Posts

Showing posts from May, 2021

कोरा कागज -

Image
पोरांना जेवायला घालून त्यांना जबरदस्ती झोपवलं. आज खूप दिवसांनी मला प्यायची होती. कपाटातून बाटली काढली सोबत सगळा तामझाम घेऊन मी बसले. बसण्याआधी एकदा पोरांच्याकडे नजर टाकली खरंच त्यांना झोप लागली आहे की नाही बघितलं. दोघेही गाढ झोपेत आहेत याची खात्री पटली आणि मी बसले. चिकन सिक्स्टीफाय आणि सोबत रम. एकटीने पिण्यात काय मजा पण, असा विचार करत करत मी दोन पेग हाणले. आता डोळे जड झाले आणि आतून गुदगुल्या व्हायला लागल्या. खरं सांगू का... ह्या गुदगुल्या मला अजिबात सहन होत नाहीत. असलं काही हसू फुटतं की मला आवरता आवारत नाहीत. पण आता त्या आवरल्या शिवाय पर्याय नव्हता. मी हसत होते पण मोठमोठ्याने नाही गालातल्या गालात. डोळे अजून अजून जड होत जातील तस तस माझं मंद स्मित आणखी आणखी पसरत होतं. मध्येच मला काही तरी आठवू लागलं आणि आठवत आठवता चक्क दिसू पण लागलं. डोळे जड झालेच होते तरी पण जड झालेल्या पापण्या मी मुश्किलीने वर-खाली केल्या. समोर अजून अर्धा पेला भरलेला होता. उघड-झाप करत करतच मी पेला हातात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. पण हात पेल्यापर्यंत जायला किमान अर्धा मिनिट तरी लागलाच. शरीर असं स्लो मोशनवर येतं ना ...

का चिडलेत एमपीएससीवाले?

Image
Source : Google Image गेल्या वर्षभरापासून आपण एका विचित्र परिस्थितीतून जात आहोत. कोरोनाच्या या संकटामुळे सामान्य लोक भरडले गेले आहेत. यातून स्पर्धा परीक्षेतून आपलं भविष्य घडवणारा विद्यार्थीवर्ग सुद्धा चुकला नाही. महाराष्ट्रातील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या फारच कठीण होऊन बसल्या आहेत.  या कोरोना संकटात एमपीएससी वाल्यांची परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली गेली. वरून त्यात वयोमर्यादेची अट घालण्यात आली. एमपीएससीची परीक्षा ही एका दिवसाची नसते. ती पूर्ण वर्षभराची प्रक्रिया असते. आयोगाच्या एका परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जातात.  पुण्यासारख्या ठिकाणी विद्यार्थी मेहनत घेत असतात. वर्ष वर्षभर घरी जात नसतात. मात्र परीक्षाच लांबत असल्याने एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना कुठेतरी अडथळा निर्माण झालाय. एमपीएससी पास झालेल्यांच्या नियुक्त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडल्या आहेत.  मुलगी जर एमपीएससी करत असेल आणि तिथे काहीही कमी-जास्त झालं की तिच्या घरचे आधी लग्नाचं हत्यार बाहेर काढतात. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचं कारण द...

भारतीय वृक्ष दिन!

Image
source : Google Image   अलीकडच्या दिवसात आपल्या कानावर एक शब्द सातत्याने पडतोय तो म्हणजे ऑक्सिजन! तो ऑक्सिजन जो या कोरोना संकटात अनेकांना न मिळाल्याने त्यांना प्राण गमवावे लागले.  आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू ज्याचा मूलभूत स्त्रोत आपल्या पृथ्वीवरील वृक्ष आहेत. आज भारतात १५ मे ला  ' भारतीय वृक्ष दिन ' साजरा केला जातो.             पाणी हे जीवन असेल तर झाडे ही आपला श्वास आहेत हे आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. पण हा श्वासच विकासाच्या नावाखाली कधी तोडला जातो हे आपल्याला समजत नसतं. कधी समाजकंटक, कधी चैनीखोर लोक या झाडांची कत्तल करत असतात. कदाचीत त्यांना आज दवाखान्यात सहज उपलब्ध न होणाऱ्या ऑक्सिजनची किंमत कळाली नसावी. जगण्यासाठी माणूस वृक्षांवर अवलंबून असतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तो वृक्षांपासून भागवत असतो. झाडांपासून इतकं सुख मिळवणारा माणूस आज मात्र दुर्दैवाने वृक्षांच्या विनाशास कारणीभूत ठरत आहे.           पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कु...

भारतीय तंत्रज्ञान दिवस!

भारताने ११ मे १९९८ ला पोखरण येथे यशस्वी अणु चाचणी पूर्ण केली. आणि खऱ्या अर्थाने देशात तंत्रज्ञानाची क्रांती झाली. म्हणून सन १९९९ पासून देशात ११ मे ला ' राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन ' साजरा केला जातो. विशेष म्हणजे याच दिवशी भारताने 'ऑपरेशन शक्ती' या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी केली होती. त्याच बरोबर बंगळुरूच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या 'हंसा ३' या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली होती. शिवाय डीआरडीओ ने 'त्रिशूल' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढवलं होतं. त्यामुळे ११ मे हा दिवस भारतीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला.           १९९५ मधे सुरु झालेल्या अनुचाचणीच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने ती चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर मात्र भारताने कोणतीही कसर सोडली नाही. अब्दुल कलाम आणि त्यांची टीम यांनी पोखरण स्थळाचा सखोल अभ्यास केला. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली ना...