Posts

कोरा कागज भाग-६

Image
  सरला काकू घराजवळ कधी पोहोचल्या हे त्यांचं त्यांना पण कळलं नाही. विचारांच्या तंद्रीत त्या चालतच राहिल्या. रस्ता कधी मागं गेला याचा त्यांना पत्ताही लागला नाही. घराजवळ येताच त्यांना दुरूनच काहीतरी बिघडल्याची जाणीव झाली. जाताना होतं तसं आत्ता का दिसत नाही? हा एक नवा विचार आता त्या घोळवू लागल्या. या विचाराचा धागा पकडून त्या जसजशा घराजवळ येत गेल्या तसतसं त्यांना कळालं की बहुतेक सुदीपनी काही तरी पराक्रम केला असेल किंवा सुषमाने काही तरी आगाऊपणा केला असेल त्याशिवाय इतकं पाणी रस्त्यावर येणार नाही आणि बारीक काळीराख पण उडाली होती सगळीकडे म्हणजे नक्कीच काही तरी मोठा तमाशा करून ठेवला असेल या बाईनं. एका मागून एक येणाऱ्या या असंबंध विचारांनी त्यांचे मन अस्वस्थ होत होते. दारात आल्यावर तर घरात पसरलेली शांतता त्यांना आणखीनच त्रस्त करून गेली. त्या घरात आल्या तर सुषमा आणि सुदीप खाली मान घालून बसले होते. त्यांनी दळपाचा डबा ठेवला आणि इकडे तिकडे बघू लागल्या. सुषमाने भाजीची तयारी तर सगळी करून ठेवली होती. संध्याकाळचे सात वाजायला आहे होते. त्यांना पुढच्या स्वयंपाकाला लागायचं होतं. बाहेर ठेवलेल्या बदलीकडे त...

कोरा कागज भाग-५

Image
  एकतर सासूच्या आजारपणामुळं दिवसभर दगदग झालेली. त्यात ही चकलीची फर्माईश. आईला एवढं जीवावरचं दुखणं आलंय त्याचं लेकाला काही नाही आणि सुनेला मात्र डोस पाजायला सगळे तत्पर. अगदी आयुष्यभर एकमेकींच्या इर्ष्येवर संसार करणाऱ्या जावा पण म्हातारपणात मात्र सुनेच्या बाबतीत वागताना अगदी एक होतात. सासूला जरा आराम वाटायला लागल्यावर तिनं ही सगळी भाजणीची तयारी केली आणि लागलीच दळण घेऊन आली. आज दळण झालं तर उद्या किंवा जमल्यास रात्रीच्या जेवणानंतर लगेचच चकल्या करता आल्या असत्या. उद्याचं सुद्धा काम आज आत्ता कसं होईल याकडेच तिचं लक्ष. कधी तरी निवांत वेळ मिळेल म्हणून बिचारी होता होतील तेवढी कामं हाताबरोबर करण्याचा प्रयत्न करायची. पण, कसलं काय घरातलं काम म्हणजे हनुमानाची शेपटीच करेल तितकी वाढती पण कमी व्हायचं नाव घेत नाही. इथं आल्यावर जरा कुणाशी काय बोलणं सुरु करावं म्हंटलं तर त्यात पण, खोट. शेवंता काकू मघापासून गप्प होत्या आणि अचानकच सुरु झाल्या, “काय उपेग नाही बगा भाड्यास्नी मोठं करून. तुम्हाला सांगतो, नुसतं बायको म्होरं गोंडा घोळत्यात. ” त्यांच्या डोळ्यात उद्वेग होता जणू एकीकडे लेकाला शिव्या तर घ...

कोरा कागज भाग -४

Image
  दारातल्या बॅरेल मधल्या मगानं ती त्या आगीवर पाणी फेकू लागली. शेजारच्या सरू काकू त्यांच्या गॅलरीतून हे पाहत होत्याच. नाही तरी सुषमावर लक्ष ठेवणं हे एक त्यांचं अलिखित कर्तव्य होतं. पाणी मारता मारता तिचं तोंड पण सुरु होतंच. एकतर आधीच सकाळपास्नं घरात दंगा सुरु हाय. त्यात आता तू हे करून ठेवलास. आता काय करायचं. बघ, हे तेंच नव शर्ट जळलं. सुषमाने कशीबशी ती आग विझवली आणि आधी सुदीपला जवळ ओढून घेतलं. तिचं पूर्ण अंग कापत होतं. सुदीप पण घाबरलेला त्याला वाटलं होतं आता मम्मी मारेल. पण, तिने जवळ ओढल्यामुळे तो थोडासा तिच्या बाबत आश्वस्त झाला होता. पण, पुढच्याच क्षणी त्याला पप्पांचा चेहरा आठवला. आता हे पप्पांना कळालं तरी आपल्या दोघांचीही खैर नाही हे त्याला कळून चुकलं होतं. सुदीप शांत झालाय हे लक्षात आल्यावर सुषमाने सगळा कठडा धुवून काढला. कपडे सगळे काढले आणि एका बादलीत टाकले. सगळेच थोडेफार तरी जळालेच होते. आधीच सासूचा सकाळचा बिघडलेला अवतार आणि त्यात आता सुदीपचा हा पराक्रम. तिला फक्त एवढंच कळत होतं की आजचा दिवस काही बरा नाही. पण, तरीही तिने फार धसका वगैरे घेतला नाही. कारण, खराब दिवस कधी अचानक उगव...

मग करावं तरी काय आता?

Image
छे एकटं वाटतंय...! कुणाला फोन करावा का छान गप्पा होतील? किंवा कुणाला तरी मेसेज? अगं सणावाराचं लोकं बिझी असतात त्यांच्या त्यांच्या कामात. सणाची तयारी करायची. पुन्हा ते एन्जॉय करायचं मग छान छान फोटो घ्यायचे त्यावर छान छान पोस्ट लिहायची. गप्प तू कुणालाही डिस्टर्ब नको करू. पलीकडून त्रासिक आवाज आला की पुन्हा तू नाराज होशील. मेसेज करू का कुणाला? अगं सकाळीच बघतीलं ना कसं झालं. तू त्याला सहज विचारलंस, काय झालं रे? मग तो म्हणाला तू गप्प बसत जा. हे बघ लोकं गप्प बसवतात तर मेसेज करून काही उपयोग आहे का त्यांना? त्यांना वेळ मिळाला की करतील ते फोन किंवा मेसेज. तू स्वतःहून काही करायला नको जाऊ कुणाला. आणि काय तो सारखा सारखा फोन आणि मेसेज दुसरी काही कामंच नाहीत का? हम्म. काय करू शकते मी दुसरं.... दुसरं... दुसरं....? पोटात कालवल्या सारखं पण होतंय... थोडं खाल्लं तर बरं वाटेल नाही? अगं किती खाशील? वजन किती वाढलंय? आणि काय करणार काय तू आता? अशा भलत्या वेळी? पुन्हा कुणी संपवलं नाही तर. शिल्लक राहील. पुन्हा टाकून द्यायचं होत नाही म्हणून तुलाच ते शिळं खावं लागेल. पुन्हा अॅसिडिटी वाढेल. त्यापेक्षा स...

कोरा कागज भाग-३

Image
  “तू ऐकलं असशील कदी तर तो ऐकल. नाही तर त्याचं काय नडलंय ऐकायला? कधी कधी म्हणून माया-लेकरांना माझी किंमत केली नाही. कायम मला आपलं वाळीत टाकल्यावाणी वागवत्यात.” बोलता बोलता त्यांचा आवाज कापरा झाला आणि डोळं पाण्यानं डबडबलं. सुषमा पुरतीच गोंधळून गेली. आत्ता तरी आपणहून भाकरीला बसली होती. ही भाकरीला बसली म्हणून मी कपडे-भांडी आवरलं. मग आता अचानकच हिला काय झालं? सुदीप भांबावल्या नजरेनं एकदा आईकडं आणि एकदा आज्जीकडं बघू लागला. गांगरून उभारलेला सुदीप, अस्वस्थ झाला होता, हात पाठीमागे बांधून, भिंतीला पाठ टेकवून तो आपल्या एकच पाय हळूहळू वर आणि हळूहळू खाली आणत तसाच उभा होता. सरला काकूचा आवाज काही शांत होण्याचं नाव घेत नव्हता. त्यात आवाज इतका   मोठा की गल्लीला ऐकू जाईल. सुदीप पण चक्रावला. अचानक आज्जीला काय झालं? तो आपल्या शांत आवाजात म्हणाला, “आगं, टीव्ही सुरु होता. मला तुझा आवाज आला नाही. मी कार्टून बघत   होतो, ते सोडून मला येऊ वाटलं नाही. लगेच रडायला काय झालं तुला?” तो एवढंच बोलला, आणि सरला काकूंचं मस्तक आणखीच फिरलं. “व्हय, व्हय, लगेच वड लगली बघ तुला आईची. कसा बाजू घेतो आईची. एव...

सामान्य, कष्टकऱ्यांचे नेते भाई भरत पाटील...!

Image
    शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील म्हणजे पुरोगामी ,परिवर्तनवादी चळवळीतील एक महत्वाचं नाव.भाऊंचे वडील रंगराव पाटील हे स्वातंत्र्यसैनिक आणि शाहूवाडीचे पहिले आमदार. भाई माधवराव बागल यांच्या वैचारिक मुशीतून तयार झालेले रंगराव  पाटील म्हणजे जनसामान्यांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडणारा जनतेचा आमदार. भाई रंगराव पाटील यांचा हा वारसा समर्थपणे चालविण्याचे काम भारतभाऊंनी केले. शेतकरी,कष्टकरी ,कामगार आणि दलित, शोषितांच्या न्याय हक्कासाठी भारत भाऊंनी आजपर्यंत अविरतपणे संघर्ष केलेला आहे. अन्यायाच्या विरोधात लढणारा नेता अशी भाऊंची प्रतिमा! ही प्रतिमा काही एका रात्रीत तयार झालेली नाही त्यासाठी आयुष्यभर भाऊंनी संघर्ष केला, अनेक प्रस्थापित शत्रूंना अंगावर घेतले, स्वतःचा जीव धोक्यात घातला पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला तेव्हा गरीबांचा शोषितांचा बुलंद आवाज म्हणून भाऊ सुपरहिट झाले.  परिवर्तनवादी चळवळींनी दुहीचा अहंकाराचा शाप आहे. परंतु भाऊ या सगळ्याच्या पलिकडे गेले आहेत. आपल्या समविचारी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे  उभे राहणारे भाऊ नव्या पिढीशी ...

शाश्वत विकासासाठी मानवी एकता!

Image
    आज आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस म्हणजेच I nternational Human Solidarity Day . दर वर्षी २० डिसेंबर रोजी हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. जगभरातील विविध देश, त्यांची वेगवेगळी संस्कृती, खानपान, भाषा, वेशभूषा अशा कितीतरी गोष्टीत संपूर्ण मानव जात विभागली गेली आहे. पण, या संपूर्ण मानव जतीला एकत्रित बांधून ठेवणारा घटक म्हणजे आपले ‘माणूसपण.’ भारताचंच उदाहरण घेतले तर इथे अनेक गोष्टींत विविधता आढळते. तरीही अगदी प्राचीन काळापासून या विविधतेला एकत्रित बांधणारी एकताही इथे आहे. जगाचा विचार केला तर ही विविधता आणखी भव्य वाटू लागते. पण, जगभर विखुरलेल्या या मानवी समूहालाही एक एकत्रित बांधणारी गोष्ट म्हणजे माणुसकी. अगदी आपण हजारो किमी दूर अंतरावर राहणारे, अपरिचित जीव असलो तरी आपल्या जगण्याचे ताणेबाणे कसे एकत्र गुंफलेले आहेत हे आपण याच वर्षी पहिले. एका देशात कोरोनाचा उदय झाला पण,   बघता बघता या छोट्याशा व्हायरसने संपूर्ण जग पादाक्रांत केले. एका देशाच्या अनुभवावरून दुसरे देश शहाणे होत गेले. संपूर्ण मानवजातीवर ओढवलेले हे संकट निवारण्यासाठी डब्ल्यूएचओ सारख्या जागतिक संघटनेनेही कंब...