Posts

स्वातंत्र्य म्हणजे काय?

Image
  ती मला विचारत होती, “स्वातंत्र्य म्हणजे काय?” मी पण बावरले, असा काही प्रश्न आपल्याला कशाला कोण विचारेल? नाही का, काय सांगावं बरं, “मग मी मला आठवेल तसं सांगितलं १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला वगैरे, शाळेत असताना शिकलेलं, आत्ता थोडीच सगळं आठवतंय! पण सांगितलं, मोडकं तोडकं जमेल तसं. पण आत्ता मीही थोडी धास्तावले, काय माहित आता परत काय विचारतील ही पोर, आपल्याला कुणी शहाणं समजलं तर धास्तावायला होतं, नाही समजल तर चिडायला होतं. ती मुलं परत हसलीत, त्यांच्या कळकट चेहर्यावरच हसु खुपच चमकदार होतं पण, माझ हसणं हल्ली मलाच अस चमकदार वाटत नाही, का बरं? म्हणजे त्यांचे चेहरे कळकट मळकट आहेत म्हणुन का मला त्यांच हसु जास्त तेजस्वी वाटतंय? त्यांनी परत विचारलं काय असतं स्वातंत्र्य म्हणजे? मी परत दचकले, कशाला हवंय यांना काय असत स्वातंत्र्य ते? मग म्हणाले, म्हणजे, आपण आपल्याला हवं ते खाऊ शकतो, हवं तिथं जाऊ शकतो, जे मनात येईल ते करु शकतो. हुश्श अरे वा जमलं की मला पण, फेकायला, फाडफाड, (मी स्वतःचीच पाठ थोपटली) ती टाळ्या वाजवुन हसत होतीत, माझ्या स्वातंत्र्याच्या व्याख्येवर, परत तसच ते निरागस आणि आकर्षक हसु, मला...

नक्की बदल होतोय?

Image
  माझं लग्न झालं तेंव्हा सोनी चार वर्षाची होती. ती आईच्या पोटात असतानाच तिचा दारुडा बाप तिला आणि तिच्या आईला टाकून गेला होता. सोनी पंधरा वर्षाची झाली आणि तिचं लग्न झालं. सोळाव्या वर्षीच तीही एका मुलाची आई बनली. सोनीला शिक्षणाचा गंधही नाही. त्यामुळे तिला शिकवण्याच्या वगैरे भानगडीत पडलेच नाहीत घरचे. त्यात वयात आलेल्या पोरीची जबाबदारी कोण घेणार म्हणून तिला शक्य तितक्या लवकर नवरा करून देतात. एकदा नवरा करून दिला की तिच्या जबाबदारीतून मुक्ती मिळते. पण, तिच्या जबाबदारीतून मुक्त होताना तिच्या कोवळ्या खांद्यावर किती मोठी जबाबदारी लादली गेली याचा मात्र कुणीच विचार केला नाही. बाईच्या जातीचं शेवटी हेच हाल. आज न उद्या तोच भोग म्हणून कोवळ्या सोनीवर लादलेल्या मातृत्वाचं समर्थन करणे ओघानेच आले. आमचे अजून एक शेजारी. त्यांचा मुलगा आठवी नववीच्या वयात वाह्यातपणा करू लागला. मित्रांसोबत दिवस दिवस भटकणे, शाळेला बुट्ट्या मारणे, शिक्षकांच्या खोड्या काढणे, आईवडील काही बोलले तर आत्महत्येची धमकी देणे, त्याचा वाह्यातपणा वाढत गेला. नववी दहावी पर्यंत तर अट्टल दारुड्या सारखा दारू पिऊन येई आणि आई वडिलांशी भांडण ...

वळण

Image
त्या तिथे भांड्यांचा ढीग पडलाय , जो स्वत:हून हलणार नाही. तिथे कपड्यांचा , तिथे बारीक धूळ , कुठे केस , कुठे कपटा.... कहीच नाही हलू शकत जागचं , स्वत:हून. .... आणि इथे मी! हलायचंच नाहीये काही करून , असं ठरवलं नाही. पण , तसंच झालंय खरं!   " माणूस " होतो का आपण कधीकाळी ? हे सांगता नाही येणार... पण , काहीतरी होतो आपण कधीकाळी जे आता नाहीहोत आणि जे आता आहोत ते नव्हतोच कधीकाळी! सांग ना , आतल्या जीवनरसाला वाळवी कधी लागत गेली , हे कळलं कसं नाही तुला ? आयुष्यातली सांज हळूहळू गडद अंधाराकडे झुकत चालले.... आणि याचा तुला पुसटसाही अंदाज आला नाही ? आता या क्षणीतरी तुला वाटतंय का , आपण ठरवलं तर...   तर पुन्हा पहाट होण्याची शक्यता वाढू शकते ? सुकलेल्या मुळांना पुन्हा पालवी फुटू शकते ? ही वाळवी पुन्हा नष्ट होऊ शकते , जी पोखरत चालले तुझ्या जाणीवा ?  समुद्र. नेहमी असतो तसाच उधाणलेला. तेव्हाही तो तसाच होता. आज तर तोही थोडा कलुषित झालाय! राहिला नाही तसाच नितळ. स्वच्छ. हं.   समुद्राच्या काठावर वाळुचा किल्ला बांधण्याचा माझा चाललेला निष्फळ प्रयत्न पाहून तू उगाचच थोडासा नाराज...

गोष्ट एका सरीची!

"ये सरे, उठ. दाजी आल्यात पाणी दे त्यास्नी." "व्हय, देतुय न्हवं का?" "अगं फुकनीचे, काम कर आधी मग लाग तोंडाला. आली मोठी रागाची." "आत्ता देतु म्हणलं, तर त्यात राग कसला. काय बोलायची सोयच न्हाय हिच्यासमोर." ते दाजी वागत्यात कनाय हिच्याबर तेच बरोबर हाय. "दाजी धरा पाणी. चूळ भरताय न्हवं?" "व्हय व्हय सरे आलू थांब जरा." मी दाजीच्या हातात पाण्याचा तांब्या द्यायला हात म्होर केला. तांब्या घेता घेता दाजींनी हातबी हळूच दाबला.  बाई! काय धाडस तरी दाजीच. आक्का आत असली तरी तेस्नी भीती न्हाय वाटत. मला मातर आक्काची लय भीती वाटती. एकदा का वटवटाय लागली का तिच्या तोंडाला जरा सुदी फ्योस येत न्हाय, कसलं त्वांड हाय कुणास ठावक. पार दाजी लय जीव लावत्यात बर मला. लय म्हंजी आक्कापेक्षा बी. "सरे, दाजीस्नी ताट कर. जेवाय वाढ. मी जरा गोट्यात चक्कर टाकून येती." "बरं." मी म्हंटल. 'मला म्हाईतच व्हतं आत्ता ही जाणार आणि.... 'मी कपाटावरलं ताट घितलं आणि दाजीस्नी जेवाय वाढाय लागली. माझं ताट अज...