Posts

Showing posts from November, 2022

सॅनीटरी पॅडमुळे कॅन्सरचा धोका? काय आहे तज्ज्ञांचे मत जाणून घ्या.

Image
पोटात हलक्या कळा येऊ लागतात, कंबर अवघडून जाते, खाली ओलसरपणा जाणवायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की पिरीयड आलेत. त्यानंतर पहिली आठवण होते ती, सॅनीटरी पॅडची. दर महिन्याच्या त्या दिवसात आवरून लागणारी गोष्ट म्हणजे सॅनीटरी पॅड. पण हे सॅनीटरी पॅड आपल्या आरोग्यासाठी कितपत चांगले किंवा वाईट ठरू शकतात याचा कधी विचार केलाय का? सॅनीटरी पॅड ही आजच्या काळात एक मुलभूत गरज बनली आहे हे खरं आहे पण हीच पुढे जाऊन त्रासदायक ठरणार असेल तर? Toxic Links नावाच्या एका पर्यावरणासंबंधी काम करणाऱ्या NGO ने केलेल्या अभ्यासानुसार भारतातील जे top sanitary pads brand आहेत त्यांच्या वापरातून पर्यावरणाला तर हानी पोहोचतेच पण, स्त्रियांच्या आरोग्यावरही याचे विपरीत परिणाम होत आहेत. यात अभ्यासामध्ये त्यांनी whisper, Stayfree, sofy, या inorganic brands चा तर Peesafe, Nua, आणि Plush या organic brands चा अभ्यास केलेला आहे. जास्तीत जास्त रक्त शोषून घेणे आणि फ्रेशनेस देण्याच्या उद्देशाने म्हणून या ब्रँड्सनी ज्या रसायनांचा वापर केलेला असतो तो आरोग्याला घातक आहे असं या अहवाल सादर करणाऱ्या डॉ. आकांक्षा मेहरोत्रा याचं म्...

दुपारची पेंग टाळण्यासाठी या ट्रिक वापरून पहिल्यात का?

Image
सकाळी उठून आवरल्यानंतर आपण ऑफिससाठी बाहेर पडतो. सकाळी सकाळी दिवसाची चांगली सुरुवात झालेली असते. आज ऑफिसमधील कामं अजिबात रेंगाळत ठेवायची नाहीत... असा निश्चय केलेला असतो. लंचब्रेक होईपर्यंत हा उत्साह आणि निश्चय अगदी नेटाने रेटत नेलेला असतो. दुपारी लंचब्रेक झाला आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली की या उत्साहाच्या फुग्यातली हवा हळूहळू कमी व्हायला लागते. डोळे अपोआप जड होऊ लागतात. इतके जड होतात कधी मिटतात हे आपल्यालाच कळत नाही. दुपारची ही पेंग कितीही नकोशी असली तरी, ती आपला पिच्छा पुरावाल्याशिवाय राहत नाही. काम करण्याचा उत्साह अगदी मावळून गेलेला असतो आणि एक छानशी डुलकी काढण्याचा मोह अनावर होतो. पण ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी अशी डुलकी घेण्याची परवानगी नसते त्यामुळे अगदी नाईलाजाने आपण स्वतःला जुंपून घेतो. एखाद दिवस असं झालं तर ठीक पण, जर हेच रुटीन राहिलं तर याचा तुमच्या परफॉर्मन्सवर आणि एकूणच आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. दुपारचीही झोप टाळण्यासाठी काय करता येईल याचा कधी विचार केलाय का? नसेल तर इथे दिलेल्या काही टिप्स फॉलो करता येतात का पहा... याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. दिवसा आनाहुत...

नकारात्मक विचार पळवून लावण्यासाठी तुम्ही कधी हे मार्ग अवलंबले आहेत का?

Image
“मी आज नवीन काही तरी शिकलं पाहिजे.” “नाही तर नकोच, काही नाही जमलं तर उगाच वेळ वाया जाणार, वर उरलेली कामं होतील तीही नाही होणार.” वरील प्रकारचा संवाद हा आपलाच आपल्याशी होणारा संवाद आहे. दिवसातून आपण कित्येक गोष्टीवर असा स्वसंवाद साधत असतो. यातील काही भाग सकारात्मक तर फार मोठा भाग हा नकारात्मक स्वरूपाचा असतो. बारकाईने पाहिलं तर इतर कुणाहीपेक्षा आपला हा स्वसंवादच आपल्यासाठी प्रेरणादायी किंवा आपल्याला खचवणारा असतो. विज्ञानाच्या मते एका दिवसात माणसाच्या डोक्यात ७० हजारहून जास्त विचार जन्म घेतात. यातील सकारात्मक किती नकारात्मक किती हे आपण मोजू नाही शकाणार पण, यात नकारात्मक विचारांचा वाटा नक्कीच जास्त असतो. खरं तर कुणालाच आपण नकारात्मक विचार करावेत असं वाटत नाही किंवा कुणीही ठरवून नकारात्मक विचार करत नाही. याउलट सकारात्मक विचार ठेवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक आपल्या विचारांवर काम करावे लागते. आजच्या या लेखात आपण हेच पाहणार आहोत. किमान, नकारात्मक विचार ओळखून ते बाजूला कसे करायचे यावर जरी आपण विचार केला तरी पुष्कळ होईल.   २४ तास सकारात्मक राहणं कुणालाही शक्य नाहीच, तरीही किमान नका...

तुम्हालाही संताप अनावर होतो? तो आवरण्यासाठी काय कराल?

Image
तुम्हालाही संताप (chronic anger) अनावर होतो? तो आवरण्यासाठी काय कराल?  भावना प्रत्येकाला असतात. अगदी प्राण्यांनाही. प्रत्येक माणूस भावनिक असतो. भावनांच्या एकत्रीकरणातूनच माणसाचं व्यक्तीमत्व तयार होत असतं. आपण अनेकदा माणसाचं वर्णन त्याच्यातील प्रबळ भावनेवरूनच करतो, तो रागीट आहे, ती प्रेमळ आहे, तो हसरा आहे, ती बोलकी आहे, वगैरे... पण अनेकदा भावनांचा तोल सांभाळता आला नाही की, याच भावना विकृतीच्या रुपात आपल्यात घर करून राहतात. ही वकृती कधी आपला ताबा घेते ते लक्षातही येत नाही. भावना प्रत्येकाला व्यक्त करता येत नाहीत. एखादी गोष्ट मनात दीर्घकाळ सलत राहिली की, तिचे रुपांतर रागात होते. काही लोकांना राग पटकन येतो,   कारण ही एकमेव अशी भावना आहे जी दबली जात नाही किंवा इतर दबलेल्या भावना याच रुपात उफाळून येतात.   काही व्यक्तींच्या मनात अशा दबलेल्या भावनांनी इतके घर केलेले असते की, त्या व्यक्ति सतत चिडचिड करत राहतात. त्यांच्या मनात संताप धुमसत राहतो. हा संताप कधी एखाद्या प्रसंगाबाबत असतो तर, कधी एखाद्या व्यक्तीबाबत. राग किंवा संताप ही एक नकारात्मक भावना आहे. या भावनेचा त्रास जित...