Posts

तुमच्या तणावाचा ताण तुमच्या खिशाला तरी सोसावा लागत नाही ना? एकदा तपासून बघाच.

Image
इतर कुठल्याही भावनेपेक्षा तणावाची भावना खूपच जास्त प्रभावी आणि दमनकारी असते. कुठल्याही एका गोष्टीचा जरी आपल्या मनावर तणाव राहीला असेल तर, त्याचा प्रभाव आपल्या इतर कामांवरही दिसून येतो. तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न कराल त्यात हा तणाव अडकाठी आणल्याशिवाय राहणार नाही. कालपर्यंत ज्या गोष्टी आपण अगदी सहजतेने करू शकत होतो त्याच गोष्टी करताना आज मात्र अचानकच अवघड आणि कठिण वाटू लागतात. तणाव तुमची आर्थिक घडीही विस्कटू शकतो. तणाव आणि पैसा यांचा तर खूप जवळचा संबंध आहे. अनेकांसाठी अपुरा पैसा हाच तणावाचे मोठे कारण असतो. Image source : Google सगळी नाटकं करता येतात, पण पैशाचे नाटक करता येत नाही असे म्हटले जाते. म्हणूनच आपल्या भावनांचा आपल्या खिशावर परिणाम होतो का हेही एकदा तपासून पाहूयात. तणाव निवळावा म्हणून आपण अधिक खातो. म्हणजे नकळतपणे आपल्याकडून अधिक खाल्लं जातं, हे जसं आपल्या लक्षात येत नाही तसच तणावामुळे आपण आपल्या खिशातील पैसे वाया घालवतोय हेही कळत नाही. आज मूड ऑफ आहे, मग काय करावं बरं...? “पिज्झा वगैरे मागवूया,” किंवा “आज जरा कॉफीसाठी बाहेर जाऊया.” “आज एक खंबा होऊनच जाऊदे, खूप दिवस झ...

संपण्याआधी सावरणे यालाच तर म्हणतात!

Image
स्मिता आज थोडी उशिरा घरी आली. जाताना आपल्याला वेळ होईल किंवा नाही असं काहीच सांगून गेली नव्हती. आल्यावर पण तिने स्वतःपुरता चहा बनवला, प्यायली आणि आपल्या खोलीत निघून गेली. आपण उशिरा आलोय, घरी कुणाला तरी काळजी वाटली असेल, आपण उशिरा आल्याबद्दल काही तरी बोललं पाहिजे यातील काहीच तिच्या गावी नव्हतं. उलट काहीच न झाल्यासारखं आपल्याच नादात होती. कॉलेजहून उशिरा येण्याची तशी ही तिची पहिलीच वेळ होती म्हणा. तरीही आल्या आल्या असं आपल्याच नादात कशी काय गुंग होऊ शकते ही पोरगी? या विचाराने मालतीताईंच्या मनात मात्र थोडी चलबिचल झालीच. Source : Google Image राघव दादा म्हणाले झालं असेल काही तरी थांबली असेल थोडी मैत्रिणीसोबत अर्धा-एक तास उशीर झाला तरी काय बिघडतं? एवढ्याने काय आकाश कोसळलं का लगेच? असं म्हणत त्यांनी मालतीताईंची समजूत घातली. दुसऱ्या दिवशी स्मिता उठली, आपली सगळी कामं आवरली आणि आई जाते गं म्हणत निघून सुद्धा गेली. मालतीताईंना तिच्याशी बोलायचं होतं पण, ती थांबलीच नाही. आज मात्र स्मिता वेळेवर घरी आली. तसही दिवसभर घरातील कामांच्या घाईत त्यांच्या मनातील काळाचा विचार मागे पडला होता. तिच्याशी आपल्य...

कृतज्ञता तुमच्यातील आशावाद जिवंत ठेवते!

Image
Source : Google Image आपली काही स्वप्न असतात. काही छोटी, काही मोठी. सगळीच स्वप्न एकदम पूर्ण होत नसतात. ज्याची त्याची वेळ आली की ती गोष्ट निश्चितच मिळते. जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला मिळणारच हा विश्वास आपल्या मनात घट्ट रुजवावा लागतो.   आत्ता या क्षणी थोडसं तुमच्या आयुष्यावर एक नजर टाका. तुमच्याकडे आता अशा कितीतरी वस्तू असतील ज्या पूर्वी तुमच्याकडे नव्हत्या. उदा. आता ज्या फोनवर तुम्ही ही पोस्ट वाचत आहात तो फोन. काही दिवसांपूर्वी किंवा काही आठवड्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी हा फोन तुमच्याकडे नव्हता. पण तो आत्ता तुमच्याकडे आहे.   Source : Google Image अशाच कितीतरी वस्तू असतील गोष्टी असतील ज्या पूर्वी तुमच्याकडे नव्हत्या पण आत्ता आहेत. तुमची नोकरी, तुमची गाडी, तुमचे घर (भाड्याचे असले तरी), तुमची पत्नी/पती, तुमची मुले, तुमच्या नव्या मित्र/मैत्रिणी, अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला नव्याने मिळाल्या आहेत. यात वस्तू असेल, काम असेल किंवा नाती असतील, या सगळ्यांची कधी तरी तुम्ही इच्छा धरली होती आणि या सगळ्या इच्छा आज तुमच्या आयुष्यातील वास्तव आहेत. या सगळ्यांवर एक नजर टाकल्यानं...

स्वतःची पाठ थोपटताय ना?

Image
आपण करतोय ते योग्य की अयोग्य, बरोबर की चूक, अशा द्विधा अवस्थेत आपण कधी ना कधी अडकतोच आणि मग ही द्विधा अवस्था कधीकधी आपल्याला अगदीच हतबल करून टाकते. अशावेळी आपल्यावरील विश्वास डळमळू न देता आपण एकच करू शकतो. स्वतःला स्वतःची खात्री पटवून देणे आणि स्वतःच स्वतःच्या मनाला उभारी देणे.   Source : Google Image जीव तोडून प्रयत्न करतोय मग तरीही आपल्या वाट्याला निराशा का येते? नक्कीच आपलं काही तरी चुकतंय असं वाटणं स्वाभाविक आहे. याचा अर्थ खरच आपलं चुकतय असा होत नाही तर आपण प्रयत्न करत असलो तरी काही गोष्टींसाठी काळवेळेचं गणितही जमून यायला हवं. मिळणारी गोष्ट योग्य वेळी बरोबर मिळते. त्यासाठी जसा प्रयत्न आणि सातत्य गरजेचे आहे तसेच संयमही गरजेचा आहे. उतावीळ होऊन स्वतःला दोष देत बसाल तर आजपर्यंत केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल. म्हणून जेव्हा केव्हा मनाची द्विधा अवस्था होईल तेव्हा एकच काम करा. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे, हे स्वतःला सांगा वारंवार सांगा. मला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्यास उशीर होत असला तरी किंवा ताबडतोब मिळत नसल्या तरी एकदिवस मला हे सगळं मिळणारच आहे कारण, ते माझंच आहे. यापूर्वीही ...

स्वप्नात दाटले प्राण!

Image
Image Source : Google जीवन आणि मनन हे दोघे भाऊ खूप हुशार होते. जीवनला चित्रकलेत रस होता. त्याला नेहमी मोठा झाल्यावर एका मोठ्याशा सभागृगात आपल्या चित्रांचे प्रदर्शन लागले असल्याचे स्वप्न पडायचे. चित्रकलेत तो इतका डुंबून गेलेला असायचा की, त्याला इतर कोणत्या गोष्टींचे भानच नसायचे. मग आपला अभ्यास मागे राहतो. शाळेत आपल्याला शिक्षक ओरडतात. घरात आई-बाबांची बोलणी खावी लागतात, हेही त्याच्या गावी नसे. हातात कागद आणि पेन्सिल यायचा अवकाश की जीवनचे अख्खे जगच बदलून जाई. या जगात कोण असे तर फक्त कागद, पेन्सिल, रेषा आणि जीवन. या जगात हरवल्यानंतर त्याला ना शाळा आठवे, ना शाळेतील अभ्यास, ना शिक्षकांची आणि आई-बाबांचा ओरडा.   मनन अभ्यासात हुशार होता. त्याला खेळाची आवड होती. मात्र शाळेतून घरी आल्या आल्या तो कधीच दप्तर टाकून खेळायला बाहेर पडत नसे. तो आधी आपला अभ्यास पूर्ण करी आणि मग वेळ मिळाला तरच मित्रांच्यात खेळायला जाई. त्याचा अभ्यास वेळेत पूर्ण होत असे त्यामुळे शिक्षक त्याचे कौतुक करत. आई-बाबा त्याला प्रेमाने वागवत. कुणी नातेवाईक घरी आले की, आई तर त्याचे कौतुक सांगता सांगता थकत नसत.   Source : Go...

आयुष्यावर बिनशर्त प्रेम करता यायला हवं!

Image
Image source : Google “ती बघा नेहमी कशी अगदी टापटीप असते, काय झालं मग घरात बसून दुसरं काही काम आहे का?”   “आत्ता कुठे डिग्री झाली इतक्यात जॉब पण लागला? काय एकेकाचं नशीब नाही!”   “बरं आहे बाई तुझं एकटा जीव सदाशिव कुणी विचारणार नाही की टोकणारं नाही.”   “काय हो नशीब बिचारीचं, आत्ता कुठे जरा चांगले दिवस आले होते तोवर कर्ताधर्ता मुलगा गेला.”   आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यावर आपण सहजपणे अशा टिप्पण्या करत असतो. सगळ्याचंच आयुष्य सारखं नसतं. आपल्याला समोरच्याची एक बाजू दिसते जी आपल्या दृष्टीने चांगली किंवा वाईट असते. पण दुसरी बाजू दिसत नाही जी अजून चांगली किंवा वाईट किंवा आणखी काही तरी असू शकते.   जेव्हा जेव्हा इतरांच्या विषयी तुलना करण्याची इच्छा निर्माण होईल तेव्हा तेव्हा स्वतःला हे समजावून सांगितलं पाहिजे की, कदाचित यापेक्षाही त्यांच्या आयुष्यात काहीतरी निराळं सुरू असेल जे आपल्याला दिसणार नाही. आपल्याला कळणार नाही किंवा आपण त्याची कल्पनाही करू शकणार नाही.  तो त्याच्या ठिकाणी योग्य आणि आपण आपल्या ठिकाणी. सफरचंदाने संत्र्याशी स्पर्धा करण्यात काय...

कामातील आनंद कसा शोधाल?

Image
Image source : Google रोज रोज तेच ते काम करण्याचा कंटाळा प्रत्येकालाच येत असतो. पण, भरपूर कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, अशी एक समजूत काही लोकांच्या मनात ठाण मांडून बसलेली असते. म्हणून काही जण कामाचा गाडा ओढत राहतात.  निव्वळ कष्ट उपसण्यासाठी म्हणून आणि ओढूनताणून केलेल्या कामात कसलाच आनंद मिळत नाही. मग हे काम ऑफिसमधील असो किंवा घरातील. छोट्यातील छोटे काम पहिले तरी काही जणांना घाम फुटतो. अशा लोकांवर बहुतेकवेळा आळशीपानाचा शिक्का बसण्याचीही शक्यता असते. पण यामागचे खरे कारण आळस नसून काम करण्याची चुकीची पद्धत किंवा नावड हेही असू शकते.   रोज रोज कामाची एकच निरस पद्धत व्यक्तीला आतून रुक्ष बनवते म्हणून काम करताना आनंद वाटेल अशा काही पद्धती आपण शोधून काढल्या पाहिजेत. जेणेकरुन हातातील कामाचा कंटाळा येणार नाही. आपलं दररोजचं रुटीन ठरलेलं असतं. कधी तरी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा या दैनंदिन कामात थोडाफार फेरफार केल्यास त्यातला कांटाळवाणेपणा कमी होईल. कामाचा आनंद वाटेल. जे काम करताना आपल्याला आनंद होतो त्या कामात आपली कार्यक्षमता वाढते. त्यातील बारकावे आपल्याला अधिक खोलवर समजू लागतात आणि...