Posts

Showing posts from September, 2020

बौद्ध धर्मातील स्त्री विचार- लता दिलीप छत्रे

Image
    स्त्री देखील माणूस असते आणि तिलाही मानवीभावभावना असतात, त्या व्यक्त कारणाचा, स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार स्त्रीला आहे. आज भारतीय स्त्री स्वतंत्र असली तरी तिच्या मानेवरील परंपरा आणि कर्तव्य यांचा पारंपारिक जू तर आहेच सोबत स्वतःला सिध्द करण्याच नवं आव्हान देखील. यात तिची कुतरओढ होत आहे. भारतीय संस्कृतीत पाश्चात्य देशातील स्त्रीवादाच्या संकल्पना लागू होणार नाहीत. कारण इथली सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी आहे. तेंव्हा भारतीय स्त्रीला आपल्या परंपरेत राहूनच स्वतःच्या मुक्तीच्या वाट शोधता येतात का, हा विचार अग्रस्थानी ठेवून लेखिका लता छत्रे यांनी हे पुस्तक लिहीलं आहे. या पुस्तकातून आपल्या सांस्कृतिक चौकटीत राहून आपल्या मुक्तीच्या वाटा शोधता येतात का याचा धांडोळा तर घेतला आहेच परंतु ही वाट किती उदात्त होती याचीही प्रचीती या पुस्तकातून येते. आपला हा दृष्टीकोन मांडताना लेखिका लिहितात, सर्वसाधारणपणे असे दिसते की, भारतीय संस्कृतीमधील स्त्री कितीही अन्याय झाला तरी आपली सामाजिक, सांस्कृतिक तसेच कौटुंबिक चौकट मोडून किंवा या चौकटी बाहेर पडण्याचा विचार करत नाही. मग भारतीय...

आई होताना -१

Image
  समोर क्षितिजा पर्यंत पसरलेला अथांग समुद्र! काठावरच्या त्या छोट्याशा मंदिराच्या पायरीवर बसून मी एकटक त्या समुद्राकडे बघतीये. किती अथांग आहे हा? जिथं पर्यंत नजर पोहोचतेय तिथं पर्यंत फक्त हाच आहे. असे वाटतेय पलीकडच्या किनाऱ्यावरील सूर्य याला अधाशासारखा पिऊन टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि हा त्याला गिळण्याचा! सूर्य याला पिऊ शकत नाही आणि हा सूर्याला गिळू शकत नाही तरीही समोरच्या पटलावरील चित्र बघून माझ्या मनात तरी हीच कल्पना उठली. हळूहळू सूर्य समुद्रात बुडू लागला. या शेवटच्या क्षणीही तो त्याच्या किरणांनी समुद्राच्या लाटांवर नक्षी काढत होता. मजेदार रंग उधळीत होता. तो समुद्रावर त्याच्या उबदार प्रेमाची पखरण करत होता. समुद्र मात्र वेड्यासारखा फक्त किनाऱ्याकडे बेभान होऊन उसळत होता. जणू किनाऱ्यावर त्याची कोणीतरी वाट पाहत असावं. किंवा जणू तो माझ्याकडेच येत असावा. जणू तो मला आत बोलवत असावा. समोर हा दूरदूर पर्यंत पसरलेला समुद्र पाहून माझ्या मनातील कल्पनेचा वारूही त्याच्यासारखाच उधाणला होता. या असीम समुद्रात मिसळून जावं आणि स्वतःही त्याच्यासारखच अथांग व्हावं. जमेल का असं अथांग होणं? पण, मला जमलं तर...

भारतातल्या या सात गावात आजही संस्कृत भाषा बोलली जाते!

Image
  संस्कृत म्हणजे देवभाषा असे मानले जाते. ही भाषा फक्त देवांची असल्याने एका विशिष्ट वर्गापुर्तीच मर्यादित होती. आज जवळपास ही भाषा मृतप्राय झाल्यात जमा आहे. कारण, संस्कृत देववाणी म्हणून सीमित राहिल्याने ती लोकांची भाषा बनू शकली नाही. आज शाळेत संस्कृत शिकवण्याचे प्रमाणही कमी आहे. काही विद्यार्थी संस्कृत हा विषय फक्त स्कोरिंग वाढवणारा विषय म्हणून निवडतात. बाकी सामान्य लोकांचा आणि या भाषेचा संपर्क कधीच तुटला आहे. देववाणी असल्याने काही श्लोक, मंत्र यांच्या रुपात ही भाषा आजही जिवंत आहे. पण, या श्लोकांचा किंवा मंत्रांचा अर्थ सामान्य लोकांना अजिबात समजत नाही. केवळ पिढ्यानपिढ्या घरात श्लोक म्हंटले जात आहेत म्हणूनही त्याचा रट्टा मारणारे अनेकजण आहेत. ही भाषा देवनागरी लिपीत म्हणजे (देवाच्या नगरीत वापरली जाणारी लिपी) लिहिली जाते. असे असले तरी भारतात संस्कृत थोड्याफार प्रमाणात आजही जिवंत आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतात काही गावे अशी आहेत जिथे घराघरात संस्कृत भाषा बोलली जाते. या गावातील वृद्ध व्यक्तीपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण संस्कृत बोलतात. अगदी मंदिर आणि शाळेपासून ते पान ट...

सुशांत प्रकरणातून मी तरी हाच धडा घेतला!

Image
  गेले दोन-अडीच महिने झाले, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युच्या बातमीने आपल्या सर्वांना हैराण करून सोडले आहे. सुरुवातीला एका गुणी कलाकाराच्या अशा अचानक जाण्यानं सर्वांनाच हळहळ वाटली. नंतर मिडिया आणि राजकारण्यांनी या प्रकरणाला जे वळण दिले आहे ते पाहून प्रचंड चीड येत आहे. एखाद्याच्या मृत्युनंतर त्याच्या सगळ्या वैयक्तिक तपशिलांचा असा बाजार मांडणे घृणास्पद वाटते आहे. परंतु ही गोष्ट एक खूप महत्वाचा धडा शिकवून जाते. नैराश्याचे, उदास वाटण्याचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. अशावेळी कुणाच्या मनात आत्महत्येचा विचार येत नाही? काही क्षण असतात असे की संपवून टाकावं हे सगळं असं वाटतं. आपण संपलो की आपल्यासोबत सगळच संपेल! असा एक भाबडा विचारही यामागे असतो. पण, खरंच आपल्यासोबत सगळंच संपतं का? अजिबात नाही. ज्या पद्धतीने या प्रकरणात प्रत्येकजण काठी घालून काहीतरी हाती लागतं याचा अंदाज घेत आहे, ते पाहिल्यावर निश्चितच वाटतं की आपल्या मागे सगळं संपत नाही. उलट काही जणांना आयतं कोलीत मिळू शकतं, त्यांची त्यांची भाकरी भाजून घ्यायला. आपल्या सोबत सगळं संपेल आणि मागे राहिलेल्यांना काहीच दुःख उरणार नाही. का...

कोण बघल?

Image
  पंधराव्या वर्षी लग्न झालेल्या कविताला फक्त येणा-जाणाऱ्या गाड्यांचा बोर्ड तेवढा वाचता येत होता. पंधराव्या वर्षापर्यंतही अगदी रोजच्या रोज शाळेत जाऊन शिकता  येईल अशी सोय नव्हतीच. घरी चार बहिणी, दोन भाऊ. एवढ्या मोठ्या संसारात प्रत्येकालाच काही ना काही वाटा उचलणं भाग होतं. कवितावर ही घरच्या शेळ्या आणि म्हशींची जबाबदारी होती त्यामुळं शिक्षणाचा श्री गणेशा होऊन तो तेवढ्या वरच थांबला होता. पोरीच्या जबाबदारीतून मोकळं होण्यासाठी आई-वडिलांनी लवकरात लवकर लग्न लावून दिलं. पण, नवरा दारुडा. दोघांचे सतत खटके उडत राहिले. कविता पण काही बसून खाणाऱ्यातली नव्हती. ती पण लोकांच्या शेतात जाऊन भांगलन करायची. दोघांच्या संसाराच सूर जरा कुठ जुळला की नवऱ्याच्या घरचे लगेच त्यात काही ना काही बिब्बा घालायचेच. शेवटी कविता कंटाळून माहेरी आली. नवऱ्याने लाख रुसवा काढायचा प्रयत्न केला पण ती ऐकत नव्हती. सासरच्या लोकांचा जाचच एवढा होता की स्वतः कमवून आणलेलं शांत बसून खाताही येत नव्हतं. ती म्हणे, “आपण माझ्या माह्यारात राहू, तू पन मिळेल ते काम धंदा कर आन मी पण करती.” पण, ते नवऱ्याला काही पटत नव्हतं. सासुरवाडीत राह...