Posts

Showing posts from June, 2021

वटपौर्णिमा आणि सावित्रीचा वारसा

Image
फोटो गुगल वरून साभार  हॅप्पी वटपौर्णिमा’पासून ते ‘ह्योच नवरा सात जन्मी हवा दिवसाच्या’ शुभेच्छा सोशल मिडीयावर फिरताहेत. अर्थात त्या दरवर्षीच फिरतात, तसा हा काही नवा प्रकार नाही. काही जणांसाठी हा सांस्कृतिक अस्मिता जपण्याचा दिवस असतो तर काही जणांसाठी हा दिवस निव्वळ थट्टेचा विषय असतो. आता इकडच्या काही जणांत आणि तिकडच्या काही जणांत कुणाचा समावेश होतो हे सांगण्याची गरज नाही.  वटपौर्णिमे दिवशी सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, तिच्या पातीव्रत्यात इतकी ताकद होती की, तिने आपल्या मृतप्राय पतीलाही जिवंत केले म्हणजेच अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवली. सावित्रीची ही कथा तुम्ही अनेकदा वाचली किंवा ऐकली असेल आज जरा नव्या दृष्टीने तिच्याकडे पाहूया.  युधिष्ठिराला द्रौपदी इतकी आपल्या पतींचा विचार करणारी (थोडक्यात काय तर पतिव्रता स्त्री) दुसरी कोणी स्त्री आहे का हा प्रश्न पडला होता. तेंव्हा युधिष्ठिराला मार्कंडेय ऋषींनी ही सावित्रीची कथा सांगितली,  भद्र देशाचा एका राजा होता ज्याचे नाव होते अश्वपती. या अश्वपती राजाला मुल नव्हते. अश्वपती राजाने अपत्य प्राप्तीसाठी होमहवन सा...