Posts

शत्रू तर खूप असतील पण तुम्ही स्वतःचे मित्र व्हा!

Image
बुद्ध म्हणतात, स्वतःशिवाय आपल्याला दुसरे कोणीही वाचवू शकत नाही. बुद्धाच्या विचारातील ही सत्यता जगण्यात उतरवायची असेल तर आपल्याला स्वतःचाच मित्र बनता आलं पाहिजे. स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे आणि स्वतःचा स्वीकार करता आला पाहिजे. स्वतःशी मैत्री करणं खूप गरजेचं आहे कारण, एक मित्रच दुसऱ्या मित्राला समजून घेऊ शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो आणि खरा मार्ग दाखवू शकतो.   एक मित्र आपल्याला उभारी देतो, आपल्यात अशा निर्माण करतो, आपल्या पाठीशी ठामपणे उभा असतो. या सगळ्या गोष्टी कुणी मित्र जर आपल्यासाठी करत असेल तर आपणच आपल्यासाठी का नाही करू शकत? स्वतःशीच पक्की मैत्री झाली तर आयुष्य म्हणजे एक अद्भुत नि रम्य प्रवास बनून जाईल. आपल्याशीच मैत्री कशी करायची हे पाहण्याआधी एका चांगल्या मित्रात कोणते गुण आवश्यक असतात ते आधी पाहूया. चांगला मित्र तो असतो जो आपली बाजू घेतो, आपला आदर करतो, आपल्याला सामावून घेतो, ज्याला आपली गरज असते, जो आपल्याशी मैत्री करण्यायोग्य असतो आणि आपल्या पाठीशी कायम उभा असतो. तुमचे भले व्हावे असे त्याला आतून वाटत असते. तुम्हाला प्रोत्साहन देण्यात, तुम्हाला ऊर्जा देण्यात त्याला क...

स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी आणि शांती मिळवण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटेही वेळ नाही का?

Image
कृतज्ञता ही सर्व सकारात्मक भावनांची जननी आहे, असं म्हटलं जातं. बुद्ध म्हणतात, तुमचा प्रत्येक दिवस कृतज्ञतेने सुरु करा. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणत असे की मला माझे आयुष्य सुखकरपणे जगता यावे म्हणून ज्या-ज्या लोकांची मदत होते त्या सर्वांप्रती मी दिवसातून शंभर वेळा कृतज्ञता   व्यक्त करतो. गोतम बुद्धापासून ते अगदी दलाई लामा यांच्यापर्यंत अनेकांनी कृतज्ञतेचे महत्त्व पटवून दिले आहे आणि ते आचरणातही आणले आहे. या सगळ्या महान लोकांच्या महानतेचे रहस्यच हे होते की ते कृतज्ञ होते.   तुम्हीही जर स्वतःला ही सवय लावून घेतली तर याचे असंख्य फायदे तुमच्या आयुष्यात उतरू लागतील. रोजच्या आयुष्यात कृतज्ञ राहण्याची सवय लावून घ्यायची असेल तर सुरुवातीला तरी तुम्ही कृतज्ञता लेखन केले पाहिजे. कृतज्ञता व्यक्त केल्याने नेमके काय फायदे होतात जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.   कृतज्ञता लेखन किना कृतज्ञता जर्नल लिहिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सकारात्मक राहता येते आणि आपल्यातील सकारात्मकता वाढीस लागते. तुम्ही कोणकोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहात हे जेव्हा तुम्ही लिहून काढता तेव्हा जीवनाबद्दल आणि ज...

मानसिक स्वास्थ्य, काळाची गरज!

Image
मानसिक स्वास्थ्य ही प्रत्येकाची मुलभूत गरज आहे. पण अनेकांना याची जाणीवच नाही. अनेकांना नैराश्य, तणाव, दु:ख, चिडचिड या बाबी खूपच सामान्य वाटतात. आपल्या संपर्कात एखादी नैराश्यग्रस्त व्यक्ति आली की लगेच काही महाशय प्रवचन झोडू लागतात. काही काही लोकांच्या मते सतत उद्योगमग्न राहिल्यास मानसिक नैराश्य भेडसावत नाही. बरोबर आहे हो तुमचं म्हणनं माणसानं उद्योगी असलंच पाहिजे पण, तो उद्योग निदान आवडायला तरी हवा ना!   मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत अगदी घरापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील बराच सावळा गोंधळ आहे. अनेकांना आपण मानसिक दृष्ट्या आजारी आहोत हेच पटत नसतं किंवा पटत असलं तरी ते स्वीकारण्याची हिंमत नसते. मानसिक स्वस्थ्याप्रती समाजात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडून १० ओक्टोंबर हा दिवस जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन म्हणून पाळला जातो.   जागतिक आरोग्य संघटनेची यावर्षीची थीम आहे, “असमान जगातील मानसिक स्वास्थ्य.”   कोव्हीड महामारीच्या काळात अनेक जण मानसिक अस्वास्थ्याचे शिकार झाले आहेत. कारण, या काळाने जगण्याची रीतच बदलून टाकली आहे. जिथे लोक रोज उठून आवर...

तुम्हालाही कसं तरी होतं? अशावेळी तुम्ही काय करता? काय केलं पाहिजे?

Image
कसं तरी होतं! म्हणजे काय होतं नेमकं हे सांगताही येत नाही पण चांगलंही वाटत नाही एवढं खरं. कसं तरी होण्याचा हा अनुभव तुम्हीही घेतलाच असेल. खरं तर हे असं प्रत्येकालाच वाटत असतं. मलाही अनेकदा वाटतं! हे असं का वाटतं? यामागे काय कारण असेल याचा बराच शोध घेतल्यानंतर जाणवलं की याची मुळे आपल्या विचारात आहेत. दिवसभरात मनात कितीतरी विचार येत असतात. काही चांगले तर काही वाईट. यातील कुठल्या विचारावर आपण जास्त विचार करतो त्यावर आपला मूड अवलंबून राहतो. कधी कधी तर अमका एक विचार आपल्या मनाला स्पर्श करून गेला हेही कळत नाही पण, त्या विचारातून निर्माण झालेल्या भावना मात्र आपल्याला सावलीसारख्या चिकटून राहतात. मग मनाची अशी काही अवस्था होते की ती शब्दात सांगता येत नाही, मग आपण म्हणतो मला कसं तरी होतंय! लहानमुलेही या मानसिक स्थितीला अपवाद नाहीत बरं. त्यांच्याही तोंडी तुम्ही अनेकदा हे वाक्य ऐकले असेल. मी तर बऱ्याचदा ऐकलंय! किंबहुना मीच हे वाक्य माझ्या लहानपणापासून अगणितवेळा उच्चारलं आहे. त्यामुळे अमक्या वयातच असं काही तरी होतं, जाणवतं, असं काही नाही. कुठल्याही वयातील व्यक्ति अशाप्रकारच्या अवस्थेतून जातच असते आणि...

मानसिक शांतता मिळवण्यासाठी तुम्ही यातील कोणता पर्याय अवलंबला आहे का कधी?

Image
     Image source : Google आजच्या काळात एक गोष्ट प्रत्येकालाच हवी आहे आणि त्यासाठी काहीजण तर वाटेल ती किंमत मोजायला तयार आहेत! मानसिक शांतता! मानसिक शांतता म्हणजे काही फार दुर्मिळ, अप्राप्य, असाध्य गोष्ट आहे असे अजिबात नाही. पण, सध्याचा काळच इतका तणावाचा, चिंतेचा आणि गोंधळाचा आहे की, मानसिक दृष्ट्या अस्थिर होणं किंवा वाटणं स्वाभाविक आहे. मानसिक शांतता अनुभवण्याचे अनेक मार्ग आहेत. काहींना ती संगीतातून मिळते, काहींना ध्यानातून काहींना मोकळ्या हवेत फिरण्यातून! प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय एकच आहे. मानसिक शांतता!   असे असले तरी कधी कधी मात्र यापैकी कशानेही मन शांत होत नाही. डोक्यातील विचार चक्रे थांबत नाहीत. अशावेळी काय करावं? अशावेळी आहे ती मानसिक स्थिती स्वीकारावी आणि आतून नसलं तर किमान वरून शांत राहण्याचा प्रयत्न करावा. मन चंचल आहे, त्यामुळे कधी अशांत तर कधी शांत हे होतच राहणार आहे. चोवीस तास आपण आतून शांतच असू तर उपयोग काय मग? अशाने जीवनातील रसच निघून जाईल.   मन नुसतंच शांत करून चालणार नाही तर त्यातून आपला व्यक्तिगत उत्कर्ष होणंही गरजेचं आ...

स्वतःला माफ करून अपराधीपणाची बोच कमी कशी करावी?

Image
माणूस म्हटल्यावर कोणत्या ना कोणत्या बाबतीत आपल्याकडूनही चुका होतातच. चूक कशी झाली यावर काथ्याकूट करण्यापेक्षा चूक झाल्यानंतर आपण कसे वागणार आहोत? हे जास्त म्हत्वाचे आहे. काही लोकं इतरांच्या चुका माफ करू शकतात पण, स्वतःच्या बाबतीत मात्र ते जास्तच चिकित्सक बनतात. आपल्या हातून हे झालंच कसं? हा प्रश्न त्यांना पछाडून टाकतो. इतका पछाडून टाकतो की याशिवाय त्यांना दुसरं काही सुचतंच नाही. अपराधीपणाचं ओझं एखाद्या समंधासारखं   मानगुटीवर बसून राहतं आणि मग या समंधापासून पिच्छा कसा सोडवावा हेच कळत नाही.   Image source : Google आपण जे विचार करतो तसेच आपण बनत जातो. आपले विचार आपल्या आयुष्यातील घटनांना आकार देतात, असे बुद्ध म्हणतो. मग तुम्ही जर सतत अपराधीभाव मनात ठेवून वावरत असाल तर काय होईल? तुम्ही आणखीन जास्त अपराधीपणाच आकर्षित कराल. तुमच्या हातून सतत चुका होत राहतील आणि तुम्ही एक बुद्धू, मूर्ख व्यक्ती आहात अशीच तुमची स्वप्रतिमा तयार होईल. एकदा का अशा स्वप्रतीमेत अडकलात की मग त्यातून पुन्हा बाहेर पडणे अशक्यच!   तर मुद्दा हा आहे की, अपराधीपणाच्या ओझ्यातून मुक्त कसं व्हायचं? चला तर...

उद्याचा दिवस आयुष्यात कधीच उगवत नाही. आयुष्यात आपल्या हाती असतो तो फक्त ‘आज!’

Image
चीडचीड, राग, नैराश्य, तणाव, निद्रानाश, अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी जेव्हा एकाचवेळी पछाडतात तेव्हा यातून बाहेर कसं पडायचं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. मानसिक स्थिती एकदा का घसरू लागली की ती कधी रसातळाला पोहेचेल हे सांगता येत नाही आणि मग आपण त्याच त्या घटना, त्याच त्या भावना आणि तेच ते परिणाम अनुभवत राहतो. आयुष्य जणू भोवऱ्यासारखं एकाच जागी गरागरा फिरायला लागतं. अशांत मनाला कशातच रस वाटत नाही, त्याला काही चांगलं दिसत नाही आणि काही चांगलं आठवत नाही. मनाचा प्रत्येक कोपरा काळ्याकुट्ट अंधाराने भरून जातो तेव्हा एक दिवा जरी लावला तरी अशा मानसिकतेतून बाहेर पडायला मदत होऊ शकते. अगदी घोर निराशा नसली तरी जेव्हा जेव्हा एकटं आणि उदास वाटेल त्यात्या वेळी हीच एक सवय तुम्हाला तरून नेऊ शकते. कुठली सवय?   कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय!   समजा तुम्ही फक्त फिरायला म्हणून बाहेर पडलाय! मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलंय हे करू का ते करू अशा अनेक विचारात तुम्ही गुरफटून गेलाय. विचार करता करता तुम्ही चालताय आणि चालत चालत तुम्ही एका झाडीत शिरता, थोडं पुढे थोडं पुढे करत जात राहता पण नंतर मात्र तुम्...