टी सहज शक्य नाहीत असा आपला समज असल्याने आपल्याला असे वाटते की, ध्यान करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी खास वेळ काढावा लागतो आणि अशा व्यक्तिमध्ये खूप मोठा बदल होतो.   Image Source : Google तुम्हालाही असे वाटत असेल तर, हा एक गैरसमज आहे. मेडिटेशन म्हणजे खूप काही गंभीर प्रकार नाही. अगदी रोजची दैनंदिन कामे करता करताही आपण मेडिटेशन करू शकतो. असं मी नाही तर प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता रसेल ब्रॅंडचे मत आहे.   त्याच्या मते मेडिटेशन केल्याने आणि माइंडफुलनेसचा सराव केल्याने, मनात येणारे विचार आणि भावना यांच्याकडे तटस्थतेने पाहण्याची कला मिळाली.   माइंडफुलनेसचा हसतखेळत सहजतेने अनुभव कसं घ्यावा ही संगण्यासाठी त्याने स्वतःचा पॉडकास्ट सुरू केला आहे. माइंडफुलनेस किंवा मेडिटेशनल सुरुवात केल्याने आपल्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवता येतो. बाहेरच्या कोलाहलातही शांतता मिळते. त्यामुळे ...

सबसे बडा रूपय्या-२

Image
पैशाने आनंद विकत घेता येत नाही हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे, की पैशशिवाय आनंदीही राहता येत नाही. पैसा सर्वस्व नसला तरी, आवश्यक तरी नक्कीच आहे. पैशाची उणीव किंवा आवश्यक तितका पैसा हातात नसेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा होतात ही आपण सर्वचजण अनुभवत असतो.   Image source : Google पैशाबद्दल आपण चुकीच्या भावना किंवा गैरसमज बाळगल्याने आपल्यापासून पैसा कसा दूर जातो ही आपण मागच्या लेखात पहिलंच आहे. मग हवा तितका पैसा मिळवायचा असेल तर काय करावं लागेल. तर त्यासाठी आधी विश्वास ठेवावा लागेल की, आपल्याला हवा तितका पैसा या जगात उपलब्ध आहे आणि तो आपल्यालाही मिळणार आहे.   आपल्याला पैसा मिळणार आहे हा विश्वास ठेवून तुम्ही फक्त ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं म्हणत बसायचं नाहीये. तर त्यासाठी तुम्ही जे काम करू शकता, जे कष्ट करू शकता जे प्रयत्न करू शकता तेही करायचेच आहेत. फक्त विश्वास ठेवून नाही तरी विश्वासाने प्रयत्न करूनच आपल्याला आपले इच्छित ध्येय साध्य करता येतं एवढं लक्षात ठेवा.   एक मुलगा होता ज्याला कॉमेडी करण्याची खूप आवड होती. त्याचे वाडीलही उत्तम विनो...

सबसे बडा रूपय्या!

Image
रोज उठून तुम्हाला त्याच त्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे का? रोज उठून आज हे बिल भरायचं राहिलं, एवढे पैसे कुठून आणू? घराचं भाडं तटलेय? फोनचा रीचार्ज संपला? हेच प्रश्न तुमच्याही डोक्यात थैमान घालतात ? आपल्या गरजा आणि आपली कमाई यांचा मेळ बसत नाही? बरोबर ना? जगातील काही लोकांकडे हवा तितका पैसा आहे आणि काही लोकांकडे मात्र आपल्या मूलभूत गरजा भागवण्या इतकाही पैसा नाही, असे का? काही लोकांना आयुष्यात कधी पैसा कमी पडत नाही आणि काही लोकांना मात्र तो कधीच पुरत नाही. कितीही पगार असो काही लोकांच्या हातात पैसा टिकतच नाही, अशीही माणसे तुम्ही पहिली असतील. Image source : Google   कितीही प्रगती करण्याचा पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी आहे तिथेच अडकून पडल्यासारखे वाटते. पैसा हा सर्वांसाठीच एक महत्वाची गरज आहे. सारे काही पैशानेच होते असे नाही पण पैसा असल्याशिवाय काही होत नाही हेही तितकंच खरं. पैसा बघण्यापेक्षा मन बघा ही सांगणं सोपं आहे, पान एक टप्प्यावर तुमच्याकडे पैसे आहेत का? असतील तर किती आहेत? या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात.   आपल्याकडे पैसा येत नाही किंवा टिकत नाही असे जर तु...

आभाराचा भार हलका करण्यासाठीही लिहिलं पाहिजे!

Image
लिहिल्याने मनातील भावनांना बाहेर येण्याचा मार्ग सापडतो. आज सोशल मिडीयाच्या जमान्यात प्रत्येकालाच रोज काही ना काही नवी पोस्ट करायची असते त्यामुळे भावनांची अभिव्यक्ती होऊन जातेच. आपल्या मनात दररोज कितीतरी विचार येतात आणि त्यातील कोणता तरी एक विचार आपल्या मनाची पकड घेतो आणि दिवसभर आपण त्याच मूड मध्ये राहतो. सकाळी उठल्या उठल्या अचानक आपल्याला एखादी जुनी वाईट घटना आठवली की सकाळी-सकाळीच आपला मूड बिघडून जातो. सकाळचा मूड सावरण्यासाठी मी स्वतःला कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावून घेतली.   यामुळे सकाळी-सकाळी काहीही भलते सलते आठवून त्याच विचारात कैद होण्यापेक्षा कृतज्ञतेची पवित्र भावना मनात ठेवून दिवसाची सुरुवात केल्याने मन प्रसन्न होते. विशेषत: एखाद्या अवघड पेचात अडकलो असू तर अशावेळी मनातील आंदोलने नियंत्रित करण्यास या सवयीचा फारच चांगला उपयोग होतो.   लॉकडाऊनच्या काळात एकतर बाहेर येण्या-जाण्यास मज्जाव, चोहोबाजूंनी कोरोना, वाढती रुग्ण संख्या, मृतांचा वाढता आकडा, या आणि अशाच बातम्यांचा भडिमार, उद्या काय होईल, याची अनिश्चितता अशा काळात या सवयीने मला मनाची स्थिरता राखण्यास मदत केली....