Posts

आगामी कथेतून ....

'गेले कित्येक दिवस अस्वस्थ वाटतंय! कुणाशी बोलू नये! कुणाकडे जाऊ नये! अगदी आजूबाजूला ही कुणी असू नये! आवाजही....! अशा निरव शांततेत स्वतःच बसवावं समोर स्वतःला आणि विचारावा जाब. काय बिघडलंय बाई नेमकं तुझं? पण मिळालाच एकांत तरी तसं काही स्वतःशीच बोलण्याचं धाडस होत नाही आणि समजा बोललेच तर आपण स्वतःशी तरी खरं बोलू की नाही याचीही खात्री वाटत नाही. समजा आपण अगदी खरं खरं बोललो स्वतःशी तर ते आपण पचवू शकू का? आणि नाहीच पचवता आलं तर काय होईल?  हेही माहित नाही. अशी एक प्रचंड अज्ञानाची पोकळी वागवायचा कंटाळाही आलाय पण त्यापेक्षा ती पोकळी भरून काढण्याचा कंटाळा जास्त आहे. हे असं पोकळपण नकोसंही वाटतंय! मात्र ते झुगारून द्यावं, झटकून टाकावं असंही वाटत नाही. म्हणजे वाटतं आणि वाटत नाही या दोहोंच्या मधली संभ्रमावस्था कायम आहे. अशा अवस्थेत प्रत्येक जण असतोच. कितीही विद्वान, विचारवंत असला तरी. तर करायचं काय या पोकळपणाचं? कि काहीच न करता ठेऊन द्यावा तसाच! दुर्लक्ष केल्याने तो भरून निघणार का? कि आणखीन वाढतावाढता वाढे अशी अवस्था होईल? ह्म्म.....' (एक दीर्घ उसासा)       ...

जमेल का तूला?

Image
जमेल का तूला? हा बघ…. शब्द शब्द वेचून, बांधलेला, माझ्या स्वप्नांचा इमला…! ये ना असा आत, बावरू नको, बिचकू नको, बघ कसा सजवलाय, माणुसपणाच्या भग्न अवशेषांनी…! असा अधीर नको होऊ, बस…. माझ्या देहाच्या वळणदार, अनवट घाटांतून, हु़ंदडण्याआधी, माझ्या डोळ्यांतून, मनात उतर. बघ दिसतो का तिथे, धार्मिक वेदनांनी पेटलेला, सनातनी आक्रोश….!! माझं माणुसपण नाकारणाऱ्या, सत्शील नरपुंगवांनी, मांडलाय जोहार…. ज्यात जळतेय माझी, शुचिर्भूत योनी शतकानुशतके….! सतीत्वाचा घुंगट ओढुन, मी बळजबरीच वाहतेय, पावित्र्याचा अघोरी जोखड... शतकानुशतके…! फेकायचाय मला हा, शुद्धवंशीय जू…. माझ्या खांद्यावरून आणि जळत असलेली, माझी शुचिर्भूत योनी, वाट पाहतेय, निव्वळ ‘माणूस’ असलेल्या माणसाची जो फुलवेल, निव्वळ माणुसपाणाची हिरवळ, कुठल्याच भेदाभेदाचं निरोध न वापरता…! जमेल का तुला? फितुर होशील, तर, याद राख….. माझे शब्द आसुसलेत लपापत्या ज्वाळा बनून, व्यवस्थेचा जोहार मांडायला, तुझ्यासह….!!! © मेघश्री श्रेष्ठी

अंधाराचा वारसा

Image
नंद्या गेला. त्याला लागलेल्या या दारूच्या व्यसनान शेवटी त्याचाच घोट घेतला. अवघ्या तिशीतच तो गेला. त्याचे वडील ऑफिसर होते म्हणून स्मिताच्या वडिलांनी हे स्थळ पसंद केले. बाकी त्याच कर्तुत्व शून्य. तरुण बायकोसाठी आणि दोन लहान चीमुरड्यांसाठी अंधाराचा भयाण वारसा मात्र ठेवून गेला. अवघ्या पंचविसाव्या वर्षी आलेल वैधव्य आणि पदरात दोन लहान चिमुरडी. एक पाच वर्षांचा दुसरा तीन वर्षांचा.  नंद्याला दारूचा हा वारसा त्याच्या बापाकडूनच मिळाला. शिकून काय उपयोग? आमची मुल काही अभ्यासात  चांगली नाहीत कशाला शिकवायच्या नदाला लागायचं? म्हणून यांनी पोराला भाडयान चालवायला गाडी घेऊन दिली. पुढे कर्जाच्या डोंगरात ती गाडीही गडप झाली. पण शिकून काय करायचं?म्हणून शिकायचच नाही? यांना बाप तरी कस म्हणायचं? प्रत्येक गावात, वार्डात एक तरी दादा असतो जो अशा पिणार्यांची काळजी करतो. कारण त्याचा गुत्ता, दादागिरी आणि राजकारणाअडून चालणारे सगळे बरे वाईट धंदे चालू ठेवायचे असतील तर अशा अगतिक माणसांची गरज असतेच. अशा विवेक आणि विचार गमावलेल्या माणसांना हाताशी धरूनच ते आपल साम्राज्य टिकवू शकतात. पैसे देण्यापेक्षा दारू देऊन काम...

झाड (मुक्त ललित)

Image
काळ्या कसदार, आर्द जमिनीत एक कोंब उगवला.  🌱  त्यांना वाटल ती वेल आहे, त्यांनी आधाराला एक काठी उभी केली, कोंब सांगत राहिल, मी झाड आहे म्हणुन, पण त्यांनी ऐकल नाही. त्यांनी तिला वेलच बनवल. तिने कुठल्या दिशेला वाढायच हे तेच ठरवु लागले, जरा इकडेतिकडे सरकली की तिला छाटुन सरळ करु लागले. तिला ओढ होती स्वच्छ सुर्यप्रकाशाची, पण ते तिला प्रकाशाकड झेपावु द्यायचे नाहीत. आधारान कशीबशी ती वाढु लागली, वेल आता बहरु लागली. तिच्या बहरण्याचीही त्यांना धास्ती वाटु लागली. वेल आता पुर्ण वाढली, आता ती  फुलांनी बहरुन गेली. तिच्या मनात आणि भोवताली फुलपाखर रुंजी घालु लागली. मनातल्या मनात तिने पाखराशी हितगुज करण्याच स्वप्न पाहिल, स्वप्न पाहता पाहता तिचा डोळा लागला. डोळे उघडले, आणि पाहते तर काय? तिला तिच्या जमिनीतुन, त्या उबदार कुशीतुन उपटुन, दुसर्या बागेत रुजवलेल. तिथही तो काठीचा आधार आणि चहुबाजुंनी कुंपण. आता पाखरांना ती भेटु शकत नव्हती, ती थोडी हिरमुसली. त्या नव्या अनोळखी जमिनीत तिला हरवल्या सारख वाटु लागल. ती कोमेजली, इथेही प्रकाशापासुन तिला दुरच ठेवल. अचानक एक दिवस पाहते तर काय आता तिच्या ...

अक्षर मानव - संवाद सहवास ७ (मा. कुमार केतकर)

Image
अक्षर मानव - संवाद सहवास ७ (मा. कुमार केतकर) अक्षर मानवच्या प्रत्येक संवाद सहवासातून काही न काही अक्षर ज्ञान मिळतच. म्हणूनच या कार्यक्रमासाठी  आपणही जावं, अशी अक्षरशः आग लागतेच. त्यात अगदी घरच्यासारखच संयोजन, तशीच माणसं, जीव  लावणारी, म्हणून सोबत मुलांनाही घेतलं तरी काही वावगं किंवा गैरसोयीचं वाटत नाही. या सगळ्या अक्षर मानवांना भेटण्याची अतीव ओढही असतेच. आ. ह. साळुंखे   ते कुमार केतकर असे एकूण सात संवाद सहवास अक्षर मानवने आयोजित केले. कुमार केतकरांसोबतचा सातवा संवाद सहवास नुकताच सातार्याला पार पडला. केतकर सरांनी, ते पाकिस्तानात गेले असतानाच्या काही आठवणी सांगितल्या. त्यातला एक किस्सा ऐकून माझे  डोळे अक्षरशः पाणावले. ते पाकिस्तानच्या दौर्यावर गेले असताना, तिथल्या असेम्बलीतील काही खासदार  आमदारांना त्यांनी विचारलं की, "इथल्या सामान्य माणसांच भारताबद्दल काय मत आहे?" तर ते त्याच्या कडे पाहताच राहिले आणि त्यांनी अस  उत्तर दिलं की, "काही नाही! त्यांचं काय मत असणार भारताबद्दल? त्यांना एवढा विचार करायला कुठे वेळ आह...

स्पर्श

असा झुरळासारखा रेंगाळणारा, ओंगळवाणा स्पर्शाचा अनुभव देऊ नकोस. जमलच तर बघ, गालावर ओठ रुतवून, जमिनीवर टेकलेल्या पायांवर, शरिराला समभागात, दुभंगून, रुतणारा एक सरळ, छेद देता येतो का? जिथे तुझ्यामाझ्या समरुपतेला, आसमंतही निर्धोकपणे सामावून घेईल. © मेघश्री श्रेष्ठी. ‌

आक्रंदन

Image
हसतं खेळतं होतं एक छोटसं घर, छोट्याशा घरात होतं, एक इवलं इवलं पाखरू, आई-बाबाच लाडक कोकरु, रात्रीला बाबा खेळवायचा अंगणात आणि दाखवायचा आकाशातल्या, स्वातंत्र्याच्या चांदण्या. तो गायचा गाणं, मुक्तपणे… मनमुराद स्वच्छंद जगणे….. आणि अचानक…. अचानक आकाश काळवंडुन गेल, बाबाच्या काळजाला चिंतेन घेरलं. आकाशातल्या चांदण्या आता आग ओकु लागल्या, दिवसरात्र रक्ताच्या नद्या वाहु लागल्या. कोकरू भेदरल, आई हंबरली, बाप सुरक्षेचा रस्ता शोधु लागला…. कधी धर्माधांनी चोपलं, कधी सत्तांधानी. बापाच्या काळजाला सुरूंग लागला…. होतं नव्हतं सगळं विकुन, बाप निघाला, अख्ख बिर्हाड पाठीवर घेऊन, शांतीचा आणि स्वातंत्र्याचा देश शोधायला. हातातली सारी कवडी सोपवली त्यानं स्वातंत्र्याच्या दलालाकडं आणि बाप वाट पाहु लागला प्रयाणाची स्वातंत्र्याच्या आणि शांतीच्या देशात. दलालान सोपवला एक तराफा आणि इवल्या पाखराच्या हसर्या कुटुंबाला लोटलं, अजस्त्र लाटांच्या तुफान समुद्रात बापाच्या काळजाला पून्हा सुरूंग लागला. पंखाखाली पाखरं घेऊन, तारवटलेल्या डोळ्यांनी, सुर...