Posts

नात्याच्या बाबतीत चोखंदळपणा हवाच!

Image
काही लोक कुठलीही वस्तू घेताना, खरेदी करताना किती पारखत बसतात. त्यांना जशी हवी तशी वस्तू मिळाल्याशिवाय ते खरेदी तर करणार नाहीतच पण, ‘घे रे आता अॅडजस्ट करून,’ असे म्हटले तर ऐकणारही नाहीत. एकदम चोखंदळ. वस्तूच्या बाबतीत ठीक आहे पण काहीजण नात्याच्या बाबितीतही तितकेच चोखंदळ असतात. थोडसं जमवून घ्यावं नमतं घ्यावं आपल्या अपेक्षांना मुरड घालावी यातलं काही म्हणता काही त्यांना जमत नाही. त्यांच्या अटीवर ते ठाम असतात. इतका पण काय तो चोखंदळपणा किमान नात्याच्या बाबतीत तरी बरा नव्हे हं! असा सूर तुम्ही आजूबाजूला अनेकदा ऐकला असेल.   Image Source : Google “काय बाई किती पोरी बघितल्या तरी या सुदेशला एक पोरगी पसंत पडत नाही. कुठली अप्सरा आणणार आहे कुणास ठाऊक?”   “मुलीचं वय काय आणि यांच्या अपेक्षा काय, जरा तरी कुठे तडजोड नको का करायला? कायमची घरात बसली की मग कळेल.”   असे टोमणे आणि चर्चा तुमच्याही   कानावर पडत असतील. केवळ या टोमण्यांपासून तुमची सुटका व्हावी म्हणून जर तुम्ही घाई केलीत तर पुढे जाऊन तुम्हालाच पश्चाताप होणार आहे. नात्यांच्या बाबतीत चोखंदळपणा दाखवलेला अनेकांना आवडत नाह...

काळजी करून काय होणार?

Image
संध्याकाळच्या भाजीची तयारी करता करता, लता घड्याळाकडे पाहत होती, तिच्याही नकळत या दहा मिनिटात तिने दहा वेळा घड्याळाकडे पहिले होते. समोर तिच्या सासूबाई पेपर वाचत बसल्या होत्या. त्यांच्या बारीक नजरेतून हे सुटलं नाही. त्यांनी लताला विचारलंच, “काय गं लता कसल्या विचारात आहेस? कुठे जायचं आहे का तुला?” Photo by  Andrea Piacquadio  from  Pexels “काही तरीच, आता यावेळी मी कुठे जाणार?” थोड्याशा ताणलेल्या स्वरात लता उत्तरली. “मग काय सारखी घड्याळाकडे पाहतेस मघापासून?” “अहो, स्वरा आली नाही अजून म्हणून बघतेय किती वेळ झाला?” तोच ताणलेला स्वर.   येईल की सारखं असं घड्याळाकडे पाहून काय होणार? फोन करून बघ कुठे आहे? का उशीर झाला?” त्यांचं हे बोलणं सुरुच होत तेवढ्यात स्वरा आलीच.   आल्या आल्या आजीच्या गळ्यात पडली आणि तिथेच बसली.   लताकडे तिचं लक्षच नव्हतं. लता मात्र मघापासून तिला उशीर का झाला या काळजीने अस्वस्थ झाली होती. इतकी अस्वस्थ झाली होती की तिची चलबिचल तिच्या शेजारी बसलेल्या सासूलाही जाणवली.   खरं तर मुलीला पाच-दहा मिनिटं उशीर झाला तर काही वाटत ...

झोपेचं खोबरं होतंय?

Image
कोरोनामुळे गेले वर्ष दीड-वर्षं आपण सगळेच आरोग्याबाबत कधी नव्हे तेवढे सतर्क झालो आहोत. चांगली रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्तीला शक्यतो कोरोनाचा फार काही त्रास होत नाही, हे माहीत झाल्याने लोक खरोखर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकडे काळजीने आणि जागरूकतेने लक्ष देत आहेत. आरोग्याबाबत आलेली ही सतर्कता तशी चांगलीच म्हटली पाहिजे. त्याचवेळी वर्क फ्रॉम होममुळे विस्कळलेले शेड्युल, अनेकांना घरात कोंडून राहण्याचा आलेला मानसिक ताण, विस्कटलेली आर्थिक घडी, कोरोनामुळे सततची आरोग्याची चिंता, आपल्या जवळच्या लोकांची आरोग्याची, सुरक्षेची, सुरक्षित भविष्याची चिंता, काहींच्या वाट्याला आलेले एकाकीपण या कोरोनामुळे आणखी गडद झाले आहे. त्यात सतत अपडेट राहण्याचा आणि माहितीचा भडिमार झेलण्याचा एक वेगळाच ताण. काहींनी कोरोनाच्या लाटेत आपले आप्तस्वकीय, कुटुंबीय गमावले आहेत. थोडक्यात काय तर कोरोनाच्या आधीही आपल्या आयुष्यात प्रश्न, समस्या होत्याच पण कोरोनाने त्या आणखी तीव्र केल्या आहेत.   Image Souce : Google image या सगळ्या चिंता कुणासमोर बोलून दाखवणार? कारण घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाण...

संवादाचा पूल की संशयाची झूल? नाते कशावर टिकेल?

Image
माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत जगत असतो. प्रत्येक नात्याची भूमिका वेगळी असली तरी, त्याचा पाया मात्र एकच असतो, तो म्हणजे विश्वास. फक्त नवरा-बायको किंवा प्रियकर प्रेयसी यांच्यातच नाही तरी आई-मुलगी-मुलगा-वडील, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी, अशा सगळ्याच नात्यात विश्वासाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. विश्वासाचा हा पायाच डळमळला तर, नात्याला तडे जायला सुरुवात होते. माणूस कोणत्या एकाच नात्यावर जगतो असं नाही तर त्याला नात्यांचं सुरक्षित पर्यावरण हवं असतं. या पर्यावरणातील एका जरी नात्याला धक्का लागला तरी त्याचा इतर सगळ्याच नात्यांवर परिणाम होतो.   Image source : Google Image मनात एकदा का संशयाचं मूळ रुजू लागलं की याने तुमची मानसिकता तर बिघडतेच पण तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींचीही मानसिकता बिघडून जाते. ज्याच्यावर संशय घेतला जातोय त्या व्यक्तीवर तर हा थेट भावनिक हल्लाच असतो. हा हल्ला कसा परतवून लावायचा याचं जर योग्य ज्ञान त्या व्यक्तीजवळ नसेल तर, ती व्यक्ती भावनिकतेच्या लाटेत वाहवून जाण्याचीच शक्यता जास्त. अशा वाहवत जाण्याला न कळत आपल्याकडूनच हातभार लावला जातो.   पहिल्...

अडचणी तर येणारच म्हणून जगणं सोडून द्यायचं का?

Image
प्रत्येकाच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय असते स्वप्न असते. काहीजण शेवटपर्यंत या स्वप्नांचा पाठलाग करतात तर काहीजण मध्येच थकून जातात. ज्यांना शेवटपर्यंत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे जमले ते इतिहास घडवतात आणि ज्यांनी आपली स्वप्ने अर्ध्यातच सोडली ते फक्त नोंद बनून राहतात.   Image source : Google आयुष्याच्या प्रवासात अडचणी आणि अडथळे तर प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. जे लोक अडचणींचा बाऊ करतात ते अडचणीतच गुरफटून जातात. ज्यांना अडचणींचा बाऊ न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतात त्यांच्या पुढील अडचणी पालापाचोळ्या प्रमाणे उडून जातात.   श्रद्धाला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिच्या हालचाली तिच्या लकबी एका जन्मजात नर्तकीला शोभतील अशाच होत्या. तिने नृत्य शिकण्याची इच्छा आपल्या आई-बाबांजवळ बोलून दाखवली. पण, घरंदाज कुटुंबातील मुली असलं काही शिकत नसतात अशी सबब देऊन बाबांनी तिची मागणी उडवून लावली. बाबांची नाराजी पाहून श्रद्धाने नृत्य हा विषयच आपल्या प्राधान्यक्रमातून उडवून लावला. ती जाणूनबुजून आपले लक्ष इतर गोष्टीत रमवू लागली. तरीही तिला कोणत्याच गोष्टीत मन रमत नव्हते. कुठल...

काही लोकांना तुमच्यापेक्षा जास्त तुमच्याशी भांडण्यातच इंटरेस्ट असतो!

Image
भांडणं होण ही तशी सामान्य बाब. तसही भांडणाने प्रेम वाढतं असं म्हणतात. प्रेमातील चव जपणारी, लटकी, लुटुपुटूची भांडणं होण्यात काही वाईटही नाही म्हणा! पण जर कुणी मुद्दामच तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करत असेल. सतत तुमचा अपमान करत असेल, तुमच्याशी वादावादी करुन समाधान मिळवत असेल तर? काही लोकांना भांडण करण्याची हौसच असते आणि ते फक्त आपल्या जाळ्यात कोणी बकरा अडकतो का या संधीच्या शोधात असतात. आता अशा लोकांच्या जाळ्यात अडकून बकरा व्हायचं की भुर्रकन उडणारं कबुतर व्हायचं हे तुम्हीच ठरवा.   Image source : Google image मुद्दाम भांडणं उकरून काढणारी लोक असतात तरी कोण? या लोकांचे चार प्रकार पडतात. पहिले म्हणजे ज्यांना तुमच्यावर नाहक इर्षा वाटत असते असे. दुसरे म्हणजे ज्यांना स्वतःबद्दल अजिबात आत्मविश्वास नसतो, सतत भीती आणि तणावाखाली असतात असे. तिसरे ज्यांना आपण कुणाला तरी आपल्या बोलण्यातून दुखावत आहोत हे त्यांच्या गावीही नसणारे. आपल्या बोलण्याचा वागण्याचा समोरच्यावर काय परिणाम होईल याची जराही फिकीर नसणारे निष्काळजी आणि फटकळ लोक आणि चौथे तुमच्यावर प्रेम करणारे.   समोरचा माणूस या चारपैकी क...

स्वतःवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे हे गुण तुम्हाला माहीत आहेत का?

Image
स्वत:वर प्रेम करणं, स्वतःचं एकूण घेणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःला हवं-नको ते पाहणं म्हणजे स्वार्थीपणा नव्हे. स्वत:वर प्रेम करणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे. Image source : Google तुमच्याकडे कुणी साखर मागायला आले आणि तुमच्या घरी साखरच नसेल तर काय कराल? मागणाऱ्याला रिकाम्या हातानेच परत जावे लागणार. बरोबर ना? तसच काहीसं प्रेमाचंही आहे, जर तुम्ही स्वतःवरच प्रेम करत नसाल तर तुम्ही दुसऱ्याला कुठून प्रेम देणार? आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार अशी म्हण आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवली आहे ती का उगीच? तुम्ही तहानलेले असताना एखाद्या कोरड्या विहिरीतून पाणी काढण्याचा प्रयत्न केलात तर काय हाताशी लागेल? मरणच!   Image source : Google म्हणून इतरांकडून प्रेमाची अपेक्षा करण्यापूर्वी किंवा इतरांवर प्रेम करण्यापूर्वी आपलं स्वतःचं स्वतःवर प्रेम असणं गरजेच आहे. या प्रेमात कोणकोणत्या गोष्टी येतात ते पाहूया.   १.   अनेकांना असं वाटतं की स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःतील उणीवांकडे दुर्लक्ष करणे, मेहनत करण्यापासून रोखणे. स्वतःचे फाजील लाड पुरवणे म्हणजे प्रेम नव्हे. उलट या प्रेमात पहिली पाय...